शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

संत्रा बागांना टँकरने पाणी

By admin | Updated: April 16, 2016 00:06 IST

तालुक्यात ९ प्रकल्प असून यावर्षी पावसाळयात १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. परंतु सध्या प्रकल्पात केवळ १२ ते १५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

पाणीटंचाई : २१ हजार हेक्टरमधील बागा जगविण्याचा केविलवाणा प्रयत्नसंजय खासबागे  वरूडतालुक्यात ९ प्रकल्प असून यावर्षी पावसाळयात १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. परंतु सध्या प्रकल्पात केवळ १२ ते १५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. सिंचन विहिरींची पातळी खालावल्यामुळे दिवसभर चालणारे पंप आता केवळ अर्ध्या तासांवरच आले आहेत. भूजल पातळी ४० ते ५० फुटांवर गेल्याने तालुक्यातील २१ हजार ५०० हेक्टर क्षेत्रामधील संत्राबागा मरणासन्न अवस्थेत आहेत. तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टर शेतजमीन संत्रा लागवडीखाली असून यापैकी १७ हजार हेक्टर जमिनीत फळधारणा करणारी तर पाच वर्षांपर्यंतची पाच हजारांपेक्षा अधिक संत्रा झाडे आहेत. गहू, हरभरा, मका, मिरची, पालेभाज्यांसह विविध बागायती पिके येथे घेण्यात येतात. या पिकांनासुध्दा वेळेवर सिंचनाची गरज असते. तालुक्यात ९ सिंचन प्रकल्प असून हजारो हेक्टर सिंचनाची क्षमता आहे. परंतु काही दिवसांपूर्वीपर्यंत १०० टक्के पाणी असलेले हे प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर असून यामध्ये केवळ १५ ते २० टक्केच जलसाठा उरला आहे. मार्च महिन्पूर्वीच हे प्रकल्प कोरडे पडू लागले होते. बोअरवेलचे पाणी ७०० ते ८०० फूट खाली गेले असून विहिरींची पातळी ४० ते ५० फूट खालावली आहे. एरवी दिवसभर पाण्याचा उपसा करणाऱ्या विहिरींमधून आता अर्ध्या तासांच्यावर पाणी येत नाही. यामुळे पुरेसे सिंचन होऊ शकत नाही. विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री ओलिताकरिता शेतावर जावे लागते. भारनियमनामुळेसुध्दा शेतकरी हैराण झाले आहेत. उपजिविकेचे प्रमुख साधन असलेल्या या संत्राझाडांना जीवदान देण्याकरिता प्रतीफेरी ६०० ते ७०० रुपयांप्रमाणे पाण्याचे टँकर मागविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टँकरमधील हे पाणी विहिरीत ओतून नंतर पंपाच्या सहाय्याने ठिबक सिंचनाद्वारे ओलीत केले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना सहा ते सात हजारांचा खर्च येतो. संत्रा, मोसंबी कलमांची निर्मिती करणाऱ्या नर्सरींवर तापमानाचा परिणाम होऊन संत्रा, मोसंबीच्या कलमा सुकण्याच्या मार्गावर असल्याने लाखोंचा फटका नर्सरीधारक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्राणप्रीय संत्रा बागा जगविण्याची जीवपाड धडपड शेतकऱ्यांना करावी लागत आहे. सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर पुसला, धनोडी, मालखेड, शेंदूरजनाघाट, आमनेर, राजुराबाजार, बारगाव, बेनोडा, गोरेगाव, नागझरी, टेंभुरखेडा, शेंदूरजनाघाट, तिवसाघाट, जरुड, मांगरुळी लोणी, करजगाव, सांवगा परिसरातील भूजल पातळी कमालीची घटल्याने सिंचन विहिरी खोल गेल्या तर चार ते पाच तास चालणारे पंप केवळ १५ ते २० मिनिटेच चालायला लागले. यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकऱ्यांनी संत्रा जगविण्याकरिता टँकरने पाणी शेतात नेऊन विहिरीत टाकून ओलीत करणे सुरु केले. दररोज आठ ते दहा टँकर पाण्याचा वापर सिंचनाकरिता पाणी नसल्याने येथील शेतकऱ्यांना त्यांची संत्र्याची झाडे वाचविण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रतिफेरी ६०० ते ७०० रुपये खर्च करून दिवभरात ८ ते १० टँकर पाणी विहिरीत सोडून शेतकऱ्यांना रात्री ठिबक सिंचनाव्दारे ओलीत करावे लागत आहे. संत्रा जगविणे शेतकऱ्यांसाठी जिकरीचे झाल्याचे बेनोडा येथील युवा शेतकरी विवेक आलोडे यांनी सांगितले. नर्सरीधारकांनाही लाखोंंचा फटका वरुड तालुक्यात संत्राबागांसह ५०० पेक्षा अधिक नर्सरीधारक आहेत. यामध्ये अधिकृत परवानाधारकसुध्दा आहेत. येथे कोट्यवधींच्या संत्रा, मोसंबी कलमांचे उत्पादन घेतले जाते. परंतु यावर्षी भूजलपातळी खालावल्याने सिंचनाची समस्या आ वासून उभी असल्याने संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे त्याचप्रमाणे संत्रा, मोसंबी कलमांची निर्मिती करणाऱ्या नर्सरीधारकांवरही संक्रांत आली आहे.