शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नावालाच, संसर्ग वाढताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संक्रमितांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींच्या चाचण्या होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात अलीकडे हा प्रकार नावालाच ...

अमरावती : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संक्रमितांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींच्या चाचण्या होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात अलीकडे हा प्रकार नावालाच उरला आहे. फक्त लिखापोती सुरू असताना प्रशासनाच्या लेखी एका रुग्णामागे ८ ते १० जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत आहे. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.

प्रत्येक रुग्णामागे किमान २० जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे निर्देश असताना जिल्ह्यात हा प्रकार जवळजवळ बंदच झालेला आहे. संसर्गाचे भीतीपोटी नागरिकच स्वत:हून कोरोनाच्या चाचण्या करीत आहेत. मात्र, चाचण्या टाळण्याचा प्रकार जेथे घडला त्या ठिकाणी कुटुंबचे कुटुंब पॉझिटिव्ह आल्याची कित्येक उदाहरणे आहेत. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचण्या केल्यास अटकाव करता येतो. चाचण्या न करता लक्षणे अंगावर काढल्याचा प्रकार अंगलटदेखील आला आहे. उपचारादरम्यान रुग्ण दगावण्याच्या अनेक घटनांमध्ये अन्य कारणांसोबत अंगावर दुखणे काढणे हे एक प्रमुख कारण आहे.

संक्रमितांच्या १५ फुटांच्या आत वावरणाऱ्या व्यक्तीने जर मास्क, सॅनिटायझरचा वापर केला नसेल, तर अशा व्यक्ती जोखीम या गटात मोडतात. या सर्व व्यक्तींनी संपर्कात आल्याच्या दोन-तीन दिवसांत कोरोना चाचणी करणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना संपर्काविषयी विचारणा व्हायची, ही व्यक्ती कुठे-कुठे गेली, याविषयीची चौकशी होऊन आरोग्य विभागाचे पथक त्या घरी पोहोचून आरोग्यविषयक माहिती घ्यायचे व त्या परिवारातील सदस्यांना चाचण्या करण्याची सूचना दिली जात होती. आशा व एएनएम पथकाद्वारे ही प्रक्रिया पार पाडली जात होती. आता मात्र हा प्रकार नावालाच आहे. शहर असो की ग्रामीण कुठेही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढण्याचे हे देखील एक प्रमुख कारण ठरले आहे.

बॉक्स

‘ब्रेक द चेन’साठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महत्त्वाचे

घरातील एक व्यक्ती संक्रमित झाल्यास त्या घरातील सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करणे महत्त्वाचे आहे. याचे गांभीर्य लक्षात आल्याने शहरात आता संक्रमितांच्या कुटुंबातील व्यक्ती चाचण्या करीत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात अद्यापही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा प्रकार होत नाही किंबहुना आरोग्य यंत्रणेचे याकडे दुर्लक्षच आहे. त्यामुळे कोरोनाची ‘ब्रेक द चेन’ कशी होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

बॉक्स

जिल्ह्यात आतापर्यंत ४,५७.४९८ चाचण्या

जिल्ह्यात आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजनच्या आतापर्यंत ४,५७,४९८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये १६.४८ पॉझिटिव्हिटी नोंद करण्यात आली आहे. मार्च व एप्रिलमध्ये रोज उच्चांकी आठ हजारांपर्यंत चाचण्या करण्यात येत होत्या. आता मात्र हे प्रमाण साडेतीन ते चार हजारांपर्यंतच आहे व चाचण्यांमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह नोंद होण्याचे प्रमाण २३ ते ३० टक्क्यांपर्यंत आहे.

बॉक्स

जिल्ह्यात एका रुग्णामागे आठ ते १२ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत आहे. संक्रमितांच्या परिवारातील व्यक्तींना चाचण्या करण्याविषयीची सूचना केली जाते.

डॉ. दिलीप रणमले

जिल्हा आरोग्य अधिकारी

पाइंटर

एकूण कोरोनाग्रस्त : ७५,४३५

आतापर्यंत मृत्यू : १,१२२

एकूण संक्रमणमुक्त : ६३,८४७