शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

नागठाणा प्रकल्पातून

By admin | Updated: April 12, 2015 00:28 IST

तालूक्यात दरवर्षी चुडामण नदीवर असलेल्या नागठाणा १ आणि २ या प्रकल्पातून पाणी सोडले जाते. ...

लाखो लिटर पाण्याचा अपव्ययवरूड : तालूक्यात दरवर्षी चुडामण नदीवर असलेल्या नागठाणा १ आणि २ या प्रकल्पातून पाणी सोडले जाते. यामुळे बंधारे, विहिरी तसेच जलसाठे कोरडे होत नाही. याकरीता चुडामण नदीमध्ये तीन दिवसांपासून नागठाणा २ या प्रकल्पातून पाणी सोडले. परंतु अधिक काळ लोटूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तांत्रिकदृष्ट्या सदोष असलेले गेट बंद होत नसल्याने सर्व प्रयत्न असफल झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला गेट बंद करण्याची मागणी केली. मात्र पाण्याचा विसर्ग सुरुच असल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. तालुक्यातील नदी, बंधारे, विहिरींमध्ये जलस्तर कायम राहावा आणि पाणी टंचाई निर्माण हाऊ नये म्हणून दरवर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मध्ये पाणी सोडण्यात येते. यावर्षी नदीकाठच्या झटामझिरी, तिवसा, पिंपळशेंडा, वरुड, राजुराबाजार, वाडेगाव, काटी, गाडेगावासह आदी गावालगतच्या शेतातील विहिरंची भूजल पातळी घटली होती. सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यामुळे नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. आ. अनिल बोंडे यांच्याकडेसुध्दा मागणी केल्याने आमदारांनी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला. यामुळे ेचुडामण नदीत पाणी सोडण्यात आले. परंतु ठरावीक कालावधीनंतर गेट बंद करणे आवश्यक असते. परंतु इनटेक विहिरींच्या गेटमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने सदर गेट बंद होत नाही. पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र तारेवरची कसरत करुन गेट बंद झाले नाही. यामुळे लाखो लिटर पाण्याचा विसर्ग सुरुअसल्याने प्रकल्पातील जलसाठा सेंकदागणिक कमी होत आहे. प्रकल्पाची निर्मिती झाल्यापासूनच या गेटमध्ये तांत्रिक बिघाड आहे. या प्रकल्पाचे परिसरात असलेल्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचे सावट पसरले आहे. शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन तातडीने गेट बंद करण्याची मागणी केली आहे. वृत्त लिहिपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरुच होता. गेट बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपडसुध्दा सुरु होती, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)नागरिकांच्या मागणीवरुन गेट उघडले होतेपाटंबणारे विभागाचे अभियंता देशपांडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्कसाधला असता आम्ही प्रकल्पाचे गेट बंद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून आज गेट बंद होईल, असे सांगितले. काटी, वाडेगावच्या नागरिकांच्या मागणीवरुनच गेट उघडण्यात आल्याचेही अभियंता देशपांडे यांनी सांगितले.