शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

जिल्ह्यात ११ महिन्यांत केवळ ४२८३ विवाह नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:38 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोना असतानाही मोठ्या प्रमाणात विवाह झाले असताना १ जानेवारी ते नोव्हेंबर २०२० पर्यंत ४२८३ जोडप्यांनीच विवाह ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोना असतानाही मोठ्या प्रमाणात विवाह झाले असताना १ जानेवारी ते नोव्हेंबर २०२० पर्यंत ४२८३ जोडप्यांनीच विवाह नोंदणी केली आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात सर्वाधिक १३६४, तर धारणी तालुक्यात सर्वात कमी केवळ ९ विवाहाची नोंद झालेली आहे. यावरून विवाह नोंदणीसंदर्भात नागरिकांची उदासीनता दिसून येत आहे.

कोरोनाच्या संकटामुळे यंदा गर्दी वा संपर्क टाळण्याच्या उद्देशाने अनेक विवाहास इच्छुक असलेल्यांनी पुढे बघू, अशी भूमिका घेतल्याचे दिसून आले असले तरी अनेकांनी बजेटमध्ये कोरोना नियमाच्या अधीन राहून हा विधी उरकविल्याचे चित्र आहे. मात्र, विवाहन नोंदणीची तसदी कुणी घेताना दिसत नाही. शासकीय योजनेचा लाभ, इतर ठिकाणी आवश्यकता भासल्यासच विवाह नोंदणीचे कार्यालय कुठे आहे, याची मिळेल त्यांना विचारणा करताना मात्र दिसतात. परंतु विवाहानंतर नोंदणीची तसदी घेत नसल्याचे वास्तव सर्वेक्षणातून समोर आले आहे. याला संबंधित विभागदेखील काऱणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. जानेवारी महिन्यात ६१७, फेब्रुवारी ५७२, मार्च ३२३, एप्रिल १८३, मे १६९, जून २५४, जुलै ४२६, ऑगस्ट ३०८, सप्टेंबर ५३४, ऑक्टोबर ४८०, नोव्हेंबर ३२७ विवाह नोंदणी झालेली आहे.

तालुकानिहाय विवाह नोंदणी

अचलपूर - ८६६

अमरावती - १३६४

अंजनगाव सुर्जी - ९१

चांदूर बाजार - ६४३

चांदूर रेल्वे - १५३

दर्यापूर - ७०

मोर्शी - २७७

वरूड - २१८

भातकुली - २३४

धामणगाव रेल्वे - १८९

तिवसा - १३०

नांदगाव खंडेश्वर - ५७

चिखलदरा - १४

धारणी - ९

कोट

विवाह नोंदणीकरिता दाम्पत्य अनुत्सुक दिसून येत आहे. शासनाने विविध योजनांच्या लाभासाठी विवाह नोंदणी अनिवार्य केल्यास हा टक्का वाढू शकतो.

- दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद