शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

नोटपॅड, टॅबच्या जमान्यात पाटीचा पडला विसर

By admin | Updated: July 7, 2015 00:09 IST

पूर्वीच्या काळात दप्तर आणि पाटी विद्यार्थ्यांची खरी ओळख मानली जात असे.

विद्यार्थ्यांची खरी ओळख अडगळीत : अक्षरातूनच होतेय शैक्षणिक भविष्यरोशन कडू तिवसापूर्वीच्या काळात दप्तर आणि पाटी विद्यार्थ्यांची खरी ओळख मानली जात असे. मात्र संगणक युगात ही खरी ओळख पुसली जाण्याच्या मार्गावर आहे. पाटीवर लिहिलेली अक्षरे पुसता येत नाही. मात्र या गिरवलेल्या अक्षरातूनच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य आकाराला येत होते. नोटपॅड आणि टॅबच्या विद्यार्थ्यांच्या आग्रहापुढे पालकांनादेखील पाटीचा विसर पडला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील विद्यार्थ्यांची खरी ओळख असणारी पाटी अडगळीत पडण्याची भीती निर्माण झाली आहे. पाटीवर ‘अ ब क ड’, ‘ग म भ न’ काढून अभ्यासाचा श्रीगणेशा केला जात असे. मात्र संगणक युगात ही पाटी ‘कोरीच’ राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘क’, ‘ख’, ‘ग’ पासून पाढे, गणित या पाटीमुळेच विद्यार्थ्यांना समजत असत. आता या पाट्यांची जागा वह्या व टॅबने घेतली आहे. या पाटीवर सराव करता करता सुवाच्य अक्षराचा कित्सा आपोआप गिरवला जात होता. शाळा सुरु होण्यापूर्वीच शालेय साहित्याची खरेदी सुरु होते. या सर्व साहित्यामधून पाटी मात्र अडगळीत पडली आहे. याबाबत शालेय साहित्य विक्रेत्याला विचारणा केली असता पूर्वीच्या तुलनेत पाटीची मागणी कमी झाल्याचे सांगितले. आता विद्यार्थी पहिलीपासूनच पाटी वापरत नाहीत. बहुतांश विद्यार्थी वऱ्ह्या किंवा दोन वऱ्ह्यांचा वापर करीत आहेत. मराठी शाळांमधून अजूनही पहिली व दुसरीचे विद्यार्थी पाटीचा वापर करतात. या पाटीची काळजी घेतली जात असे. पाटी स्वच्छ करण्यासाठी कोश्याचा किंवा ओल्या रबरचा वापर केल्या जात असे. काही वर्षांनंतर पाटीचा वापर कमी कमी होत गेला. या पाटीचा संबंध मानवी जीवनाशी इतक जोडला गेला की, एखाद्याची पाटी कोरी राहिली, अशी म्हण रुढ झाली. आता मात्र ही पाटी खरोखरच कोरी राहणार आहे. पाटी रूपडे पालटते आहेकाळानुरुप पाटीसुद्धा आपले रूप पालटत आहे. सध्या बाजारपेठेत ४० रुपयांपासून पाट्या उपलब्ध आहेत. राजा स्लेट, साधी प्लेट असे दोन प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. सर्वांना जुनी खापराची पाटी आठवते. ही पाटीच सध्या दुकानातून नामशेष झाली आहे. दोन दशकांपूर्वी कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाची सुरुवात या खापराच्या पाटीपासून मुळाक्षरे गिरवून होत असे. मराठीची पाटी फुटलीअस्तित्वात असलेल्या मराठी शाळांना अव्हेरुन गल्लीबोळात इंग्रजी शाळा बोकाळल्या आहेत. शासनाने इंग्रजी शाळांना परवानगी देण्याचा सपाटा लावला आहे. पालकांना वेगवेगळी आमिषे दाखवून मराठी शाळांतील विद्यार्थी पळविण्याचा सपाटा या इंग्रजी शाळांनी लावला आहे. त्यामुळे मराठी शाळा दिवसेंदिवस ओस पडू लागल्या आहेत.