शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

संत्रा बागांना टँकरने पाणी

By admin | Updated: April 16, 2016 00:06 IST

तालुक्यात ९ प्रकल्प असून यावर्षी पावसाळयात १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. परंतु सध्या प्रकल्पात केवळ १२ ते १५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

पाणीटंचाई : २१ हजार हेक्टरमधील बागा जगविण्याचा केविलवाणा प्रयत्नसंजय खासबागे  वरूडतालुक्यात ९ प्रकल्प असून यावर्षी पावसाळयात १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. परंतु सध्या प्रकल्पात केवळ १२ ते १५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. सिंचन विहिरींची पातळी खालावल्यामुळे दिवसभर चालणारे पंप आता केवळ अर्ध्या तासांवरच आले आहेत. भूजल पातळी ४० ते ५० फुटांवर गेल्याने तालुक्यातील २१ हजार ५०० हेक्टर क्षेत्रामधील संत्राबागा मरणासन्न अवस्थेत आहेत. तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टर शेतजमीन संत्रा लागवडीखाली असून यापैकी १७ हजार हेक्टर जमिनीत फळधारणा करणारी तर पाच वर्षांपर्यंतची पाच हजारांपेक्षा अधिक संत्रा झाडे आहेत. गहू, हरभरा, मका, मिरची, पालेभाज्यांसह विविध बागायती पिके येथे घेण्यात येतात. या पिकांनासुध्दा वेळेवर सिंचनाची गरज असते. तालुक्यात ९ सिंचन प्रकल्प असून हजारो हेक्टर सिंचनाची क्षमता आहे. परंतु काही दिवसांपूर्वीपर्यंत १०० टक्के पाणी असलेले हे प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर असून यामध्ये केवळ १५ ते २० टक्केच जलसाठा उरला आहे. मार्च महिन्पूर्वीच हे प्रकल्प कोरडे पडू लागले होते. बोअरवेलचे पाणी ७०० ते ८०० फूट खाली गेले असून विहिरींची पातळी ४० ते ५० फूट खालावली आहे. एरवी दिवसभर पाण्याचा उपसा करणाऱ्या विहिरींमधून आता अर्ध्या तासांच्यावर पाणी येत नाही. यामुळे पुरेसे सिंचन होऊ शकत नाही. विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री ओलिताकरिता शेतावर जावे लागते. भारनियमनामुळेसुध्दा शेतकरी हैराण झाले आहेत. उपजिविकेचे प्रमुख साधन असलेल्या या संत्राझाडांना जीवदान देण्याकरिता प्रतीफेरी ६०० ते ७०० रुपयांप्रमाणे पाण्याचे टँकर मागविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टँकरमधील हे पाणी विहिरीत ओतून नंतर पंपाच्या सहाय्याने ठिबक सिंचनाद्वारे ओलीत केले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना सहा ते सात हजारांचा खर्च येतो. संत्रा, मोसंबी कलमांची निर्मिती करणाऱ्या नर्सरींवर तापमानाचा परिणाम होऊन संत्रा, मोसंबीच्या कलमा सुकण्याच्या मार्गावर असल्याने लाखोंचा फटका नर्सरीधारक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्राणप्रीय संत्रा बागा जगविण्याची जीवपाड धडपड शेतकऱ्यांना करावी लागत आहे. सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर पुसला, धनोडी, मालखेड, शेंदूरजनाघाट, आमनेर, राजुराबाजार, बारगाव, बेनोडा, गोरेगाव, नागझरी, टेंभुरखेडा, शेंदूरजनाघाट, तिवसाघाट, जरुड, मांगरुळी लोणी, करजगाव, सांवगा परिसरातील भूजल पातळी कमालीची घटल्याने सिंचन विहिरी खोल गेल्या तर चार ते पाच तास चालणारे पंप केवळ १५ ते २० मिनिटेच चालायला लागले. यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकऱ्यांनी संत्रा जगविण्याकरिता टँकरने पाणी शेतात नेऊन विहिरीत टाकून ओलीत करणे सुरु केले. दररोज आठ ते दहा टँकर पाण्याचा वापर सिंचनाकरिता पाणी नसल्याने येथील शेतकऱ्यांना त्यांची संत्र्याची झाडे वाचविण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रतिफेरी ६०० ते ७०० रुपये खर्च करून दिवभरात ८ ते १० टँकर पाणी विहिरीत सोडून शेतकऱ्यांना रात्री ठिबक सिंचनाव्दारे ओलीत करावे लागत आहे. संत्रा जगविणे शेतकऱ्यांसाठी जिकरीचे झाल्याचे बेनोडा येथील युवा शेतकरी विवेक आलोडे यांनी सांगितले. नर्सरीधारकांनाही लाखोंंचा फटका वरुड तालुक्यात संत्राबागांसह ५०० पेक्षा अधिक नर्सरीधारक आहेत. यामध्ये अधिकृत परवानाधारकसुध्दा आहेत. येथे कोट्यवधींच्या संत्रा, मोसंबी कलमांचे उत्पादन घेतले जाते. परंतु यावर्षी भूजलपातळी खालावल्याने सिंचनाची समस्या आ वासून उभी असल्याने संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे त्याचप्रमाणे संत्रा, मोसंबी कलमांची निर्मिती करणाऱ्या नर्सरीधारकांवरही संक्रांत आली आहे.