शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

आता २०२२ मध्ये होणार देशभरातील व्याघ्र प्रगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:09 IST

चार टप्पे निश्चित, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय अमरावती : दर चार वर्षानी वाघांची प्रगणना केली जाते. आता पुढील ...

चार टप्पे निश्चित, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय

अमरावती : दर चार वर्षानी वाघांची प्रगणना केली जाते. आता पुढील वर्षी सन २०२२ मध्ये देशभरात व्याघ्र प्रगणना होणार असून त्याकरिता चार टप्पे निश्चित करण्यात आले आहे. प्रगणनेचे वेळापत्रकदेखील जाहीर करण्यात आले आहे. जून २०२१ ते जुलै २०२२ या दरम्यान प्रगणना करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय व्याघ्र गणना ही सन २०२२ साठी होऊ घातली आहे. त्याकरिता सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात पूर्ण करावयाची आहे. एनटीसीएने या प्रगणनेसाठी १० ते २० किमी.चे अंतर घटक मानले आहे. यात मांस प्राण्यांच्या खाणाखुणांचे सर्वेक्षण, तृणभक्षी प्राणी, वनस्पती व मानवी हस्तक्षेप, जमिनीवरील आच्छादन आणि तृणभक्षी प्राण्यांच्या लेंडयांचे सर्वेक्षण करण्याचे निश्चित केले आहे. या एकूणच सर्वेक्षणाचे टप्पे देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्था ही उपग्रह माहितीवरुन प्रत्येक लॅंन्डस्केपच्या वैशिष्ट्याबाबतची माहिती गोळा करून पृथकरण केले जाणार आहे. या माहितीच्या आधारे टप्प्याची आखणी केली जाईल. त्यानंतर कॅमेरा ट्रॅपच्या सहाय्याने वाघाची घनता काढण्यात येईल. सॉफ्टवेअरच्या मदतीने तृणभक्षी प्राण्याची घनता मोजण्याच्या सूचना वनाधिकारी, कर्मचाऱ्या्ंना देण्यात आल्या आहेत. सन- २०१८ च्या व्याघ्र प्रगणनेनुसार देशात २३५० पट्टेदार वाघांची संख्या असल्याची नोंद करण्यात आली आहे. आता सन २०२२ मध्ये होणाऱ्या व्याघ्र प्रगणनेनुसार वाघांच्या संख्येत किती वाढ होते, याकडे लक्ष लागले आहे.

--------------

ट्रॅप कॅमेऱ्याची महत्वाची भूमिका

कॅमेरा ट्रॅपींगसाठी संरक्षित क्षेत्राचे आकारमान ४०० चौरस किे.मी. ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ब्लॉक निहाय कॅमेरा ट्रॅपींग करावे लागणार आहे. ग्रीडमध्ये वाघाचा वावर असणाऱ्या पायवाटावर दोन्ही बाजूस कॅमेरा ट्रॅपींग करावे लागणार आहे. प्रत्येक ग्रीडला २००६ च्या प्रगणनेत वापरलेला विशिष्ट कोट वापरावा लागणार आहे. ज्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅपींग शक्य नाही, त्या ठिकाणी वाघांची विष्ठा गोळा करुन वनकर्मचाऱ्यांना पृथककरणासाठी पाठवावे लागणार आहे.

--------------------

कोट

राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची बैठक दोन दिवसांपूर्वीच पार पडली. यात व्याघ्र प्रगणनेचे चार टप्पे निश्चित करण्यात आले आहे. जून २०२१ ते जुलै २०२२ पर्यंत व्याघ्र प्रगणना होणार आहे. अद्यावत प्रणालीचा वापर करण्यात येईल.

- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मुंबई