शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

जिल्ह्यातील संत्रा बागायतदार वाऱ्यावर

By admin | Updated: June 17, 2014 23:58 IST

गेल्या दोन दशकात संत्र्याच्या लागवडी क्षेत्रात बेसुमार वाढ झाली. मात्र त्या प्रमाणात उत्पादनात आणि दर्जात पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नाही. अनेकांना संत्र्याच्या बागा नष्ट करण्याशिवाय पर्याय राहीला

सुरेश सवळे - चांदूरबाजारगेल्या दोन दशकात संत्र्याच्या लागवडी क्षेत्रात बेसुमार वाढ झाली. मात्र त्या प्रमाणात उत्पादनात आणि दर्जात पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नाही. अनेकांना संत्र्याच्या बागा नष्ट करण्याशिवाय पर्याय राहीला नाही. नागपुरी संत्रा अशी सर्वदूर ख्याती असणाऱ्या संत्रा बागाची व बागायतदारांची आजची ही दारूण अवस्था आहे.अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि वरूड दरम्यान १८ एकर क्षेत्रात एक विशाल सरकारी संत्रा नर्सरी आहे. या नर्सरीतून चांगल्या व जातीवंत संत्रा कळ्या पुरविण्यात येतात. पण अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्र, मार्गदर्शन व्यवस्था उभारण्याचे आजवर कोणालाच सुचले नाही. संत्रा लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असतांना संत्र्याचे उत्पादन व दर्जा वाढत नाही.सरकारी नोंदणीनुसार विदर्भात सुमारे १ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली असून त्यापैकी निम्मे क्षेत्र म्हणजे सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यात आहे. पुर्वी वडद, मोर्शी, काटोल, कळमेश्वर याच भागात मर्यादीत असणाऱ्या संत्रा बागा गेल्या तीन-चार दशकात विदर्भातील बहुतेक सर्वच जिल्ह्यात विस्तारल्या आहेत. विदर्भातील सुमारे पाच लाख टन संत्रा उत्पादनापैकी जवळपास अडीच लाख टन संत्रा उत्पादन एकट्या अमरावती जिल्ह्यातून व्हावे हे त्याचेच प्रमाण आहे. पण या संत्र्याची गुणवत्ता व दर्जा नसल्याने तसेच प्रत्येक संत्रा झाडाला फळधारणा क्षमता रोडावल्याने एकूण उत्पादनापैकी किमान ५० टक्क्यापेक्षा अधिक संत्रा आवश्यक निकषात बसत नसल्याने तो कमी भावात विकणे भाग पडते. लहान आकारचा व दर्जा नसणाऱ्या अशा संत्रा उत्पादनासाठी विदर्भात कोल्ड स्टोरेजची सोय नसणे, संत्रा प्रक्रिया प्रकल्प नसणे ही सुध्दा मोठी समस्या आहे. झाडावरून संत्रा उतरविल्यानंतर चार दिवसात त्याची विल्हेवाट लागणे आवश्यक असते. अन्यथा तो सडण्याच्या मार्गी लागतो.आंबिया व मृग असे संत्र्याचे दोन बहार असले तरी अमरावती जिल्ह्यात व विदर्भातही आंबियाचे उत्पादन जास्तच असते. यंदाही मृग बहाराचे उत्पादन पाच टक्केच आहे. पण आंबिया बहार चांगला असून त्याला २२०० ते २५०० प्रती हजार किंवा २२ हजार रूपये प्रती टन भाव दिला जात आहे. संत्रा पीक झाडावर असतांना संत्र्याचा बहार पाहूनच खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. सध्याचे हवामान, पाऊस, पाणी, वातावरण चांगले राहिल्यास आॅगस्ट-सप्टेंबर नंतर आंबिया मोठ्या प्रमाणात बाजारात येईल. त्यानंतर भाव कमी-जास्त होण्याची शक्यता व्यापारी वर्गात वर्तविण्यात येत आहे. मृग बहाराचे उत्पादनच नसल्याने त्याचे भाव वाढूनही बागायतदारांना त्याचा फायदा होणार नाही. शिवाय आंबिया बहारालाही अतिवृष्टी व हवामानाचा फटका बसला तर बम्पड क्रॉप सुध्दा गमवावे लागेल अशी आजची अवस्था आहे.आंबिया संत्रा सोबतच पंजाब प्रांतातून किन्नू नावाने येणारा संत्रा दक्षिणेतील बाजारात स्पर्धेत असते. पंजाब सरकारने या संत्र्याला मोठ्या प्रमाणात सोयी-सवलती दिल्याने तसेच दर्जा, गुणवत्ता, आकारमान यासाठी विशेष व्यवस्था केल्याने नागपुरीसंत्र्यापेक्षा किन्नू बाजारात भाव खात जातो. व्हॅक्सीनेशन आणि कोल्ड स्टोरेज मधील साठवणूक यामुळे किन्नू फळे अधिक चमकदार, रसदार आणि हवामानाच्या धोक्यातही कायम राहतात. संत्रा पिकाचा खालावलेला दर्जा, गुणवत्ता आणि आकारमानामुळे सुमारे सात वर्षापूर्वी दिल्ली परिसरातून आलेला संत्रा व्यापारी आता या भागातून परागंदा झाले आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी संत्रा बागा, शेत विकत घेऊन या भागात उभारल्या होत्या. फक्त बहार विकत घेण्याएवजी अनेकांनी जमिनी खरेदी करून संत्रा पिक नगण्य भावात स्थानिक बाजारातच विकणे भाग पडू लागल्याने त्यांनी येथून काढता पाय घेतला. सध्या संत्रा व्यापारात त्यामुळेच केवळ स्थानिक व्यापारी उरले आहेत. हंगाम आला की परप्रांतिय व्यापारी येतात, धंदा करतात व निघून जातात अशीच परिस्थिती सध्या संत्र्याच्या हंगामात सुरू आहे.