शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

साथीच्या आजारांनी डोके काढले वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST

अमरावती : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दुसरीकडे साथीच्या आजारांमुळे डोकेदुखी वाढू लागली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून डायरिया, ...

अमरावती : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दुसरीकडे साथीच्या आजारांमुळे डोकेदुखी वाढू लागली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून डायरिया, कॉलरा, वात विकार, सर्दी, खोकला याशिवाय कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस चिकनगुनिया, मलेरिया डेंग्यू असे आजार डोके वर काढू लागले आहे. या आजारापासून बचावासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात अशा आजाराकडे कोरोना संकटाच्या काळात दुर्लक्ष करून मुळीच चालणार नाही. पावसाळा सुरू झाल्यापासून ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी अशा आजारात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता वेळेत उपचार करून घेणे गरजेचे आहे. याशिवाय पावसात, डायरिया, कॉलरा, वात विकार उद्भवतात. दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यासारखे विकार जडतात. या आजारांमुळे पचनक्रिया मंदावते. रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने संसर्गजन्य आजारांची लागण होते. पावसाळ्यात अनेकदा संसर्गजन्य आजार असतो त्वचारोग, फंगल इन्फेक्शन, मुरूम आणि सोयरासिस यासारखे विकार उद्भवू शकतात. डास चावल्याने डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया अशा आजारांचा प्रादुर्भाव वेगाने होत असतो. हे आजार टाळण्यासाठी घर व परिसर स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात साथरोग टाळण्यासाठी पौष्टिक आहार घेऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी रेवती साबळे यांनी सांगितले.

बॉक्स

हे आहे पावसाळ्यातील आजार

डायरिया, कॉलरा, वाताचे विकार, सर्दी, खोकला, कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस, चिकनगुनिया, मलेरिया, डेंग्यू त्वचारोग, फंगल इन्फेक्शन, मुरूम आणि सोयरासिस यासारखे अन्य साथरोग पावसाळ्यात उद्भवतात.या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रोप प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे.

बॉक्स

अशी घ्या काळजी

पिण्याचे पाणी शक्यतो उकळून व थंड करून प्या.

रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करा

आरात गाजर, हळद, लसूण आले, याचा आहारात, समावेश करा

डासांपासून बचावासाठी घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा

सर्दी खोकला ताप थंडी अशी लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ल्याने उपचार घ्या.