शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

नागझिरा अभयारण्यात प्राणांतिक झुंजीत जबर जखमी झालेला वाघ सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 18:31 IST

जंगलात वन्यप्राणी विशेषत: वाघांमध्ये वर्चस्वाची लढाई ही जीवघेणी असते.

 - गणेश वासनिक अमरावती  - टी-८ ने आपल्या हद्दीत वर्चस्व निर्माण करू पाहणा-या टी-९ शी प्राणांतिक झुंज दिली. मात्र, तरुण टी-९ पुढे त्याची ताकद कमी पडली आणि प्रचंड जखमी होऊन जीव वाचवत त्याला रणांगणातून पळावे लागले. त्याला संरक्षण देऊन औषधोपचार करा, अशी मागणी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत उमटली. मात्र, वनाधिका-यांच्या खंबीर भूमिकेमुळे तो कुठल्याही औषधोपचाराशिवाय नैसर्गिक पद्धतीने जखमी अवस्थेतून बरा झाला. ही कहाणी आहे नागझिरा अभयारण्यातील टी-८ या वाघाची. नागझिरा अभयारण्यात वनविभागाने ‘टी-८’ असे सदर वाघाचे नामकरण केले. तो आपल्या वाघिणीसमवेत जुना नागझिरा जंगलात मुक्त संचार करीत होता. अशातच मार्च महिन्यात पाच वर्षांचा टी-९ हा वाघ आठ वर्षांच्या टी-८ च्या प्रदेशात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने दाखल झाला. या दोन वाघांत प्राणांतिक झुंज झाली. यात टी-८ चा नवखा टी-९ च्या ताकदीपुढे निभाव लागला नाही. जबर जखमी झाल्यानंतर त्याने ते क्षेत्र सोडले. त्याच्या नाकावर, चेहº-यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. जखमी वाघ ट्रॅप कॅमे-यात कैद झाला होता.जंगलात वन्यप्राणी विशेषत: वाघांमध्ये वर्चस्वाची लढाई ही जीवघेणी असते. त्यात एकाचा जीव जातो. त्यादृष्टीने टी-८ सुदैवी ठरला. भारतीय वन्यजीव अधिनियमानुसार, वाघाला जखमी ठेवता येत नाही. त्यामुळे एनजीओ, वन्यजीवप्रेमींनी जखमी वाघाला बेशुद्ध करून पकडा, त्याच्यावर औषधोपचार करा, असा धोशा लावला. दरम्यान, काही सामाजिक संस्थांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय गाठले. मनेका गांधी यांच्यासमोर हा विषय गेला. मनेका गांधी यांनी वरिष्ठ वनाधिका-यांशी ‘टी-आठ’ संदर्भात माहिती जाणून घेतली. त्याला काही झाल्यास तुमची खैर नाही, अशी तंबी मनेका गांधी यांनी दिली.नागझिरातील वनाधिकारी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होते. टी-८ वर उपचार करण्याऐवजी नैसर्गिक पद्धीने बरे होण्यावर त्यांनी भर दिला. मात्र, त्याच्यावर सूक्ष्म नियंत्रण ठेवले. त्याचा संचार, भक्ष्य, दिनचर्या आदींवर बारकाईने लक्ष देण्यात आले. महिनाभरातच नाक, चेहºयावर झालेली जखम बरी झाली. टी-८ पासून दुरावलेली टी-४ ही वाघीण त्याच्याकडे परतली असून, जुना नागझिरा क्षेत्रात दोन बछड्यांसह हा कुटुंबकबिला मुक्त संचार करीत असल्याची नोंद वनाधिका-यांनी घेतली आहे. 

मार्चमध्ये झुंज, एप्रिलमध्ये सुखरूपनागझिरा अभयारण्यात टी-८ आणि पाच वर्षीय टी-९ यांच्यात १० ते १५ मार्च दरम्यान  प्राणांतिक झुंज झाली होती. यात टी-८ जखमी झाला. मात्र, जखमी झालेला वाघ सोडून टी-४  ही वाघीण टी-९ सोबत गेली. तब्बल महिनाभरानंतर ती दोन बछड्यांसह एप्रिल महिन्यात टी-८ कडे परतली.  

जंगल हे वन्यप्राण्यांसाठीच आहे. वन्यप्राण्यांमध्येसुद्धा मनुष्याप्रमाणे कधी-कधी वर्चस्वाची लढाई  होते. त्यामुळे त्यांना त्यांच्याच पद्धतीने जगू देणे हा कर्तव्याचा भाग आहे. म्हणून तो वाघ महिनाभर जखमी असताना त्यावर लक्ष ठेवले. नैसर्गिकरीत्या त्याची जखम बरी झाली. आता तो सुखरूप आहे.  - सुनील लिमये,   अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर

टॅग्स :TigerवाघNagzira Tiger Projectनागझिरा व्याघ्र प्रकल्पAmravatiअमरावती