शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
4
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
5
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
6
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
7
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
8
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
9
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
10
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
11
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
12
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
13
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
14
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
15
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
16
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
17
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
18
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
19
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
20
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 

आता गुणपत्रिका महाविद्यालयातूनच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:14 IST

अमरावती : लहान-सहान कामांसाठी विद्यार्थी विद्यापीठात गर्दी करतात. मात्र, यापुढे अंतिम सत्र वगळता अन्य सत्राच्या गुणपत्रिका महाविद्यालयांतून मिळेल, असा ...

अमरावती : लहान-सहान कामांसाठी विद्यार्थी विद्यापीठात गर्दी करतात. मात्र, यापुढे अंतिम सत्र वगळता अन्य सत्राच्या गुणपत्रिका महाविद्यालयांतून मिळेल, असा निर्णय परीक्षा मंडळाने आभासी बैठकीतून घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांच्या विद्यापीठात अनावश्यक येरझारा थांबणार आहेत.

केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात सन २०१० पासून सत्र पद्धतीच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा लागू झाली. त्यानुसार विद्यापीठ, महाविद्यालयांत सत्र पद्धत सुरू झाली. अगोदर अभियांत्रिकी त्यानंतर विधी, फार्मसी, विज्ञान आता सर्वच अभ्यासक्रमांसाठी सत्र पद्धतीच्या आधारे परीक्षा घेण्यात येत आहे. परंतु, यापूर्वी एक, दोन, तीन या सत्राच्या अभ्यासक्रमात विद्यार्थी उत्तीर्ण नसल्यास चौथ्या सत्राच्या निकालाची गुणपत्रिका विद्यापीठ रोखत होते. सदर विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’मध्ये राहायचे. मात्र, कालांतराने विद्यार्थी उत्तीर्ण झाले की, विद्यापीठात गुणपत्रिका सादर करून निकाल ‘क्लिअर’ करायचे. यावेळी पाचही जिल्ह्यांतून पालक, विद्यार्थ्यांची होणारी गर्दी ही मोठ्या प्रमाणात असते. गुणपत्रिकांची कामे ही महाविद्यालय स्तरावर व्हावी, असा प्रस्ताव परीक्षा मंडळात मांडला गेला. या प्रस्तावाला सर्वसंमतीने मान्यता प्रदान करण्यात आली. विद्यापीठात केवळ अंतिम सत्राची गुणपत्रिका रोखून ठेवता येईल, असा निर्णय झाला. परीक्षा मंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष कुलगुरू मुरलीधर चांदेकर होते. सचिवपदी परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख होते. यावेळी प्र-कुगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा मंडळाचे संजय खडक्कार, सी.एच. जाधव, अधिष्ठाता एफ,सी रघुवंशी, अविनाश माेहरील, एस,एम. कतोरे, दिलीप निचत, वैशाली गुडधे, डॉ. राऊत आदींनी परीक्षा मंडळाचा बैठकीत सहभाग नोंदविला.

-------------

विद्यापीठ स्तरावर आता पदवीसाठी अंतिम सत्राच्या अभ्यासक्रमाची गुणपत्रिका रोखण्यात येईल. उर्वरित अन्य सत्र परीक्षांच्या गुणपत्रिका महाविद्यालयातून मिळतील, असा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची गरज नसेल.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ