शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST

अमरावती : जिल्ह्यातील अतिवृष्टिग्रस्त परिसरात पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे. पंचनामे परिपूर्ण, सविस्तर व गतीने पूर्ण करावेत. एकही बाधित ...

अमरावती : जिल्ह्यातील अतिवृष्टिग्रस्त परिसरात पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे. पंचनामे परिपूर्ण, सविस्तर व गतीने पूर्ण करावेत. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले.

अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे पालकमंत्र्यांकडून पाठपुरावा होत असून, जिल्ह्यातील प्रत्येक बाधित शेतकरी बांधवाला भरपाई मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे.

नुकसानीचा तपशील अचूक नोंदवा

जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार संतोष काकडे, तहसीलदार नीता लबडे यांच्यासह पथकाने नुकसानग्रस्त भागात पाहणी व पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अमरावती तालुक्यात ब्राम्हणवाडा भगत, देवरा पुनर्वसन, शिराळा परिसरात पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. घरांची पडझड, शेतीपिकांचे नुकसान आदींबाबत प्रत्येक तपशील अचूक नोंदवा. शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. भातकुली तालुक्यात साऊर, रामा येथे घराच्या पडझडीबाबत पंचनामे सुरू झाले. साऊर येथे दीडशे घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्रथमदर्शनी अहवाल आहे. नुकसानाबाबत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतीचे पंचनामेही सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार नीता लबडे यांनी दिली.

शेतीच्या नुकसानाचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा

घरांच्या पडझडीची पंचनाम्याद्वारे नोंद घेतानाच शेतीपीकाच्या नुकसानाचे पंचनामेही तात्काळ पूर्ण करावेत. कृषिसहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून ही प्रक्रिया गतीने राबवा. जिल्ह्यातील अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून, शेतकरी बांधवांना योग्य भरपाई मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ना. ठाकूर यांना दिली.

कोरोनाकाळात शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी बांधव अडचणीत आहेत. त्यात अतिवृष्टीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवली आहे. शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे. प्रशासनाने संवेदनशीलता बाळगून शेतकरी बांधवांची सुसंवाद साधून प्रत्येक नुकसानाची अचूक दखल घेत पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.