शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

खुले कारागृह सुरु; स्वतंत्र कारभार केव्हा?

By admin | Updated: November 30, 2014 22:57 IST

गृहविभागाच्या निर्णयानुसार अमरावती मध्यवर्ती कारागृहात ५० बंदी संख्या क्षमतेचे सुरु करण्यात आलेल्या खुल्या कारागृहाची इमारत अद्यापही साकारण्यात आलेली नाही. जुन्याच कारागृहात कारभार

अमरावती : गृहविभागाच्या निर्णयानुसार अमरावती मध्यवर्ती कारागृहात ५० बंदी संख्या क्षमतेचे सुरु करण्यात आलेल्या खुल्या कारागृहाची इमारत अद्यापही साकारण्यात आलेली नाही. जुन्याच कारागृहात कारभार सुरु असून या बंदीजणांना खुले कारागृहाची नियमावली केवळ कागदोपत्रीच सुरु असल्याचे दिसून येते.गृहविभागाने राज्यात मध्यवर्ती कारागृहांच्या ठिकाणी ५० बंदी क्षमतेचे खुले कारागृह सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अमरावतीत १२ डिसेंबर २०१३ रोजी खुले कारागृह सुरु करण्यात आले. या कारागृहाच्या निर्मितीसाठी लागणारी इमारत, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, बराकी आदींचा नकाशा मंजूर करुन त्याकरिता लागणाऱ्या निधीबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविला आहे. खुले कारागृह सुरु होऊन ११ महिन्यांचा कालावधी लोटला असताना बांधकामासाठी लागणारा निधी शासनाने पाठविला नाही. परिणामी खुले कारागृहाचा कारभार जुन्याच मध्यवर्ती कारागृहातून चालविला जात आहे. खुले कारागृहाची नियमावली ५० बंद्यासाठी लागू करण्यात आली आहे. मात्र या बंदीजणांना जुन्याच बरकीत ठेवले जात आहे. त्यांच्याकडून केवळ शेतीची कामे करुन घेतली जात आहे. या बंदीजणांना स्वतंत्र इमारत निर्माण झाल्याशिवाय खुले कारागृहाच्या सोई सुविधा मिळणे अशक्य असल्याचे चित्र आहे. खुले कारागृहाचा स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी इमारत बांधकाम, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी शासनाने त्वरित द्यावा, याकरिता कारागृहाच्या अधीक्षकांनी प्रस्ताव पाठविले आहे. निधीअभावी खुले कारागृहाचे एकूणच प्रकरण थंडबस्त्यात पडले आहे. मात्र शासन नियमानुसार खुले कारागृह सुरु करण्याचे कसब प्रशासनाने केले आहे. ५० बंद्याना दररोज सकाळ ते सायंकाळपर्यंत खुले कारागृहाच्या नियमानुसार कामकाज चालवून सूर्यास्त होताच त्यांना मध्यवर्ती कारागृहांच्या बराकीत ठेवले जात आहे. खुले कारागृहांच्या सोईसुविधा या कागदोपत्रीच सुरु असल्यामुळे अनेक बंदीजणांमध्ये कमालीची नाराजी पाहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)