शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

नवीन पदाधिकाऱ्यांची लागणार कसोटी

By admin | Updated: April 26, 2017 00:19 IST

जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकाऱ्यांची इनिंग सुरू झाली आहे. तीन सभापतींनी कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांची वर्दळही वाढली.

जिल्हा परिषद : दुसऱ्या फळीतील नेत्यांची वर्दळ वाढली, आकांक्षापूर्तीसाठी करावी लागणार पराकाष्टा अमरावती : जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकाऱ्यांची इनिंग सुरू झाली आहे. तीन सभापतींनी कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांची वर्दळही वाढली. एकाचा अपवाद वगळता इतर सर्व पदाधिकारी नवीन आहेत. बोटावर मोजण्याइतकेच अनुभवी असल्याने त्यांची कसोटी लागणार आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी अशी संयुक्त सत्ता स्थापन झाली. अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे गेले. सभापतीपदांसाठी प्रत्येकाच्या वाटणीला एक पद आले. नवीन पदाधिकारी नवखे आहेत यामुळे जिल्हा परिषदेचा गाडा हाकलताना नवोदितांची कसोटी लागणार आहे. प्रशासनावर वचक ठेवत त्यांना जिल्ह्यातील जनतेच्या आकांक्षांची स्वप्नपूर्ती करावी लागणार आहे. त्यात राज्य व केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपातील विरोधकांनाही तोंड द्यावे लागणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती नवखे असले तरी त्यांच्या पाठीमागे मातब्बर नेते आहेत तथापी तीन पक्षांची मोट बांधून सत्ता स्थापन झाल्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींचे नेमके नेते कोण असा प्रश्न चर्चिला जात आहे. काँग्रेसमध्ये नेत्यांची मांदियाळी आहे. भाजपामध्ये नव्याने अनेक नेते तयार झाले. राष्ट्रवादीतही पूर्वीसारखे एक खांबी नेतृत्व उरले नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती निवडीच्या दिवशी व पदग्रहणापर्यंत या तिन्ही पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांची जिल्हा परिषदेत गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)अंतिम शब्द कोणत्या पक्षाचा ?काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात मातब्बर नेते आहेत. पदाधिकाऱ्यांसाठी अंतिम राहणार आहे. जिल्हा परिषदेवर तीन पक्षांची आघाडी आहे. सध्या तीन तिघाडा काम बिघाडा, अशी स्थिती आहे. राज्य व देशात एकमेकांविरुद्ध असलेले पक्ष सत्तेसाठी एकत्र आल्याने जिल्हा परिषदेचा गाडा हाकलताना नव्या आणि नवख्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कसोटी लागण्याचे संकेत आहेत. विरोधकांचा राहणार वचकनवीन पदाधिकारी व प्रशासनावर आक्रमक विरोधकांचा वचक राहणार आहे. राज्य व केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप पक्ष विरोधात असल्याने सत्तेसाठी एकत्र आलेल्या तीन पक्षांच्या पदाधिकारी, सदस्यांना त्यांचा विरोध मोडून काढणे कठीण जाणार आहे. सत्ताधारी तीन पक्षांचे सदस्य सभागृहात किती एकत्रितपणे राहतात, यावर सभागृहाचे कामकाज अवलंबून असणार आहे. तीन पक्षांच्या सदस्यांनी एकमेकांकडे पाठ फिरविल्यास विरोधक आक्रमकपणे त्यांच्यावर तुटून पडतील यात शंका नाही. त्यामुळे यावेळी प्रथमच सत्ताधाऱ्यांपेक्षा प्रशासनावर आक्रमक विरोधकांचा वचक राहण्याची शक्यता बळावली आहे.