शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कौंडण्यपुरातील देवी रुक्मिणीची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 01:25 IST

देवी रुक्मिणीचे माहेरघर आणि प्रतिपंढरपूर म्हणून ख्यातकीर्त श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून देवी रुक्मिणीची पालखी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी गुरुवारी सायंकाळी पंढरपूरच्या वाटेने निघाली. संस्थानच्या पालखीसमवेत शेकडो वारकरी माउलीचे स्मरण करीत पायी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.

ठळक मुद्देरविवारी सायंकाळी अमरावतीत होणार दाखल : यशोमती ठाकूर करणार स्वागत; दीड महिन्यात ४२ ठिकाणी राहणार मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : देवी रुक्मिणीचे माहेरघर आणि प्रतिपंढरपूर म्हणून ख्यातकीर्त श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून देवी रुक्मिणीची पालखी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी गुरुवारी सायंकाळी पंढरपूरच्या वाटेने निघाली. संस्थानच्या पालखीसमवेत शेकडो वारकरी माउलीचे स्मरण करीत पायी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. या पालखीला तब्बल ४२५ वर्षांची परंपरा आहे.देवी रुक्मिणीच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम मिर्चापूर येथे वेरुळकर कुटुंबाकडे राहतो. शुक्रवारी सायंकाळी ही पालखी कुºहा येथे दाखल होईल. तेथील मारोतराव सुने यांच्याकडे पालखीचा मुक्काम असतो. कौंडण्यपूरहून पंढरपूरसाठी निघालेल्या पायदळ पालखीमध्ये शेकडो वारकऱ्यांचा सहभाग आहे. यात पुरुष-महिलांसह युवा वर्गाचाही सहभाग आहे. पालखी पंढरपूरला दाखल होईपर्यंत या दिंडीतील वारकऱ्यांची संख्या तीनशेपर्यंत पोहोचते. मजल दरमजल करीत वारकरी दीड महिन्यांत पंढरपूर गाठतात. या वारीदरम्यान ४२ गावांत मुक्काम होतो. याशिवाय रस्त्याने लागणाºया प्रत्येक गावात पालखीच्या स्वागतासाठी, दर्शनासाठी शेकडो भाविक येत असतात. पूर्वापार चालत आलेल्या ठिकाणीच पालखीचा मुक्काम राहतो. त्यातील काही वारकºयांचे वंशज पालखीचे आदरातिथ्य करतात, अशी माहिती विठ्ठल रुख्मिणी संस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर व सचिव सदानंद साधू, विश्वस्त अतुल ठाकरे यांनी दिली.तीरथ महाराज बाराहाते, अशोक महाराज उरकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक भजने, पदन्यास व फुगड्यांच्या उत्साहात ही पालखी कौंडण्यपूरहून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.बियाणी चौकात शासकीय पूजाकौंडण्यपुरातील पालखी रविवारी सायंकाळी ५ वाजता अमरावती शहरात दाखल होणार आहे. अमरावती शहरातील बियाणी चौक येथे तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर दरवर्षीप्रमाणे जंगी स्वागत करणार आहेत. येथेच देवी रुक्मिणीच्या पालखीची शासकीय पूजा करण्यात येईल. शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित राहतील. इर्विन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक येथेही जिल्ह्यातील विविध मान्यवर व लोकप्रतिनिधी पालखीचे स्वागत करणार आहेत. नंतर पालखीचा मुक्काम एकवीरा संस्थानमध्ये राहील.