शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पंढरी प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाणार

By admin | Updated: June 4, 2016 00:07 IST

तालुक्यातील बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पाची आ.अनिल बोंडे यांच्यासमवेत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर विभागाचे कार्यकारी संचालक ए.व्ही.सुर्वे यांनी पंढरी,

जून २०१७ पर्यंत होणार पूर्ण : विदर्भ पाटबंधारे विभागाने केली पाहणीवरुड : तालुक्यातील बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पाची आ.अनिल बोंडे यांच्यासमवेत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर विभागाचे कार्यकारी संचालक ए.व्ही.सुर्वे यांनी पंढरी, पाक, भेमडी (लहान), नागठाणा -२, चांदस (वाठोडा), झटामझिरी, पवनी, बहादा प्रकल्पाचा दौरा करून संबंधित अधिकाऱ्यांना बांधकामाधीन प्रकल्पाबाबत सूचना देऊन निर्देशित केले.यावेळी कार्यकारी संचालक म्हणाले की, जून २०१७ पर्यंत पंढरी प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जाणार आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठवण केलीजाईल. त्यासोबतच या कालव्यातील पाणी पाईपलाईनने शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन करून तसेच खापरखेडा येथील ५२ पुनर्वसित कुटुंबांना खराडा येथे स्थलांतरित करून त्यांच्या सुख-सुविधेची कामे पूर्ण करण्याचे आश्वासनसुद्धा यावेळी सुर्वे यांनी दिले. आ.अनिल बोंडे हे मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर असतात. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ विभाग नागपूरचे कार्यकारी संचालक ए.व्ही.सुर्वे यांना बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पाची पाहणी करून या प्रकल्पांना तत्काळ पूर्णत्वास नेण्यासाठी आमंत्रित केले होते. आ.अनिल बोंडे यांच्या निमंत्रणाला मान देऊन गुरुवारी २ जून रोजी वरुड तालुक्यातील पंढरी, पाक, भेमडी (लहान), नागठाणा -२, चांदस (वाठोडा), झटामझिरी, पवनी, बहादा येथे सुरू असलेल्या बांधकामाधीन प्रकल्पाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पाबाबत अधिक सूचना देऊन हे प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सर्वप्रथम कार्यकारी संचालक यांनी चांदस वाठोडा प्रकल्प तसेच पंढरी प्रकल्प, नागठाणा-२ प्रकल्प, झटामझिरी प्रकल्प, भेमडी लहान प्रकल्प, पाक प्रकल्प, पवनी प्रकल्प व बहादा प्रकल्पाची पाहणी केली.पंढरी प्रकल्पाचे काम जून २०१७ पर्यंत पूर्ण होणार असून या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा केला जाईल. तसेच ज्या-ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या-त्या ठिकाणी कालव्यातून पाईपलाईन द्वारे शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी पाणी देण्याचे नियोजन केले जाणार आहे. यासोबतच पंढरी प्रकल्पालगत असलेल्या पुनर्वसित खापरखेडा गावातील ५२ कुटुंबांना खराडा येथे स्थलांतरित करून पुनर्वसित कुटुंबांना सुख-सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्यावी, कालव्याची कामे प्रधाण्यानी पूर्ण करून जून २०१८ पूर्वी करण्याचे नियोजन करून पुढील काळात ८ हजार ३७० शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाचा लाभ मिळेल. या प्रकल्पावरून पुसला व वरुड गावांना पाईपलाईनद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन ए.व्ही.सुर्वे यांनी उपस्थितांना दिले. यावेळी आ.अनिल बोंडे यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने आपली भूमिका स्पष्ट करीत त्यांच्या समस्या कार्यकारी संचालक यांच्याकडे व्यक्त केली. प्रकल्पासंबंधित समस्या निकाली काढून हा प्रकल्प जून २०१७ पर्यंत पूर्णत्वास जाण्याचे हमी दिली. यामुळे प्रकल्प भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाईपलाईनद्वारे पाणी मिळणार असल्याने शेतकरी एवढ्यावरच खुश न होता त्याला शासनाकडून पुरेपूर लाभ मिळवून देण्याची हमीसुद्धा त्यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)