शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

से नो टू सेल्फी ! शिक्षकांची नकारघंटा

By admin | Updated: November 14, 2016 00:17 IST

परजिल्ह्यातून वा परराज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित होणारे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहावेत, ...

शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम : शिक्षण विभागाचा कसोशीचा प्रयत्नअमरावती : परजिल्ह्यातून वा परराज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित होणारे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहावेत, यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी काढून सरल पणालीवर 'अपलोड' करावे लागेल. मात्र, दर सोमवारी हा उपक्रम करावा लागणार असल्याने शिक्षकांनी ‘से नो टू सेल्फी’ची मोहीमच उभारली आहे.राज्य शासनाने दोन वर्षांपासून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविली आहे. शिक्षणापासून वंचित मुलांना शाळांमध्ये आणण्यासाठी शिक्षण विभाग कसोशीने प्रयत्न करीत आहे. मात्र, राज्यातील स्थलांतरित मुले अन्य राज्यातून स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबासह येणारी मुले, शाळा परिसरात वास्तव्यास आहेत. अनियमित असलेली मुले शिक्षणापाून दूर राहण्याची भीती शासनाला आहे. हे टाळण्यासाठी 'सेल्फी विथ स्टुडंट' अशी मोहीम आखली आहे. अशा विद्यार्थ्यांना शाळांमध्ये टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर सेल्फीद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. जानेवारीपासून हे विद्यार्थी शाळांमध्ये आणले जातील, तो हा वर्गशिक्षकांनी त्यांच्याबरोबर दहाच्या गटाने सेल्फी काढायचे आहेत. त्यांची नावे आणि आधारकार्ड क्रमांक सरल प्रणालीमध्ये अपलोड करायचे आहेत. यातून अनिमित विद्यार्थ्यांची संख्या निश्चित होऊन त्यांना शाळांमध्ये नियमित करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मात्र या ‘सेल्फी’ प्रयोगाला बहुतांश शिक्षक आणि संघटनांनी नाक मुरडले आहे. दर सोमवारी दहा विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांचा हा व्याप वाढणार असल्याने आता खिचडीसोबत अ‍ॅन्ड्रॉईड मोबाइलमधूनच फोटो सेशन करायचे का? असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांची अनुपस्थिती, गळती आणि सेल्फीचा दुरान्वये संबंध नसल्याचा दावा करून या प्रक्रियेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा वेळ नाहक वाया जाईल. ही माहिती सरलमध्ये अपडेट करण्यासाठी शिक्षकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याचे संघटनांचे प्रतिनिधिक मत आहे. (प्रतिनिधी)मुख्याध्यापक, शिक्षकांना आर्थिक भुर्दंड कशासाठी ?संचमान्यतेसाठी आवश्यक असलेली माहिती सरलमध्ये भरणे, टीसी, शिक्षकांची माहिती, शाळेतील सर्व सुविधा मध्यान्ह भोजन अशा सर्व माहिती आॅनलाईन भरणे अनिवार्य आहे. शिष्यवृत्ती अर्ज, इन्स्पायर अवॉर्ड, स्वच्छ भारत विद्यालय योजना, शालांत प्रणाली असे एक ना अनेक कामे शिक्षक-मुख्याध्यापकांना करावी लागतात. शाळास्तरावर संगणक, इंटरनेट उपलब्ध नसल्याने आणि शासनाने आदिल खर्च बंद केल्याने त्याचा आर्थिक भुर्दंड मुख्याध्यापक आणि शाळा शिक्षकांना सहन करावा लागतो. आज सेल्फीचा भर पडल्याने शिक्षकांमध्ये नकारात्मक सूर उमटला आहे.