शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

नागठाणा प्रकल्पातून

By admin | Updated: April 12, 2015 00:28 IST

तालूक्यात दरवर्षी चुडामण नदीवर असलेल्या नागठाणा १ आणि २ या प्रकल्पातून पाणी सोडले जाते. ...

लाखो लिटर पाण्याचा अपव्ययवरूड : तालूक्यात दरवर्षी चुडामण नदीवर असलेल्या नागठाणा १ आणि २ या प्रकल्पातून पाणी सोडले जाते. यामुळे बंधारे, विहिरी तसेच जलसाठे कोरडे होत नाही. याकरीता चुडामण नदीमध्ये तीन दिवसांपासून नागठाणा २ या प्रकल्पातून पाणी सोडले. परंतु अधिक काळ लोटूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तांत्रिकदृष्ट्या सदोष असलेले गेट बंद होत नसल्याने सर्व प्रयत्न असफल झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला गेट बंद करण्याची मागणी केली. मात्र पाण्याचा विसर्ग सुरुच असल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. तालुक्यातील नदी, बंधारे, विहिरींमध्ये जलस्तर कायम राहावा आणि पाणी टंचाई निर्माण हाऊ नये म्हणून दरवर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मध्ये पाणी सोडण्यात येते. यावर्षी नदीकाठच्या झटामझिरी, तिवसा, पिंपळशेंडा, वरुड, राजुराबाजार, वाडेगाव, काटी, गाडेगावासह आदी गावालगतच्या शेतातील विहिरंची भूजल पातळी घटली होती. सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यामुळे नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. आ. अनिल बोंडे यांच्याकडेसुध्दा मागणी केल्याने आमदारांनी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला. यामुळे ेचुडामण नदीत पाणी सोडण्यात आले. परंतु ठरावीक कालावधीनंतर गेट बंद करणे आवश्यक असते. परंतु इनटेक विहिरींच्या गेटमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने सदर गेट बंद होत नाही. पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र तारेवरची कसरत करुन गेट बंद झाले नाही. यामुळे लाखो लिटर पाण्याचा विसर्ग सुरुअसल्याने प्रकल्पातील जलसाठा सेंकदागणिक कमी होत आहे. प्रकल्पाची निर्मिती झाल्यापासूनच या गेटमध्ये तांत्रिक बिघाड आहे. या प्रकल्पाचे परिसरात असलेल्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचे सावट पसरले आहे. शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन तातडीने गेट बंद करण्याची मागणी केली आहे. वृत्त लिहिपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरुच होता. गेट बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपडसुध्दा सुरु होती, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)नागरिकांच्या मागणीवरुन गेट उघडले होतेपाटंबणारे विभागाचे अभियंता देशपांडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्कसाधला असता आम्ही प्रकल्पाचे गेट बंद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून आज गेट बंद होईल, असे सांगितले. काटी, वाडेगावच्या नागरिकांच्या मागणीवरुनच गेट उघडण्यात आल्याचेही अभियंता देशपांडे यांनी सांगितले.