शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

आता ग्रा़पं़़ निवडणुकीची व्यूहरचना संगणकावर

By admin | Updated: March 29, 2015 00:27 IST

सध्या जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले आहे.

मोहन राऊ त अमरावतीसध्या जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. आगामी निवडणुकीला ३० दिवस शिल्लक असताना आपल्या गटाचा विजय व्हावा, यासाठी ग्रामीण भागातील युवकांनी थेट संगणकावर व्यूहरचना आखली जात आहे. त्यानुषंगाने गावातील युवकांना ग्रामविकासाचा ‘मेसेज’ द्यायला सुरूवात झाली आहे़जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा तर काही तालुक्यांतील पंचायत समिती निवडणूक मागील वर्षी पार पडली. आता सहकार क्षेत्रातील निवडणुका सुरू असताना जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे़ याचा सर्वाधिक फायदा संगणकीय प्रणालीत विविध कंपन्यांनी व गावातील गटांनी घेणे सुरू केले आहे़ मोठ्या ग्रामपंचायतींच्या रहिवाशांचा मोबाईलवर अनेक मेसेज देणे सुरू केले आहे़ हा मेसेज पूर्णपणे मराठीत असल्यामुळे आपल्या गावाच्या विकासात मेसेज पाठविणाऱ्या गटाचा मोठा सहभाग असल्याचा भास आता या मतदारांना होऊ लागला आहे़ गावातील मतदारांच्या यादीप्रमाणे डाटा भरून घेतला जात आहे़ मतदाराची जात, व्यवसाय नोकरी पत्ता विशेष म्हणजे भ्रमण, दूरध्वनी क्रमांकांची नोंद या डाटात केली आहे़ याशिवाय आडनाव, घर, क्रमांक संपर्क व्यक्ती वयोमानानुसार पुरूष, स्त्री मतदारांची संख्या यात समाविष्ट आहे़ आजपर्यंत एका वॉर्डातील कुटुंबाला दुसऱ्या राजकीय गटाने किती शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला याविषयी माहिती 'अपडेट' करण्यात आली आहे़ ग्रामीण भागातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन गट एकामेकासमोर उभे राहणार असले तरी आपल्या गटात किती मतदारांचा अधिक समावेश व्हावा यासाठी बेरजेचे राजकारण आतापासून खेळले जात आहे़ विशेषता: ही हायटेक प्रणाली ग्रामीण मतदारांच्या मानसिकतेमध्ये रूजली जाऊ शकते़ हा संशोधनाचा विषय असला तरी आपल्या गावाच्या विकासाचा अथवा संबंधित सरपंच व उपसरपंच यांनी पाच वर्षांत कोणतेच काम केले नाही. याचा थेट मोबाईलवर व्हाईस मेसेज तसेच लिखित संदेश मिळत असल्यामुळे या ग्रामीण भागाचे राजकीय वातावरण खऱ्या अर्थाने तापायला सुरूवात झाली आहे़ व्हाईस मेसेजद्वारे ग्रामस्थांना थेट गावाचा विकास किती झाला अथवा संबंधित लोकप्रतीनिधींनी विकास केला किंवा नाही याचा मेसेज पोहोचत असल्यामुळे मतदार पुढील काळात जागृत होणार आहे़ युवकांमध्ये होणारी ही संगणकीय जागृती लोकशाहीसाठी न्यायिक असल्याचे मत अंजनसिंगीच्या कार्यकर्त्या पपिता मनोहरे यांनी व्यक्त केले़