शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

राज्यात ५० हजार शाळांमध्ये लावणार १० लाख वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST

मोफत रोपे देण्यासाठी वन मंत्रालयाचे पत्र, रोपे लावणे संवर्धनाची धुरा शाळांवर अमरावती : यंदा वनमहोत्सव २०२१-२०२२ अंतर्गत राज्यात ५० ...

मोफत रोपे देण्यासाठी वन मंत्रालयाचे पत्र, रोपे लावणे संवर्धनाची धुरा शाळांवर

अमरावती : यंदा वनमहोत्सव २०२१-२०२२ अंतर्गत राज्यात ५० हजार शाळांमध्ये १० लाख वृक्षलागवड करण्यात येणार आहे. शाळेतील निवडक शिक्षक, विद्यार्थी यांच्या मदतीने ही रोपे लावणे आणि संगोपनाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने शाळांना मोफत रोपे देण्याची जबाबदारी वनविभागाकडे सोपविण्यात आली आहे.

राज्य अल्पसंख्याक आयोग १६ ते ३१ जुुलै दरम्यान वृक्षारोपणाने पंधरवडा साजरा करीत आहे. त्याकरिता राज्यात ५० हजार शाळांमधील निवडक शिक्षक, विद्यार्थी यांच्या मदतीने राेपे लावण्यात येतील आणि ती जगविण्याची जबाबदारीदेखील शाळेवरच सोपविली जाणार आहे. रोपे खरेदीसाठी राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे निधी नाही. त्यामुळे शासन धोरणास अधिन राहून संबंधित यंत्रणांना मोफत रोपे देण्याबाबतचे पत्र प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांना मंत्रालयातील मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी २० जुलै रोजी पाठविले आहे. तसेच वनमहोत्सवात शासकीय, प्रशासकीय यंत्रणांनी रोपांची मागणी केल्यास अशा यंत्रणांकडे रोपे खरेदीची तरतूद नसल्यास अशांनाही मोफत रोपे द्यावी, असे पत्रात म्हटले आहे. जिल्हा स्तरावर उपवनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी (प्रादेशिक, सामाजिक वनीकरण) यांना शाळांना रोपे उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे.

-----------

वनमहोत्सवाच्या अनुषंगाने वरिष्ठांचे पत्र प्राप्त झाले आहे. शाळा अथवा यंत्रणांच्या मागणीनुसार मोफत रोपे दिले जातील. कुणी रोपे घेऊन गेलेत, तशा नोंदी सुद्धा सामाजिक वनीकरण विभागात ठेवल्या जातील. त्यापैकी किती रोपांचे वृक्षात रुपातंर झाले, याची नोंद ठेवली जाईल.

- नितीन गोंडाणे, प्रभारी उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, अमरावती