शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

नैसर्गिक आपत्तीपुढे पॅकेज, कर्जमाफी निष्फळ

By admin | Updated: July 28, 2014 23:17 IST

सन २०१४ हे वर्ष शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. फेब्रुवारी-मार्चमधील गारपीटग्रस्त असो वा अलीकडच्या २१ व २२ जुलैची अतिवृष्टी. यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची अवस्था

चांदूरबाजार : सन २०१४ हे वर्ष शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. फेब्रुवारी-मार्चमधील गारपीटग्रस्त असो वा अलीकडच्या २१ व २२ जुलैची अतिवृष्टी. यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. सन २००६ मध्ये अमरावती विभागातील पाच व वर्धेसह सहा जिल्ह्यांत सर्वाधिक १४४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.शासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनेनंतर शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. सन २०१० मध्ये ११७७, २०१२ मध्ये ९५० तर मागील वर्षी ८०२ शेतकऱ्यांनी विविध समस्यांमुळे जीवनयात्रा संपविली आहे. प्रत्येक योजनेला कात्री लावल्याप्रमाणे शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांनादेखील निकष लावून शासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. पात्र व अपात्र आत्महत्या किती यापेक्षा नोंदविण्यात आलेल्या शेतकरी आत्महत्येचा आकाडा येथील स्थिती स्पष्ट करण्यास पुरेसा आहे. परिश्रम घेत, शेतीत घाम गाळणाऱ्या अन्नदात्यावर ही वेळ का येते, याची कारणे अद्यापही शोधण्यात आली नाहीत. दरवर्षी अस्मानी व सुलतानी संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येच्या मुळापर्यंत जाण्यास शासनाला अपयश आल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)