शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

नवा निर्णय अधिक्रमित, जुन्याच निकषाने कपाशीला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:38 IST

गुलाबी बोंडअळीच्या नुकसानासाठी शासनाने पीक कापणी प्रयोगाअंती मंडळनिहाय ३३ टक्क्यावर बाधित क्षेत्राला ‘एनडीआरएफ’ निकष ग्राह्य धरून मदतीचा निर्णय जाहीर केला होता.

ठळक मुद्देगुलाबी बोंडअळीचे नुकसान : जिल्ह्यात २.२० लाख शेतकऱ्यांना १८३ कोटींची मिळणार मदत

आॅनलाईन लोकमतअमरावती : गुलाबी बोंडअळीच्या नुकसानासाठी शासनाने पीक कापणी प्रयोगाअंती मंडळनिहाय ३३ टक्क्यावर बाधित क्षेत्राला ‘एनडीआरएफ’ निकष ग्राह्य धरून मदतीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, जिल्ह्यासह राज्यात याला कडाडून विरोध झाल्याने १७ मार्चला शासनाने जुना निर्णय अधिक्रमित केल्याने आता जुन्याच निकषानुसार २ लाख २० हजार २६५ शेतकºयांना १८२ कोटी ६० लाखांची मदत मिळणार आहे.शासनाच्या ७ डिसेंबरच्या आदेशान्वये जिल्ह्यात बोंड अळीमुळे ३३ टक्क्यांवर बाधित क्षेत्राचे संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १८३ कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला. आता १७ फेब्रुवारीला महसूल विभागाने पीक कापणी प्रयोगानंतर मंडळनिहाय अहवाल मागविला. यामध्ये १०२ कोटींचे नुकसान दाखविण्यात आले. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड संतप्त झाले. त्यामुळे शासनाने हा निर्णय अधिक्रमित केला. या निर्णयाने पाच तालुक्यांतील शेतकरी मदतीपासून वंचित राहणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले. यावर आ. यशोमती ठाकूर व आ. वीरेंद्र जगताप यांनी जिल्हाधिकाºयांना जाब विचारला होता तसेच हा मुद्दा विधानसभेत लावून धरला होता.सात फेब्रुवारीच्या आदेशानुसार जिल्हास्थितीशासनाने ७ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन ३३ टक्क्यांवर बाधित कपाशीचा संयुक्त स्वाक्षरीसह शेतकºयांना मदतीसाठी आवश्यक निधीचा अहवाल मागितला. यासाठी बाधित पिकांत शेतकरी उभा असलेले ‘जीपीएस’ इनबिल्ट फोटो मोबाइल अ‍ॅपच्या साहाय्याने काढण्यात आले. यामध्ये २,२०,२६५ शेतकºयांच्या २,२२,५८६ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १,९९,१७२ हेक्टरमधील कपाशी बाधित झाले असल्याचे निष्पन्न झाले.१७ फेब्रुवारीच्या आदेशान्वये जिल्हास्थितीमहसूल विभागाने १७ फेब्रुवारीला पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन पीक विमा योजनेंतर्गत कपाशीचे पीक कापणी प्रयोगाअंती ३३ टक्क्यांवर बाधित मंडळाचा अहवाल मागितला. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ४६ महसूल मंडळांत १ लाख १९ हजार ४१० शेतकऱ्यांच्या १ लाख १० हजार ९०० हेक्टर क्षेत्रात ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याने १०३ कोटी ६४ लाख २ हजार ५९० रुपयांच्या निधीची मागणी केली होती.