शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

कृषी विभागातील वादग्रस्त बदलीच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: July 22, 2014 23:48 IST

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत वादग्रस्त ठरलेल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कृषी मंत्रालयाने दिले आहेत. येत्या आठवडाभरात चौकशी

अमरावती : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत वादग्रस्त ठरलेल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कृषी मंत्रालयाने दिले आहेत. येत्या आठवडाभरात चौकशी समिती या प्रकरणाचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती आहे. या चौकशीत प्रशासन अधिकारी शिरसाठ यांची सावध भूमिका राहणार असून बदल्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्त बदली आदेशावर सहाय्यक प्रशासन अधिकारी देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या असल्याने त्यांना या चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याची कृषी विभागात चर्चा आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून राबविण्यात आलेल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रकरणाचे लागेबांधे थेट कृषी मंत्रालयापर्यंत जोडल्या गेले आहेत. बदलीसाठी घेण्यात आलेल्या निधी खालपासून वरिष्ठ पातळीपर्यंत जात असल्याचीही चर्चा आहे. यापूर्वी कृषी विभागातील नोकर भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली त्यामुळे कृषी विभाग चांगलाच बदनाम झाला आहे. कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत मागील काही दिवसापूर्वी विभागातील ५०५ कृषी सहायक, ११ पर्यवेक्षक, ८ सहायक, ११ वरिष्ठ लिपीक, १८ कनिष्ठ लिपीक, अनुरेखक १० व दोन वाहन चालकांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्या करताना मोठा आर्थिक व्यवहार झाल्यामुळे बदली प्रक्रियेत सर्व नियम धाब्यावर बसवून या बदल्या करण्यात आल्याची ओरड याच विभागातील कर्मचाऱ्यांनी सुरू केली. दरम्यान, याबाबतची तक्रार थेट मंत्रालयापर्यंत पोहचताच अमरावती विभागातील कृषी कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेची चौकशी सुरू झाली असून या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच कारवाई होईल.