शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पदाधिकाऱ्यांची लागणार कसोटी

By admin | Updated: April 26, 2017 00:19 IST

जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकाऱ्यांची इनिंग सुरू झाली आहे. तीन सभापतींनी कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांची वर्दळही वाढली.

जिल्हा परिषद : दुसऱ्या फळीतील नेत्यांची वर्दळ वाढली, आकांक्षापूर्तीसाठी करावी लागणार पराकाष्टा अमरावती : जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकाऱ्यांची इनिंग सुरू झाली आहे. तीन सभापतींनी कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांची वर्दळही वाढली. एकाचा अपवाद वगळता इतर सर्व पदाधिकारी नवीन आहेत. बोटावर मोजण्याइतकेच अनुभवी असल्याने त्यांची कसोटी लागणार आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी अशी संयुक्त सत्ता स्थापन झाली. अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे गेले. सभापतीपदांसाठी प्रत्येकाच्या वाटणीला एक पद आले. नवीन पदाधिकारी नवखे आहेत यामुळे जिल्हा परिषदेचा गाडा हाकलताना नवोदितांची कसोटी लागणार आहे. प्रशासनावर वचक ठेवत त्यांना जिल्ह्यातील जनतेच्या आकांक्षांची स्वप्नपूर्ती करावी लागणार आहे. त्यात राज्य व केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपातील विरोधकांनाही तोंड द्यावे लागणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती नवखे असले तरी त्यांच्या पाठीमागे मातब्बर नेते आहेत तथापी तीन पक्षांची मोट बांधून सत्ता स्थापन झाल्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींचे नेमके नेते कोण असा प्रश्न चर्चिला जात आहे. काँग्रेसमध्ये नेत्यांची मांदियाळी आहे. भाजपामध्ये नव्याने अनेक नेते तयार झाले. राष्ट्रवादीतही पूर्वीसारखे एक खांबी नेतृत्व उरले नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती निवडीच्या दिवशी व पदग्रहणापर्यंत या तिन्ही पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांची जिल्हा परिषदेत गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)अंतिम शब्द कोणत्या पक्षाचा ?काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात मातब्बर नेते आहेत. पदाधिकाऱ्यांसाठी अंतिम राहणार आहे. जिल्हा परिषदेवर तीन पक्षांची आघाडी आहे. सध्या तीन तिघाडा काम बिघाडा, अशी स्थिती आहे. राज्य व देशात एकमेकांविरुद्ध असलेले पक्ष सत्तेसाठी एकत्र आल्याने जिल्हा परिषदेचा गाडा हाकलताना नव्या आणि नवख्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कसोटी लागण्याचे संकेत आहेत. विरोधकांचा राहणार वचकनवीन पदाधिकारी व प्रशासनावर आक्रमक विरोधकांचा वचक राहणार आहे. राज्य व केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप पक्ष विरोधात असल्याने सत्तेसाठी एकत्र आलेल्या तीन पक्षांच्या पदाधिकारी, सदस्यांना त्यांचा विरोध मोडून काढणे कठीण जाणार आहे. सत्ताधारी तीन पक्षांचे सदस्य सभागृहात किती एकत्रितपणे राहतात, यावर सभागृहाचे कामकाज अवलंबून असणार आहे. तीन पक्षांच्या सदस्यांनी एकमेकांकडे पाठ फिरविल्यास विरोधक आक्रमकपणे त्यांच्यावर तुटून पडतील यात शंका नाही. त्यामुळे यावेळी प्रथमच सत्ताधाऱ्यांपेक्षा प्रशासनावर आक्रमक विरोधकांचा वचक राहण्याची शक्यता बळावली आहे.