शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

आता ग्रा़पं़़ निवडणुकीची व्यूहरचना संगणकावर

By admin | Updated: March 29, 2015 00:27 IST

सध्या जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले आहे.

मोहन राऊ त अमरावतीसध्या जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. आगामी निवडणुकीला ३० दिवस शिल्लक असताना आपल्या गटाचा विजय व्हावा, यासाठी ग्रामीण भागातील युवकांनी थेट संगणकावर व्यूहरचना आखली जात आहे. त्यानुषंगाने गावातील युवकांना ग्रामविकासाचा ‘मेसेज’ द्यायला सुरूवात झाली आहे़जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा तर काही तालुक्यांतील पंचायत समिती निवडणूक मागील वर्षी पार पडली. आता सहकार क्षेत्रातील निवडणुका सुरू असताना जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे़ याचा सर्वाधिक फायदा संगणकीय प्रणालीत विविध कंपन्यांनी व गावातील गटांनी घेणे सुरू केले आहे़ मोठ्या ग्रामपंचायतींच्या रहिवाशांचा मोबाईलवर अनेक मेसेज देणे सुरू केले आहे़ हा मेसेज पूर्णपणे मराठीत असल्यामुळे आपल्या गावाच्या विकासात मेसेज पाठविणाऱ्या गटाचा मोठा सहभाग असल्याचा भास आता या मतदारांना होऊ लागला आहे़ गावातील मतदारांच्या यादीप्रमाणे डाटा भरून घेतला जात आहे़ मतदाराची जात, व्यवसाय नोकरी पत्ता विशेष म्हणजे भ्रमण, दूरध्वनी क्रमांकांची नोंद या डाटात केली आहे़ याशिवाय आडनाव, घर, क्रमांक संपर्क व्यक्ती वयोमानानुसार पुरूष, स्त्री मतदारांची संख्या यात समाविष्ट आहे़ आजपर्यंत एका वॉर्डातील कुटुंबाला दुसऱ्या राजकीय गटाने किती शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला याविषयी माहिती 'अपडेट' करण्यात आली आहे़ ग्रामीण भागातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन गट एकामेकासमोर उभे राहणार असले तरी आपल्या गटात किती मतदारांचा अधिक समावेश व्हावा यासाठी बेरजेचे राजकारण आतापासून खेळले जात आहे़ विशेषता: ही हायटेक प्रणाली ग्रामीण मतदारांच्या मानसिकतेमध्ये रूजली जाऊ शकते़ हा संशोधनाचा विषय असला तरी आपल्या गावाच्या विकासाचा अथवा संबंधित सरपंच व उपसरपंच यांनी पाच वर्षांत कोणतेच काम केले नाही. याचा थेट मोबाईलवर व्हाईस मेसेज तसेच लिखित संदेश मिळत असल्यामुळे या ग्रामीण भागाचे राजकीय वातावरण खऱ्या अर्थाने तापायला सुरूवात झाली आहे़ व्हाईस मेसेजद्वारे ग्रामस्थांना थेट गावाचा विकास किती झाला अथवा संबंधित लोकप्रतीनिधींनी विकास केला किंवा नाही याचा मेसेज पोहोचत असल्यामुळे मतदार पुढील काळात जागृत होणार आहे़ युवकांमध्ये होणारी ही संगणकीय जागृती लोकशाहीसाठी न्यायिक असल्याचे मत अंजनसिंगीच्या कार्यकर्त्या पपिता मनोहरे यांनी व्यक्त केले़