शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

निष्पक्षपणा महत्त्वाचा

By admin | Updated: August 28, 2015 00:36 IST

पोलिसांनी बंदुकीतून डागलेल्या छर्ऱ्यांमुळे माहुलीतील दोघांच्या शरीराची अक्षरश: चाळणी झाली आहे.

दोघांच्या शरीराची चाळणी : डोके, छाती, पोटात डझनभर छर्रे गणेश देशमुख अमरावतीपोलिसांनी बंदुकीतून डागलेल्या छर्ऱ्यांमुळे माहुलीतील दोघांच्या शरीराची अक्षरश: चाळणी झाली आहे. ते दोघेही मृत्युशी झुंज देत आहेत. नि:शस्त्र माहुलीवासीयांवर चित्रपटात शोभावेत असे हे वार लख्मी गौतम यांच्या प्रमुख नेतृत्त्वातील पोलीस दलाने केलेत. महाभारतकालीन संस्कृती आणि संतांच्या विचारवैभवाने ल्यालेल्या शालीन जिल्ह्यातील या भीतीदायक प्रकारानंतर अवघे समाजमन अस्वस्थ आहे. माहुली या गावात २५ आॅगस्ट रोजी पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. खुनशी मानसिकतेतून डागावेत तसेच सामान्य आणि असाहाय नागरिकांवर पोलिसांनी छर्रे डागलेत. अवघा गाव ओरडून ओरडून या वेदना कथन करीत असताना मात्र आम्ही फायर केलेच नाही, असे साफ खोटे विधान पोलीस अधीक्षक लख्मी गौतम यांनी घटनेच्या दिवशी ताठ मानेने वारंवार केले. जसे लोकांना खोटे पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला तसाच लोकनेते, दंडाधिकारी आणि मीडियालाही फसवी माहिती दिली. माहुली गावात पोलिसांनी खेळलेला दहशतीचा हा खेळ एव्हाना लपूनच राहील, असा ग्रामीण पोलिसांचा कयास असावा. तथापि, रक्षक असलेल्या पोलिसांवर गुंडगिरीचे खुलेआम आरोप होऊ लागलेत, अवघा गाव पोलिसांनी माजविलेल्या दहशतीचे चित्रण जगासमोर करू लागला, त्यावेळी मात्र जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख लख्मी गौतम नरमले. पोलिसांनी फायर केले, अशी कबुली त्यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी मीडियाला दिली. ती ही ज्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याची तसदी घेतली त्यांनाच. इतक्या भयावह घटनेनंतर स्वत:हून पत्रपरिषद बोलविण्याचेही सौजन्यही त्यांनी दाखविले नाही. लोकमनातील संदिग्धता दूर करण्यासाठी, पोलिसांची भूमिका मांडण्यासाठी, अशी पत्रपरिषद घेण्याचा पायंडा तमाम वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी राज्यभर अनेकवेळा घालून दिला आहे.ही तर परिसीमाच!बळाचा वापर करण्याची कुठलीही गरज नसताना तो करण्यात आला. असा वापर करतानाचे नियम पाळण्यात आलेत काय, हा खरा खोलात शिरण्याचा मुद्दा आहे. पोलिसांना फारच निकड वाटल्यास प्रथम अश्रुधुराची नळकांडी उडविली जातात. हाती आलेल्या माहितीनुसार, माहुलीच्या घटनेत प्रथम बेसावध नागरिकांवर लाठीहल्ला करण्यात आला. त्याचा ना इशारा देण्यात आला, ना इरादा दर्शविण्यात आला. एकदा लाठीमार आरंभल्यानंतर अश्रुधुराची नळकांडी फोडण्याची गरज होती काय? जाणकारांच्या मते नाही. पण अश्रुधुराची नळकांडीही उडविली गेली. तीदेखील कालबाह्य झालेली. लाठीमार आणि अश्रुधुराची कारवाई केल्यावर 'शॉट फायर' करण्याची गरज उरावी काय, हा गंभीर प्रश्नही उपस्थित होतो. गावकरी सांगतात, सैरावैरा पळणाऱ्यांना पोलिसांनी पकडून पकडून खाली पाडले नि त्यांच्या छाताडावर बंदुका रोखल्या. डोक्यात, छातीत, पोटात छर्रे डागले. गावकऱ्यांचे हे आरोप खरे की, खोटे यावर खल होईल खरी; पण दंडाधिकारीय चौकशीत असा आरोप करणाऱ्या गावकऱ्यांच्या साक्षी नोंदविणे ही निकोप प्रशासन व्यवस्थेसाठीची गरज आहे. फायरींगचा एक साधा नियम सर्वांनाच परिचित आहे- कमरेखाली फायर करण्याचा. या घटनेतील गंभीर जखमींच्या डोक्यात, छातीत, पोटात छर्रे शिरले आहेत. गावकऱ्यांचा आरोप त्यामुळे वास्तवाकडे कलणारा वाटतो. गावकऱ्यांनी केलेली जाळपोळ आणि हिंसा जशी कदापिही समर्थनीय ठरू शकणार नाही तसेच केवळ अधिकार प्राप्त झालेत म्हणून पोलिसांनी केलेला अधिकारातिरेकदेखील लोकशाहीला मान्य होणारा नाही. सामान्य माणूस आणि त्याचे अधिकार हाच या देशातील लोकशाहीचा कणा आहे. हा कणा मजबूत राखण्यासाठी दंडाधिकारीय चौकशीतील निष्पक्षपणा महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.