शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

महामारीतही मुन्नाभाई एमबीबीएस जोरात, एका बोगस डॉक्टरवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:09 IST

इंदल चव्हाण अमरावती : जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट कोरोना काळात मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेकांना औषधोपचारानंतर त्याचे विपरीत परिणाम ...

इंदल चव्हाण

अमरावती : जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट कोरोना काळात मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेकांना औषधोपचारानंतर त्याचे विपरीत परिणाम जाणवायला लागले आहे. मात्र, तक्रारीअभावी शासनाला अशा बोगस डाॅक्टरांवर कारवाई करण्यात अडचणी येत आहे. चांदूर बाजार तालुक्यात याबाबत आलेल्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने कारवाई केली असून त्या बोगस डॉक्टरची डिग्री जप्त केल्याची माहिती आहे.

जिल्हा लोकसंख्येच्या तुलनेत विभागात सर्वात मोठा आहे. शहरी भागांसह १५४७ खेडेगावांत विभागलेला आहे. वाडी-वस्ती, बेडा, तांडा, ढाणा आदी अनेक भागात आजही शासकीय यंत्रणा पोहचत नाही. अशा ठिकाणी बोगस डॉक्टर शिरून रुग्णांना लुबाडण्याचा प्रयत्न करतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या आरोग्याशी खेळ करतात. यातून जिल्ह्यात सद्यस्थितीत एक डॉक्टर बोगस चांदूर बाजार तालुक्यात आढळून आल्याने त्याचेविरुद्ध शासनाने कारवाई केली आहे.

जिल्ह्यातील अनेक भागात बोगस डॉक्टर कार्यरत असून, त्यांच्याविरुद्ध कुणी तक्रार करीत नसल्याने ते बिनधास्त रुग्णांवर उपचार करून पैसे उकळत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. यासंदर्भात चांदूर बाजार तालुक्यातून एक तक्रार प्राप्त झाल्याने जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत त्या डॉक्टरविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. बोगस डॉक्टरांकडून वापरल्या जाणाऱ्या औषधी अतिशय पावरफुल राहत असल्याने त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. यातून अनेकांना धोका झालेला आहे.

बॉक्स

तक्रार आली तरच कारवाई

बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी काही नियमावली आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. तालुका स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातही समिती आहे. या समितीकडे तक्रार केल्यानंतरच संबंधित अधिकारी धाड टाकून कार्यवाही करीत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिली.

--

सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ

रक्त होते कमी, हाडे ठिसूळ होतात

ग्रामीण बागात वैद्यकीय सेवा देणाो काही बोगस डॉक्टर विना डिग्री काम करीत आहेत. त्यांनी रुग्णांना तात्काळ उपचार मिळावा म्हणून प्रभावी औषधींचा हाय डोस देतात. यामुळे भविष्यात रुग्णांच्या शरीरातील रक्त कमी होऊ लागते. हाडेदेखील ठिसूळ बनतात. त्यातून पुढे अन्य आजार जडतात. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

--

किडनीही होऊ शकते निकामी

वैद्यकीय सेवा देण्यासाठी राज्यात शासनाचे रजिस्ट्रेशन सक्तीचे आहे. मात्र, काही डॉक्टर नॅचरोपॅथी डिग्री घेऊन स्वत: ॲलोपॅथीची प्रॅक्टीस करताना दिसत आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय रजिस्ट्रेशन नसते. त्यांनी केलेले औषधोपचार किडनीला सहन झाल्यास कालांतराने किडनीचा आजार जडतो. शरीराची पाचनशक्ती कमी होऊन शारीरिक कमजोरी आल्याने पुढे किडनी निकामी होण्याची संभावना असते. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांकडून औषधोपचार घेऊ नये, जाणकारांनी अशा डॉक्टरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार केल्यास समितीद्वारा संबंधितावर योग्य कारवाई केली जाते.

--

शुगरच्या रुग्णांना ग्लुकोजची औषधी

बोगस डॉक्टर मनमर्जीनुसार औषधी देतात. यात रुग्णाला शुगर असला तरी ग्लुकोजची सलाईन लावली जाते. अतिशय उच्च रक्तदाब असल्यानंतरही त्याला सलाइनच्या माध्यमातून उपचार देण्याची प्रक्रिया राबविली जाते. हा प्रकार रुग्णांच्या अंगलट येण्याची संभावना असते. रुग्ण आणि त्याचे नातेवाईक याबाबत अनभिज्ञ असतात. डॉक्टर गावातच असल्याने तो योग्य उपचार करीत असेल असाच काहींचा भ्रम असतो. मात्र, त्याचे परिणाम शरीरावर वाईट होतात. त्यामुळे बोगस डॉक्टरांकडून उपचार घेऊ नये, असे आवाहन डीएचओ रणमले यांनी केले आहे.