शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पुस्तकांशिवाय भरली ऑनलाईन शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:16 IST

आठ ते दहा दिवसांत प्राप्त होणार विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके अमरावती : जिल्ह्यामध्ये नवीन शैक्षणिक सत्राला ...

आठ ते दहा दिवसांत प्राप्त होणार विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके

अमरावती : जिल्ह्यामध्ये नवीन शैक्षणिक सत्राला सुरूवात २८ जूनपासून झाली आहे. कोरोना संसर्गाचा धोका कायम असल्याने शाळांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे निर्देश आहेत. मात्र, बालभारतीकडून अद्याप नवीन पुस्तके न मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकांशिवाय ऑनलाईन हजेरी लावावी लागत आहे. गत वर्षाची दहा ते वीस टक्के पुस्तके परत आली आहेत. त्यामुळे अभ्यास करायचा तरी कसा, असा प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वशिक्षा अभियानातून दरवर्षी मोफत पाठपुस्तके देण्यात येतात. मात्र, कोरोना संसर्गामुळे यंदा पुस्तकांची छपाई बालभारतीकडून थांबली होती. त्यामुळे पुढच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तके शाळांमध्ये जमा करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून दिले होते. मात्र, याकडे बहुतांश पालकांसह विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याने १० ते २० टक्केच विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत करण्यात आली. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुस्तकांच्या छपाईचे काम उशिराने सुरू झाले आहे. परिणामी नवीन पुस्तकांची विद्यार्थ्यांना उत्सुकता असते. यावर पुस्तके उपलब्ध न झाल्याने हिरमोड झाला आहे. त्यामुळे ऑनलाईन शाळेत पुस्तकांशिवाय विद्यार्थ्यांना हजेरी लावावी लागत आहे.

बॉक्स

पुस्तके नाहीत अभ्यास कसा करणार ?

कोट

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण मिळत आहे.अद्याप नवीन पुस्तके मिळालेले नाहीत. पुढच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी जी पुस्तके जमा केली, ती पुस्तके शाळेकडून द्यायची कुणाला, हाही प्रश्न निर्माण झाला आहे. पुस्तके कमी अन् मागणी अधिक हेदेखील पुस्तके उपलब्ध न होण्यामागील कारण आहे.

- आनंद टेकाडे, पालक

कोट

नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले तरी अजूनपर्यत मुलाला पुस्तके मिळालेली नाहीत.शाळा मात्र ऑनलाईन सुरू आहेत.मग शिक्षण शिकवितात यावर अभ्यास करण्यासाठी पुस्तके नसल्याने अशा शिक्षणाचा काही फायदा मुलांना होत नाही.

- प्रदीप माकोडे,

पालक

कोट

बालभारतीकडून काही प्रमाणात नुकताच पाठपुस्तकांचा पुरवठा झाला आहे. ती पाठपुस्तके अचलपूर आणि चांदूर बाजार तालुक्याला देण्यात आली आहेत. लवकरच उर्वरित तालुक्यालाही पाठपुस्तके नियोजनानुसार उपलब्ध होताच मुलांना वितरित केले जातील.

- एजाज खान,

शिक्षणाधिकारी प्राथमिक

बॉक्स

लवकरच मिळणार पुस्तके

काही विद्यार्थ्यांनी पुस्तके परत केली आहेत. ती नवीन विद्यार्थ्यांना देण्याचे नियोजन केले आहे.

समग्र शिक्षा अभियान विभागाकडून नियोजनानुसार विद्यार्थ्यांकरिता आवश्यक पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारतीकडे केली आहे.

आठ ते दहा दिवसात जिल्हा स्तरावर पहिली ते आठवीची नवीन पुस्तके प्राप्त होणार आहेत. यामध्ये पहिला टप्पा उपलब्ध झाल्याने दोन तालुक्यात वितरण केले आहे. इतर तालुक्यांना पुस्तकांचा पुरवठा होणार आहे. शाळांनी व्हाॅट्सॲपवर पाठविलेलाच अभ्यास विद्यार्थी करीत आहेत. त्यामुळे लवकरच पुस्तके मिळतील यासाठी प्रयन्न सुरू आहे.

बॉक्स

वर्गनिहाय लाभार्थी विद्यार्थीसंख्या

पहिली-२८३४३

दुसरी-२५०९५

तिसरी-२६९५७

चौवथी-३०९७३

पाचवी-३५८२३

सहावी -३५८०६

सातवी-३७७६४

आठवी-३७४२४