शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

कंपनीच्या रेल्वेलाईनमुळे शेतीला तलावाचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:16 IST

फोेटो पी १४ नांदगाव नांदगाव पेठ : एका खासगी रेल्वे लाईनमुळे शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतीचे चक्क ...

फोेटो पी १४ नांदगाव

नांदगाव पेठ : एका खासगी रेल्वे लाईनमुळे शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतीचे चक्क दोन भाग झाले आहेत. शेतात पाणीच पाणी साचले असून गेल्या सहा वर्षांपासून शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी यांचेसह संबंधित अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांनी पत्रव्यवहार केला मात्र सहा वर्षात कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने अखेर १६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचाइशारा दिला आहे.

मौजे खानापूर शेतशिवारात शेत सर्व्हे क्र.५१/३,५२/५ मध्ये अपंग शेतकरी साहेबराव तुळे तसेच त्यांच्या बाजूला आशा बाळासाहेब तायडे यांचे शेत आहे. दरवर्षी शेतात पीक घेण्याचा शेतकरी प्रयत्न करतात मात्र बाजूला असलेल्या रेल्वे लाईन च्या बोगद्यामुळे पावसाचे सर्व पाणी या दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतात येऊन शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त होते.एवढेच नव्हे तर पाण्याच्या प्रवाहामुळे शेतीचे दोन भाग झाले आहेत दरवर्षी या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे दोन एक्करमधील पीक खराब होत आहे. याबाबत रतन इंडियासह जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तक्रार दिली. मात्र, या शेतकऱ्याच्या निवेदनाला केवळ केराची टोपली दाखविण्यात येत आहे.

साहेबराव तुळे आणि आशा तायडे या शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आता फुटलेला असून शेतकऱ्यांनी ‘करो वा मरो‘चा पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला आहे. निवेदन देऊन दोन आठवडे झाले तरी प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नसल्याचे तुळे व तायडे यांनी माध्यमांना सांगितले.