शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

आता २०२२ मध्ये होणार देशभरातील व्याघ्र प्रगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:10 IST

चार टप्पे निश्चित, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय अमरावती : दर चार वर्षानी वाघांची प्रगणना केली जाते. आता पुढील ...

चार टप्पे निश्चित, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय

अमरावती : दर चार वर्षानी वाघांची प्रगणना केली जाते. आता पुढील वर्षी सन २०२२ मध्ये देशभरात व्याघ्र प्रगणना होणार असून, त्याकरिता चार टप्पे निश्चित करण्यात आले आहे. प्रगणनेचे वेळापत्रकदेखील जाहीर करण्यात आले आहे. जून २०२१ ते जुलै २०२२ या दरम्यान प्रगणना करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय व्याघ्र गणना ही सन २०२२ साठी होऊ घातली आहे. त्याकरिता सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात पूर्ण करावयाची आहे. एनटीसीएने या प्रगणनेसाठी १० ते २० किमीचे अंतर घटक मानले आहे. यात मांसभक्षी प्राण्यांच्या खाणाखुणांचे सर्वेक्षण, तृणभक्षी प्राणी, वनस्पती व मानवी हस्तक्षेप, जमिनीवरील आच्छादन आणि तृणभक्षी प्राण्यांच्या लेंड्यांचे सर्वेक्षण करण्याचे निश्चित केले आहे. देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडून उपग्रहाद्वारे प्रत्येक लँडस्केपच्या वैशिष्ट्याबाबतची माहिती गोळा करून पृथ:करण केले जाणार आहे. या माहितीच्या आधारे सर्वेक्षण टप्प्यांची आखणी केली जाईल. त्यानंतर कॅमेरा ट्रॅपच्या साहाय्याने वाघांची घनता काढण्यात येईल. सॉफ्टवेअरच्या मदतीने तृणभक्षी प्राण्यांची घनता मोजण्याच्या सूचना वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सन २०१८ च्या व्याघ्र प्रगणनेनुसार देशात पट्टेदार वाघांची संख्या २३५० असल्याची नोंद करण्यात आली. आता सन २०२२ मध्ये होणाऱ्या व्याघ्र प्रगणनेनुसार वाघांच्या संख्येत किती वाढ होते, याकडे लक्ष लागले आहे.

--------------

ट्रॅप कॅमेऱ्याची महत्त्वाची भूमिका

कॅमेरा ट्रॅपिंगसाठी संरक्षित क्षेत्राचे आकारमान ४०० चौरस किमी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ब्लॉकनिहाय कॅमेरा ट्रॅपिंग करावे लागणार आहे. ग्रीडमध्ये वाघाचा वावर असणाऱ्या पायवाटावर दोन्ही बाजूस कॅमेरा ट्रॅपिंग करावे लागणार आहे. प्रत्येक ग्रीडला २००६ च्या प्रगणनेत वापरलेला विशिष्ट कोट वापरावा लागणार आहे. ज्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅपिंग शक्य नाही, त्या ठिकाणी वाघांची विष्ठा गोळा करून वनकर्मचाऱ्यांना ती पृथ:करणासाठी पाठवावी लागणार आहे.

--------------------

कोट

राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची बैठक दोन दिवसांपूर्वीच पार पडली. यात व्याघ्र प्रगणनेचे चार टप्पे निश्चित करण्यात आले आहे. जून २०२१ ते जुलै २०२२ पर्यंत व्याघ्र प्रगणना होणार आहे. यात अद्ययावत प्रणालीचा वापर करण्यात येईल.

- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मुंबई