शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

आता ग्रा़पं़़ निवडणुकीची व्यूहरचना संगणकावर

By admin | Updated: March 29, 2015 00:27 IST

सध्या जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले आहे.

मोहन राऊ त अमरावतीसध्या जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. आगामी निवडणुकीला ३० दिवस शिल्लक असताना आपल्या गटाचा विजय व्हावा, यासाठी ग्रामीण भागातील युवकांनी थेट संगणकावर व्यूहरचना आखली जात आहे. त्यानुषंगाने गावातील युवकांना ग्रामविकासाचा ‘मेसेज’ द्यायला सुरूवात झाली आहे़जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा तर काही तालुक्यांतील पंचायत समिती निवडणूक मागील वर्षी पार पडली. आता सहकार क्षेत्रातील निवडणुका सुरू असताना जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे़ याचा सर्वाधिक फायदा संगणकीय प्रणालीत विविध कंपन्यांनी व गावातील गटांनी घेणे सुरू केले आहे़ मोठ्या ग्रामपंचायतींच्या रहिवाशांचा मोबाईलवर अनेक मेसेज देणे सुरू केले आहे़ हा मेसेज पूर्णपणे मराठीत असल्यामुळे आपल्या गावाच्या विकासात मेसेज पाठविणाऱ्या गटाचा मोठा सहभाग असल्याचा भास आता या मतदारांना होऊ लागला आहे़ गावातील मतदारांच्या यादीप्रमाणे डाटा भरून घेतला जात आहे़ मतदाराची जात, व्यवसाय नोकरी पत्ता विशेष म्हणजे भ्रमण, दूरध्वनी क्रमांकांची नोंद या डाटात केली आहे़ याशिवाय आडनाव, घर, क्रमांक संपर्क व्यक्ती वयोमानानुसार पुरूष, स्त्री मतदारांची संख्या यात समाविष्ट आहे़ आजपर्यंत एका वॉर्डातील कुटुंबाला दुसऱ्या राजकीय गटाने किती शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला याविषयी माहिती 'अपडेट' करण्यात आली आहे़ ग्रामीण भागातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन गट एकामेकासमोर उभे राहणार असले तरी आपल्या गटात किती मतदारांचा अधिक समावेश व्हावा यासाठी बेरजेचे राजकारण आतापासून खेळले जात आहे़ विशेषता: ही हायटेक प्रणाली ग्रामीण मतदारांच्या मानसिकतेमध्ये रूजली जाऊ शकते़ हा संशोधनाचा विषय असला तरी आपल्या गावाच्या विकासाचा अथवा संबंधित सरपंच व उपसरपंच यांनी पाच वर्षांत कोणतेच काम केले नाही. याचा थेट मोबाईलवर व्हाईस मेसेज तसेच लिखित संदेश मिळत असल्यामुळे या ग्रामीण भागाचे राजकीय वातावरण खऱ्या अर्थाने तापायला सुरूवात झाली आहे़ व्हाईस मेसेजद्वारे ग्रामस्थांना थेट गावाचा विकास किती झाला अथवा संबंधित लोकप्रतीनिधींनी विकास केला किंवा नाही याचा मेसेज पोहोचत असल्यामुळे मतदार पुढील काळात जागृत होणार आहे़ युवकांमध्ये होणारी ही संगणकीय जागृती लोकशाहीसाठी न्यायिक असल्याचे मत अंजनसिंगीच्या कार्यकर्त्या पपिता मनोहरे यांनी व्यक्त केले़