शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी थंडी झाली आता बोचरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:42 IST

शहरासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात बोचऱ्या थंडीची लाट पसरली असून, गजबजलेले अमरावती शहर सायंकाळीच सामसूम होत असल्याची स्थिती आहे. पारा गेल्या तीन दिवसांपासून १० अंशाच्या खाली स्थिरावला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात शीतलहर : शनिवारी पारा ५.४ अंशावर, २० वर्षांतील तापमानाचा नीचांक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात बोचऱ्या थंडीची लाट पसरली असून, गजबजलेले अमरावती शहर सायंकाळीच सामसूम होत असल्याची स्थिती आहे. पारा गेल्या तीन दिवसांपासून १० अंशाच्या खाली स्थिरावला आहे.गजा या वादळाच्या प्रभावाने पंधरवड्यापूर्वी तापमानात वाढ झाली होती. त्यामुळ पावसाळ्यासारखीच थंडीही अचानक गायब होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तथापि, या वादळाचा प्रभाव ओसरताच थंडीने पुन्हा जोर धरला. तीन दिवसांपासून तापमान १० अंशाच्या खाली गेले आहे. त्यामुळे ती असह्य झाली आहे. शुक्रवारी पहाटे किमान तापमान ५.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हा गेल्या २० वर्षांतील तापमानाचा नीचांक असल्याचे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी स्पष्ट केले.नंदनवनातही पारा घसरलाचिखलदरा पर्यटन स्थळावरील पारा शनिवारी पहाटे ७ अंश सेल्सिअस नोंदविला गेला. १५ दिवसांत दुसºयांदा एवढी कमी नोंद झाली आहे. हवामान विभागानुसार उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. किमान ७ व कमाल १६ अंश सेल्सिअसपर्यंत चिखलदरा पर्यटन स्थळाचे तापमान खाली आले आहे. बोचरी थंडीपासून संरक्षणार्थ आदिवासी अंगात गरम कपडे आणि शेकोटीवर चुलीचा आसरा घेत आहेत.५ जानेवारीपर्यंत थंडी कायमसंपूर्ण विदर्भात थंडीची लाट पुढील ५ जानेवारीपर्यंत कायम राहील. तथापि, त्याची तीव्रता कमी-जास्त होईल, असा अंदाज अनिल बंड यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम किनारपट्टीवर चक्राकार वारे वाहत असल्याने मध्य महाराष्ट्रात मात्र थोडा दिलासा मिळणार आहे.अमरावती गारठलीअमरावती शहरातील रस्त्यांवर उशिरा रात्रीपर्यंत वर्दळ असते. तथापि, तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली जाताच तीन दिवसांपासून वर्दळ रोडावल्याची स्थिती आहे. एरवीही शांत राहणाºया कॉलनी परिसरात ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ असतो.