शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नावालाच, संसर्ग वाढताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संक्रमितांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींच्या चाचण्या होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात अलीकडे हा प्रकार नावालाच ...

अमरावती : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संक्रमितांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींच्या चाचण्या होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात अलीकडे हा प्रकार नावालाच उरला आहे. फक्त लिखापोती सुरू असताना प्रशासनाच्या लेखी एका रुग्णामागे ८ ते १० जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत आहे. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.

प्रत्येक रुग्णामागे किमान २० जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेस करण्याचे निर्देश असताना जिल्ह्यात हा प्रकार जवळजवळ बंदच झालेला आहे. संसर्गाच्या भीतीपोटी नागरिकच स्वत:हून कोरोनाच्या चाचण्या करीत आहेत. मात्र, चाचण्या टाळण्याचा प्रकार जेथे घडला त्या ठिकाणी कुटुंबचे कुटुंब पॉझिटिव्ह आल्याची कित्येक उदाहरणे आहेत. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचण्या केल्यास अटकाव करता येतो. चाचण्या न करता लक्षणे अंगावर काढल्याचा प्रकार अंगलटदेखील आला आहे. उपचारादरम्यान रुग्ण दगावण्याच्या अनेक घटनांमध्ये अन्य कारणांसोबत अंगावर दुखणे काढणे हे एक प्रमुख कारण आहे.

संक्रमितांच्या १५ फुटांच्या आत वावरणाऱ्या व्यक्तीने जर मास्क, सॅनिटायझरचा वापर केला नसेल, तर अशा व्यक्ती जोखीम या गटात मोडतात. या सर्व व्यक्तींनी संपर्कात आल्याच्या दोन-तीन दिवसांत कोरोना चाचणी करणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना संपर्काविषयी विचारणा व्हायची, ही व्यक्ती कुठे-कुठे गेली, याविषयीची चौकशी होऊन आरोग्य विभागाचे पथक त्या घरी पोहोचून आरोग्यविषयक माहिती घ्यायचे व त्या परिवारातील सदस्यांना चाचण्या करण्याची सूचना दिली जात होती. आशा व एएनएम पथकाद्वारे ही प्रक्रिया पार पाडली जात होती. आता मात्र हा प्रकार नावालाच आहे. शहर असो की ग्रामीण, कुठेही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढण्याचे हे देखील एक प्रमुख कारण ठरले आहे.

बॉक्स

‘ब्रेक द चेन’साठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महत्त्वाचे

घरातील एक व्यक्ती संक्रमित झाल्यास त्या घरातील सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करणे महत्त्वाचे आहे. याचे गांभीर्य लक्षात आल्याने शहरात आता संक्रमितांच्या कुटुंबातील व्यक्ती चाचण्या करीत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात अद्यापही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा प्रकार होत नाही, किंबहुना आरोग्य यंत्रणेचे याकडे दुर्लक्षच आहे. त्यामुळे कोरोनाची ‘ब्रेक द चेन’ कशी होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

बॉक्स

जिल्ह्यात आतापर्यंत ४,५७.४९८ चाचण्या

जिल्ह्यात आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजेनच्या आतापर्यंत ४,५७,४९८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात १६.४८ पॉझिटिव्हिटी नोंद करण्यात आली आहे. मार्च व एप्रिलमध्ये रोज उच्चांकी आठ हजारांपर्यंत चाचण्या करण्यात येत होत्या. आता मात्र हे प्रमाण साडेतीन ते चार हजारांपर्यंतच आहे व चाचण्यांमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह नोंद होण्याचे प्रमाण २३ ते ३० टक्क्यांपर्यंत आहे.

बॉक्स

जिल्ह्यात एका रुग्णामागे आठ ते १२ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत आहे. संक्रमितांच्या परिवारातील व्यक्तींना चाचण्या करण्याविषयीची सूचना केली जाते.

- दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी

पाइंटर

एकूण कोरोनाग्रस्त : ७५,४३५

आतापर्यंत मृत्यू : १,१२२

एकूण संक्रमणमुक्त : ६३,८४७