शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नागझिरा अभयारण्यात प्राणांतिक झुंजीत जबर जखमी झालेला वाघ सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 18:31 IST

जंगलात वन्यप्राणी विशेषत: वाघांमध्ये वर्चस्वाची लढाई ही जीवघेणी असते.

 - गणेश वासनिक अमरावती  - टी-८ ने आपल्या हद्दीत वर्चस्व निर्माण करू पाहणा-या टी-९ शी प्राणांतिक झुंज दिली. मात्र, तरुण टी-९ पुढे त्याची ताकद कमी पडली आणि प्रचंड जखमी होऊन जीव वाचवत त्याला रणांगणातून पळावे लागले. त्याला संरक्षण देऊन औषधोपचार करा, अशी मागणी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत उमटली. मात्र, वनाधिका-यांच्या खंबीर भूमिकेमुळे तो कुठल्याही औषधोपचाराशिवाय नैसर्गिक पद्धतीने जखमी अवस्थेतून बरा झाला. ही कहाणी आहे नागझिरा अभयारण्यातील टी-८ या वाघाची. नागझिरा अभयारण्यात वनविभागाने ‘टी-८’ असे सदर वाघाचे नामकरण केले. तो आपल्या वाघिणीसमवेत जुना नागझिरा जंगलात मुक्त संचार करीत होता. अशातच मार्च महिन्यात पाच वर्षांचा टी-९ हा वाघ आठ वर्षांच्या टी-८ च्या प्रदेशात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने दाखल झाला. या दोन वाघांत प्राणांतिक झुंज झाली. यात टी-८ चा नवखा टी-९ च्या ताकदीपुढे निभाव लागला नाही. जबर जखमी झाल्यानंतर त्याने ते क्षेत्र सोडले. त्याच्या नाकावर, चेहº-यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. जखमी वाघ ट्रॅप कॅमे-यात कैद झाला होता.जंगलात वन्यप्राणी विशेषत: वाघांमध्ये वर्चस्वाची लढाई ही जीवघेणी असते. त्यात एकाचा जीव जातो. त्यादृष्टीने टी-८ सुदैवी ठरला. भारतीय वन्यजीव अधिनियमानुसार, वाघाला जखमी ठेवता येत नाही. त्यामुळे एनजीओ, वन्यजीवप्रेमींनी जखमी वाघाला बेशुद्ध करून पकडा, त्याच्यावर औषधोपचार करा, असा धोशा लावला. दरम्यान, काही सामाजिक संस्थांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय गाठले. मनेका गांधी यांच्यासमोर हा विषय गेला. मनेका गांधी यांनी वरिष्ठ वनाधिका-यांशी ‘टी-आठ’ संदर्भात माहिती जाणून घेतली. त्याला काही झाल्यास तुमची खैर नाही, अशी तंबी मनेका गांधी यांनी दिली.नागझिरातील वनाधिकारी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होते. टी-८ वर उपचार करण्याऐवजी नैसर्गिक पद्धीने बरे होण्यावर त्यांनी भर दिला. मात्र, त्याच्यावर सूक्ष्म नियंत्रण ठेवले. त्याचा संचार, भक्ष्य, दिनचर्या आदींवर बारकाईने लक्ष देण्यात आले. महिनाभरातच नाक, चेहºयावर झालेली जखम बरी झाली. टी-८ पासून दुरावलेली टी-४ ही वाघीण त्याच्याकडे परतली असून, जुना नागझिरा क्षेत्रात दोन बछड्यांसह हा कुटुंबकबिला मुक्त संचार करीत असल्याची नोंद वनाधिका-यांनी घेतली आहे. 

मार्चमध्ये झुंज, एप्रिलमध्ये सुखरूपनागझिरा अभयारण्यात टी-८ आणि पाच वर्षीय टी-९ यांच्यात १० ते १५ मार्च दरम्यान  प्राणांतिक झुंज झाली होती. यात टी-८ जखमी झाला. मात्र, जखमी झालेला वाघ सोडून टी-४  ही वाघीण टी-९ सोबत गेली. तब्बल महिनाभरानंतर ती दोन बछड्यांसह एप्रिल महिन्यात टी-८ कडे परतली.  

जंगल हे वन्यप्राण्यांसाठीच आहे. वन्यप्राण्यांमध्येसुद्धा मनुष्याप्रमाणे कधी-कधी वर्चस्वाची लढाई  होते. त्यामुळे त्यांना त्यांच्याच पद्धतीने जगू देणे हा कर्तव्याचा भाग आहे. म्हणून तो वाघ महिनाभर जखमी असताना त्यावर लक्ष ठेवले. नैसर्गिकरीत्या त्याची जखम बरी झाली. आता तो सुखरूप आहे.  - सुनील लिमये,   अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर

टॅग्स :TigerवाघNagzira Tiger Projectनागझिरा व्याघ्र प्रकल्पAmravatiअमरावती