शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

भक्ती, संस्कारांच्या बळावर घडेल नवी पिढी

By admin | Updated: October 31, 2015 01:08 IST

भावी पिढी संस्कारक्षम घडवायची असेल तर महिलांनी आपल्या अपत्यावर भक्ती व प्रार्थनेचा संस्कार करावा तरच सक्षम पिढी तयार होईल,

पुष्पा बोंडे : गुरूकुंजात महिला संमेलनाचे उद्घाटनगुरुकुंज मोझरी : भावी पिढी संस्कारक्षम घडवायची असेल तर महिलांनी आपल्या अपत्यावर भक्ती व प्रार्थनेचा संस्कार करावा तरच सक्षम पिढी तयार होईल, असे प्रतिपादन पुष्पा बोंडे यांनी ४७ व्या पुण्यतिथी महोत्सवातील महिला संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून केले. यावेळी ‘मी मंजुळा बोलतेय’ हा लक्षवेधी कार्यक्रम महिला संमेलनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. याप्रसंगी मंचावर हर्षलकुमार चिपळूनकर, श्रीमती उषाताई हजारे, सरपंच विद्या बोडखे, अनुराधा प्रवीण पोटे, वसुंधरा अनिल बोंडे, पद्मा दिलीप निंबोरकर, शैलजा गावंडे, भारती पाचघरे, शशीकला नागमोते, आशा बोरडकर, श्रीमती द्वारकाबाई गोहत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. बोंडे पुढे म्हणाल्या की, युवापिढीवर भक्ती व प्रार्थनेचा संस्कार नसल्यामुळे त्यांच्यातील वासना वारंवार जागृत होऊन त्यांच्यात विकृती निर्माण झालेली आहे. म्हणून महिलांनी स्वत:च्या सक्षमीकरणाबरोबर आपल्या पाल्यावर संस्कार करावे. शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी असे तुकाराम महाराज म्हणतात. त्यामुळे महिलांनी गर्भावस्थेतच स्वत:वर चांगले संस्कार करून घेणे महत्त्वाचे आहे. माणूस वयाने किती मोठा झाला याला महत्त्व नसून त्यांच्यात सद्गुण किती आहे हे महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जण समजून घेत होता. परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती वाढल्यामुळे कुटुंबातील आपुलकीची भावना कमी झाली असून नैराश्य वाढले आहे. आजची युवापिढी विज्ञानाने घेतलेल्या झेपमुळे सतत मोबाईलवर असतात. परंतु हे वलय भौतिक सुखाचे असून अंतरंगात ध्यान व चिंतनाचे संस्कार होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने माणूस निर्माण होणार नाही. माणूस निर्माण होण्यासाठी डोळसबुद्धीने ग्रामगीतेचे संस्कार आचरणात आणावे लागेल. या मेळाव्याला वसुधा बोंडे, शैलजा गावंडे, भारती पाचघरे, उषाताई हजारे यांनीही मार्गदर्शन केले. या मेळाव्यात उदारामजी शेलोटकर व सहपत्नीक ऋतुजा ठाकरे, श्याम देऊळकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ऋतुजा भोयर हिने ‘मी मंजुळा बोलतेय’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मेळाव्याचे प्रास्ताविक विभा वाडेकर यांनी केले. संचालन सविता तायडे व आभार राधिका चौधरी यांनी केले.