शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

दर ३५ नागरिकांमागे एक संक्रमित, ६६ रुग्णांमागे एका पॉझिटिव्हचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या शुक्रवारी ८०,६५८ वर पोहोचली आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख गृहीत धरता दर ३५ नागरिकांमागे ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या शुक्रवारी ८०,६५८ वर पोहोचली आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख गृहीत धरता दर ३५ नागरिकांमागे एक कोरोनाग्रस्त व दर ६६ पॉझिटिव्हमागे एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक नोंद आहे.

जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी पहिला पॉझिटिव्ह व संक्रमिताच्या मृत्यूची पहिली नोंद झाल्यानंतर सातत्याने कोरोना संसर्ग वाढताच राहिला आहे. यानंतर सप्टेंबर महिन्यात कोरोनाची पहिली लाट आली. यामध्ये ७,७१३ पॉझिटिव्ह व १५४ मत्यूची नोंद झाली. त्यानंतर मात्र, फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला. फेब्रुवारी महिन्यात १३,२३० पॉझिटिव्ह व ९२ मृत्यू. मार्च महिन्यात १३,५१८ पॉझिटिव्ह १६४ मृत्यू, एप्रिल महिन्यात १६,६९४ पॉझिटिव्ह व तब्बल ४१० रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय मे महिन्यातील १४ दिवसांत तब्बल १३,९६१ पॉझिटिव्ह व २४७ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेली कोरोनाची दुसरी लाट साडेचार महिन्यांनंतरही कमी होताना दिसत नसल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी नव्हे, तर तिसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. या काळात चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटीदेखील २२ ते ३० दरम्यान राहिली आहे. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट महापालिका क्षेत्रात, तर तिसरी लाट ही जिल्हा ग्रामीणमध्ये सुरू झाल्याची खुद्द आरोग्य विभागातच चर्चा आहे.

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने जिल्हा व आरोग्य प्रशासनाने आता तालुकास्तरावर व मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही किमान २५ ते ३० ऑक्सिजन बेडचे नियोजन केले जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

बॉक्स

दुसऱ्या लाटेत ९१३ संक्रमितांचा मृत्यू

कोरोनाच्या पहिल्या लाटेत १५४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. मात्र, फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेत तब्बल ९१३ संक्रमितांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. दर महिन्याला संक्रमितांच्या मृत्यूचा आकडा वाढताच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,२१३ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत दर ६६ रुग्णांमागे एकाचा मृत्यू झालेला आहे.

बॉक्स

फेब्रुवारीपासून ५७,४०३ पाॅझिटिव्ह

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत म्हणजेच फेब्रुवारी ते १४ मे या कालावधीत ५७,४०३ कोरोनाग्रस्त व या कालावधीत ९१३ संक्रमितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण या कालावधीत आहे. ऑक्सिजन बेडचा तुटवडा, रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची भटकंती. एवढेच नव्हे तर स्मशानभूमीतही ओट्यासाठी प्रतीक्षेत राहण्याची वेळ या काळात आलेली आहे.

बॉक्स

सक्रिय रुग्ण उच्चांकी १०,८९२

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या कालावधित सक्रिय रुग्णांची संख्या पहिल्यांदा उच्चांकी १०,८४२ वर पोहोचली आहे. यात २,३१२ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. याशिवाय ग्रामीणमध्ये उच्चांकी ७,८४७ व महापालिका क्षेत्रात ३.०४५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णसंख्या वाढती असल्याने रिकव्हरीचे प्रमाण ८४.९९ टक्क्यांवर पोहोचल्याचे दिसून येत आहे.