शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

संत्रा गळती, शंखीचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:01 IST

दरवर्षी ऐन मृग नक्षत्रात संत्रा फळगळीने तालुक्यातील शेतकरी भरडून जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत होते. या फळगळतीचे नेमके कारण शोधण्यात कृषी शास्त्रज्ञ ने पुढाकार घ्यावा याकरिता तालुक्यातील शेतकरी मागणी करीत होते. यात यावर्षी शंख गोगलगायनेसुद्धा कहर माजविला होता. यांच्यामुळे राज्यमंत्री बचू कडू यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केली.

ठळक मुद्देबच्चू कडू : बांधावर पाहणी, उपाययोजना सुचविण्याचे कृषी विभागाला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : दरवर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात होत असलेली संत्रा गळती, शंख किड्यांच्या प्रादुभार्वामुळे तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कृषी अधिकारी व तलाठी यांच्यासोबत वणी बेलखेडा येथील शिवारात प्रत्यक्ष पाहणी केली.दरवर्षी ऐन मृग नक्षत्रात संत्रा फळगळीने तालुक्यातील शेतकरी भरडून जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत होते. या फळगळतीचे नेमके कारण शोधण्यात कृषी शास्त्रज्ञ ने पुढाकार घ्यावा याकरिता तालुक्यातील शेतकरी मागणी करीत होते. यात यावर्षी शंख गोगलगायनेसुद्धा कहर माजविला होता. यांच्यामुळे राज्यमंत्री बचू कडू यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केली.तसेच या नुकसान वर तात्काळ उपाययोजना करून व दोन्ही बाबतीत सर्वे करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी तसेच शेतकरी व कृषी अधिकारी यांच्यात कमिटी तयार करून लवकरच या प्रश्नावर तोडगा काढावा असे आदेश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. यावेळी कृषी उपविभागीय अधिकारी सातपुते तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, तलाठी मातकर सह प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश देशमुख, प्रफुल्ल नावघरे, प्रदीप बंड, सुनील मोहोड, अमोल शेळके मंगेश शेळके व वणी बेलखेडा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूagricultureशेती