शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

पाणी शुध्दीकरणाची गरज

By admin | Updated: April 15, 2015 00:12 IST

जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पाणी स्त्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून आल्याने नागरिकांसाठी..

अमरावती : जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पाणी स्त्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून आल्याने नागरिकांसाठी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा आरोग्य शासकीय प्रयोगशाळा व पाच उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये मान्सूननंतरच्या पाणी स्त्रोताच्या नमुन्यांची रासायनीक तपासणी करण्यात आलीे. त्यामध्ये प्रयोगशाळांत ४ हजार ५२८ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आल्यावर ४ हजार २५ नमुने परमिसेबल मर्यादेवर आढळून आलेत. त्यातच ३ हजार ९१७ पाणी नमुन्यांमध्ये नायट्रेट रसायनाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. अन्य पाणी नमुन्यांमध्ये २७ फ्लोराईड, २९५ लोह, ११६ टिडीएस, ९० अल्कोनिटी, ४९ पीएच (अ‍ॅसिडीक), १० टरबिरीटी, १५ नमुन्यामध्ये क्लोराईड असल्याचे आढळून आले.हे सर्व रासायनीक द्रव्य मानवी शरीरासाठी घातक ठरणारे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या आरोग्याविषयी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची योग्य तपासणी करून पाणी स्त्रोत्र शुध्द ठेवण्याची गरज आहे. खतांच्या वापरामुळे पाण्यात रासायनिक द्रव्यशेतीसाठी उपयोगी पडणाऱ्या खंतामध्ये विविध रासायनिक पदार्थ असतात. ते शेतीसाठी वापरण्यात आल्यावर जमिनीतील पाण्यात मिसळतात. गुराढोरांच्या गोठ्यातून बाहेर निघणारे मलमुत्रसुध्दा जमिनीतील पाण्यात मिसळतात. हे रासायनिक द्रव्य असलेले दूषित पाणी विविध पाण्यांच्या स्त्रोतांमध्ये आढळून येत आहे.