शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आता गुणपत्रिका महाविद्यालयातूनच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:14 IST

अमरावती : लहान-सहान कामांसाठी विद्यार्थी विद्यापीठात गर्दी करतात. मात्र, यापुढे अंतिम सत्र वगळता अन्य सत्राच्या गुणपत्रिका महाविद्यालयांतून मिळेल, असा ...

अमरावती : लहान-सहान कामांसाठी विद्यार्थी विद्यापीठात गर्दी करतात. मात्र, यापुढे अंतिम सत्र वगळता अन्य सत्राच्या गुणपत्रिका महाविद्यालयांतून मिळेल, असा निर्णय परीक्षा मंडळाने आभासी बैठकीतून घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांच्या विद्यापीठात अनावश्यक येरझारा थांबणार आहेत.

केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात सन २०१० पासून सत्र पद्धतीच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा लागू झाली. त्यानुसार विद्यापीठ, महाविद्यालयांत सत्र पद्धत सुरू झाली. अगोदर अभियांत्रिकी त्यानंतर विधी, फार्मसी, विज्ञान आता सर्वच अभ्यासक्रमांसाठी सत्र पद्धतीच्या आधारे परीक्षा घेण्यात येत आहे. परंतु, यापूर्वी एक, दोन, तीन या सत्राच्या अभ्यासक्रमात विद्यार्थी उत्तीर्ण नसल्यास चौथ्या सत्राच्या निकालाची गुणपत्रिका विद्यापीठ रोखत होते. सदर विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’मध्ये राहायचे. मात्र, कालांतराने विद्यार्थी उत्तीर्ण झाले की, विद्यापीठात गुणपत्रिका सादर करून निकाल ‘क्लिअर’ करायचे. यावेळी पाचही जिल्ह्यांतून पालक, विद्यार्थ्यांची होणारी गर्दी ही मोठ्या प्रमाणात असते. गुणपत्रिकांची कामे ही महाविद्यालय स्तरावर व्हावी, असा प्रस्ताव परीक्षा मंडळात मांडला गेला. या प्रस्तावाला सर्वसंमतीने मान्यता प्रदान करण्यात आली. विद्यापीठात केवळ अंतिम सत्राची गुणपत्रिका रोखून ठेवता येईल, असा निर्णय झाला. परीक्षा मंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष कुलगुरू मुरलीधर चांदेकर होते. सचिवपदी परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख होते. यावेळी प्र-कुगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा मंडळाचे संजय खडक्कार, सी.एच. जाधव, अधिष्ठाता एफ,सी रघुवंशी, अविनाश माेहरील, एस,एम. कतोरे, दिलीप निचत, वैशाली गुडधे, डॉ. राऊत आदींनी परीक्षा मंडळाचा बैठकीत सहभाग नोंदविला.

-------------

विद्यापीठ स्तरावर आता पदवीसाठी अंतिम सत्राच्या अभ्यासक्रमाची गुणपत्रिका रोखण्यात येईल. उर्वरित अन्य सत्र परीक्षांच्या गुणपत्रिका महाविद्यालयातून मिळतील, असा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची गरज नसेल.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ