शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

कौंडण्यपुरातील देवी रुक्मिणीची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 01:25 IST

देवी रुक्मिणीचे माहेरघर आणि प्रतिपंढरपूर म्हणून ख्यातकीर्त श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून देवी रुक्मिणीची पालखी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी गुरुवारी सायंकाळी पंढरपूरच्या वाटेने निघाली. संस्थानच्या पालखीसमवेत शेकडो वारकरी माउलीचे स्मरण करीत पायी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.

ठळक मुद्देरविवारी सायंकाळी अमरावतीत होणार दाखल : यशोमती ठाकूर करणार स्वागत; दीड महिन्यात ४२ ठिकाणी राहणार मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : देवी रुक्मिणीचे माहेरघर आणि प्रतिपंढरपूर म्हणून ख्यातकीर्त श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून देवी रुक्मिणीची पालखी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी गुरुवारी सायंकाळी पंढरपूरच्या वाटेने निघाली. संस्थानच्या पालखीसमवेत शेकडो वारकरी माउलीचे स्मरण करीत पायी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. या पालखीला तब्बल ४२५ वर्षांची परंपरा आहे.देवी रुक्मिणीच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम मिर्चापूर येथे वेरुळकर कुटुंबाकडे राहतो. शुक्रवारी सायंकाळी ही पालखी कुºहा येथे दाखल होईल. तेथील मारोतराव सुने यांच्याकडे पालखीचा मुक्काम असतो. कौंडण्यपूरहून पंढरपूरसाठी निघालेल्या पायदळ पालखीमध्ये शेकडो वारकऱ्यांचा सहभाग आहे. यात पुरुष-महिलांसह युवा वर्गाचाही सहभाग आहे. पालखी पंढरपूरला दाखल होईपर्यंत या दिंडीतील वारकऱ्यांची संख्या तीनशेपर्यंत पोहोचते. मजल दरमजल करीत वारकरी दीड महिन्यांत पंढरपूर गाठतात. या वारीदरम्यान ४२ गावांत मुक्काम होतो. याशिवाय रस्त्याने लागणाºया प्रत्येक गावात पालखीच्या स्वागतासाठी, दर्शनासाठी शेकडो भाविक येत असतात. पूर्वापार चालत आलेल्या ठिकाणीच पालखीचा मुक्काम राहतो. त्यातील काही वारकºयांचे वंशज पालखीचे आदरातिथ्य करतात, अशी माहिती विठ्ठल रुख्मिणी संस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर व सचिव सदानंद साधू, विश्वस्त अतुल ठाकरे यांनी दिली.तीरथ महाराज बाराहाते, अशोक महाराज उरकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक भजने, पदन्यास व फुगड्यांच्या उत्साहात ही पालखी कौंडण्यपूरहून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.बियाणी चौकात शासकीय पूजाकौंडण्यपुरातील पालखी रविवारी सायंकाळी ५ वाजता अमरावती शहरात दाखल होणार आहे. अमरावती शहरातील बियाणी चौक येथे तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर दरवर्षीप्रमाणे जंगी स्वागत करणार आहेत. येथेच देवी रुक्मिणीच्या पालखीची शासकीय पूजा करण्यात येईल. शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित राहतील. इर्विन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक येथेही जिल्ह्यातील विविध मान्यवर व लोकप्रतिनिधी पालखीचे स्वागत करणार आहेत. नंतर पालखीचा मुक्काम एकवीरा संस्थानमध्ये राहील.