शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत एलबीटी की जकात निर्णय नाहीच ?

By admin | Updated: September 3, 2014 23:01 IST

एलबीटी (स्थानिक संस्था कर) की जकात यापैकी कोणत्या कराची अंमलबजावणी करावी, हे महापालिकांनी ठरवावे, असा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी केंव्हा, कशी

अमरावती : एलबीटी (स्थानिक संस्था कर) की जकात यापैकी कोणत्या कराची अंमलबजावणी करावी, हे महापालिकांनी ठरवावे, असा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी केंव्हा, कशी करायची यासंदर्भात अद्यापर्यत मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या नाहीत. परिणामीे एलबीटीचे दरमहा तीन कोटींनी उत्पन्न माघारल्याने प्रशासन हतबल झाले आहे. शासनाच्या या अफलातून निर्णयाचा लाभ व्यापाऱ्यांना मिळत असून तुर्तास त्यांची बल्ले बल्ले आहे.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गत महिन्यात राज्यातील व्यावसायिकांचे हित जोपासण्यासाठी मुंबई वगळता राज्यातील २६ महापालिकांमध्ये एलबीटी की जकात, कोणता कर लागू ठेवावा हा निर्णय त्या- त्या महापालिकांवर सोपविण्याचे ठरविले. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाची त्वरेने अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. मात्र अनेक दिवस लोटूनही याबाबत शासनाचे कोणतेही पत्र प्राप्त झाले नसल्याने महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. एलबीटी बाबत मागील दोन महिन्याच्या उत्पन्नाची आकडेवारी बघितली तर आॅगस्ट महिन्यात एलबीटीचे उत्पन्न तीन कोटींनी माघारले आहे. महापालिकेला दरमहा ९ कोटींचा खर्च असून एलबीटी उत्पन्नात कमालीची घसरण झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवानिवृत्ती, कंत्राटदाराचे थकबाकी, पुरवठादारांचे देणे अशा एक ना अनेक समस्यांच्या सामोरे प्रशासनाला जावे लागत आहे. अशातच व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्यास हात रोखता केल्याने दरमहा एलबीटी उत्पन्नाचा ५ कोटींचा आकडा पार होत नसल्याचे वास्तव आहे. महापालिकेचा डोलारा एलबीटी उत्पन्नावरच अवलंबून असताना ७० टक्के उत्पन्न कमी झाल्याने प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे. शासनाने एलबीटी संदर्भात निर्णय घेण्याचा चेंडू महापालिकांवर टाकला. मात्र पुढे काय करायचे हे अद्यापही सांगितले नाही. शासनाने घेतलेला निर्णय म्हणजे व्यापाऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर गोंजारण्याचा प्रयत्न होय, अशी टीका शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते प्रशांत वानखडे, भाजपचे गटनेते संजय अग्रवाल यांनी केला आहे. केवळ घोषणा करुन स्तुती करुन घ्यायची, ही आघाडी शासनाची नीती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एलबीटीचे उत्पन्न माघारल्याने महापालिका प्रशासनाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, याची जाणीव शासनाला नाही. त्यामुळे एलबीटी संदर्भात कोणता निर्णय घ्यायचा हे अद्यापही शासनाने कळविले नाही. येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे संकेत आहे. दोन ते तीन दिवसांत या विषयी निर्णय शासनाने घेतला नाही तर एलबीटीचे उत्पन्न तर बुडलेच किंबहुना महापालिकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल, ही वस्तुस्थिती आहे. येथील व्यापाऱ्यांनी एलबीटीचा भरणा बंद करुन महापालिकेची आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून येते.