शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

गरिबांना जागेची मालकी

By admin | Updated: December 2, 2015 00:12 IST

शासकीय जागेवर राहत असलेल्या कुटुंबाना मालकी हक्काचे उतारे देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

न्यायालयाचे आदेश : १९९५ पूर्वीचे अतिक्रमण नियमानुकूल होणारअमरावती: शासकीय जागेवर राहत असलेल्या कुटुंबाना मालकी हक्काचे उतारे देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. १४ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आता गरिबांना जागेची मालकी मिळणार आहे. शासकीय जमिनीवर राहत असलेले अनुसूचित जाती, गोरगरीब, श्रमिक, उपेक्षित व भूमिहिनांना मालकी हक्काचे उतारे देण्यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थाना सूचना देण्यात आल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १९९५ पूर्वीची अतिक्रमण नियमाकूल करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. राज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजवणी ही पुणे येथील विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी सुरु केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. हा न्यायीक लढा श्राववणबाळ माता-पिता सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी लढला आहे. निंबाळकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर २३ जून २०१५ च्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला ही अंमलबजावणी करण्यासाठीचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने २८ जानेवारी २०१५ रोजी आदेश दिले होते. शासनाने ४ एप्रिल २००२ रोजी प्रत्येक विभागीय आयुक्तांना आदेश दिले आहेत. पुणे येथे ही अंमलबजावणी सुरु झाली आहे. मात्र हे आदेश अमरावतीत पोहचले असताना शासकीय जमिनीवरील गरिबांना जागेची मालकी कधी मिळणार असा सवाल गरीब, अनुसूचित जाती संवर्ग, श्रमिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केला आहे. महापालिका हद्दीत १०२ अधिकृत झोपडपट्ट्या असून १५ ते २० झोपडपट्ट्यांना अधिकृत घोषित करण्याचे प्रस्तावित आहे. महापालिका हद्दीत १९९५ पूर्वीची अतिक्रमण नियमाकूल करण्यासाठी बहुतांश नागरी वस्त्या आहेत. या वस्तांमध्ये मूलभूत सोईसुविधा, विकास कामे, वीज, पाणी पुरवठ्याची कामे झाली आहेत. एवढेच नव्हे तर या झोपडपट्टी धारकांकडून कर आकारणी देखील केली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी झाल्यास गरीब, अनुसूचित जाती, श्रमिक, सामान्यांना अतिक्रमीत जागा नियमाकूल करुन मिळेल, हे वास्तव आहे.