शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे बदलेले गुरुजींच्या कामांचे स्वरूप..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST

अमरावती : गत दीड वर्षांत कोरोनाच्या संकटामुळे उद्योगधंदे, व्यवसाय, शेती, नोकरी अशा अनेक क्षेत्रांवर आपली मोहर उमटवली आहे. अनेकांचे ...

अमरावती : गत दीड वर्षांत कोरोनाच्या संकटामुळे उद्योगधंदे, व्यवसाय, शेती, नोकरी अशा अनेक क्षेत्रांवर आपली मोहर उमटवली आहे. अनेकांचे व्यवसाय उद्योगधंदे बुडाले आहेत. यात कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गोरगरिबांना जगणे कठीण झाले आहे. अशातच शिक्षकांच्या कामाचे स्वरूपच बदलून टाकले आहे.

कोरोनामुक्तीच्या लढ्यात शिक्षकांवर आरोग्य तसेच पोलीस यंत्रणेने बरोबर काम करण्याची जबाबदारी शासनाने सोपविले आहे. त्यामुळे एरवी शाळेत दिसणारे शिक्षक आता तपासणी नाक्यावर पोलिसांसोबत तसेच काेविड केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्य बजावताना दिसत आहेत. त्यामुळे खडू-फळा-डस्टर ऐवजी हाती थर्मल गन अन् ऑक्सिमीटर शिक्षकांच्या हाती दिसू लागले आहे. कोरोनामुक्तीच्या लढायांमध्ये पोलीस व डॉक्टरांसोबत शिक्षक गेल्या वर्षभरापासून जबाबदारी पार पाडत आहेत. घरोघरी जाऊन माहिती घेणे, तपासणी करणे, माहिती शासनाला कळविणे, नागरिकांना लस घेण्यास प्रवृत्त करणे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत प्रबोधन करणे अशा प्रकारचे कामे ते करीत आहेत. शिक्षकही सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. थोडक्यात आरोग्य तसेच पोलिस प्रशासनाचे प्राथमिक कार्य शिक्षक पार पाडू लागले आहे. ही जबाबदारी पार पाडताना शासन तसेच प्रशासनाकडून मात्र शिक्षकांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्यात या ड्युटीवर असणारे अनेक शिक्षक मृत्युमुखी पडले आहेत. कोणताही अनुभव नसताना पोलीस तसेच आरोग्य यंत्रणेसोबत काम करण्याची जबाबदारी शिक्षकांना देणाऱ्या शासनाने त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली पाहिजे. या शिक्षकांना संरक्षण द्यावे, अशी मागणी शिक्षक वर्गातून होत आहे.

कोट

कोरोनाच्या संकटकाळात प्राथमिक शिक्षक शासन व प्रशासनाने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. त्यामुळे शासनाकडून कोविड विमा कवच लागू करून त्याचा लाभ मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकाच्या कुटुंबाला तातडीने द्यावा व लसीकरण प्राधान्याने करावे.

- राजेश सावरकर, राज्य प्रतिनिधी, प्राथमिक शिक्षक समिती