शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

गुलाबी थंडी झाली आता बोचरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:42 IST

शहरासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात बोचऱ्या थंडीची लाट पसरली असून, गजबजलेले अमरावती शहर सायंकाळीच सामसूम होत असल्याची स्थिती आहे. पारा गेल्या तीन दिवसांपासून १० अंशाच्या खाली स्थिरावला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात शीतलहर : शनिवारी पारा ५.४ अंशावर, २० वर्षांतील तापमानाचा नीचांक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात बोचऱ्या थंडीची लाट पसरली असून, गजबजलेले अमरावती शहर सायंकाळीच सामसूम होत असल्याची स्थिती आहे. पारा गेल्या तीन दिवसांपासून १० अंशाच्या खाली स्थिरावला आहे.गजा या वादळाच्या प्रभावाने पंधरवड्यापूर्वी तापमानात वाढ झाली होती. त्यामुळ पावसाळ्यासारखीच थंडीही अचानक गायब होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तथापि, या वादळाचा प्रभाव ओसरताच थंडीने पुन्हा जोर धरला. तीन दिवसांपासून तापमान १० अंशाच्या खाली गेले आहे. त्यामुळे ती असह्य झाली आहे. शुक्रवारी पहाटे किमान तापमान ५.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हा गेल्या २० वर्षांतील तापमानाचा नीचांक असल्याचे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी स्पष्ट केले.नंदनवनातही पारा घसरलाचिखलदरा पर्यटन स्थळावरील पारा शनिवारी पहाटे ७ अंश सेल्सिअस नोंदविला गेला. १५ दिवसांत दुसºयांदा एवढी कमी नोंद झाली आहे. हवामान विभागानुसार उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. किमान ७ व कमाल १६ अंश सेल्सिअसपर्यंत चिखलदरा पर्यटन स्थळाचे तापमान खाली आले आहे. बोचरी थंडीपासून संरक्षणार्थ आदिवासी अंगात गरम कपडे आणि शेकोटीवर चुलीचा आसरा घेत आहेत.५ जानेवारीपर्यंत थंडी कायमसंपूर्ण विदर्भात थंडीची लाट पुढील ५ जानेवारीपर्यंत कायम राहील. तथापि, त्याची तीव्रता कमी-जास्त होईल, असा अंदाज अनिल बंड यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम किनारपट्टीवर चक्राकार वारे वाहत असल्याने मध्य महाराष्ट्रात मात्र थोडा दिलासा मिळणार आहे.अमरावती गारठलीअमरावती शहरातील रस्त्यांवर उशिरा रात्रीपर्यंत वर्दळ असते. तथापि, तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली जाताच तीन दिवसांपासून वर्दळ रोडावल्याची स्थिती आहे. एरवीही शांत राहणाºया कॉलनी परिसरात ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ असतो.