शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई एक्स्प्रेस आजपासून १० मेपर्यंत रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:14 IST

अमरावती : कोरोनाचा कहर आणि कडक लॉकडाऊनमुळे अमरावती-मुंबई एक्स्प्रेसची फेरी २७ एप्रिल ते १० मे अशी १४ दिवस रद्द ...

अमरावती : कोरोनाचा कहर आणि कडक लॉकडाऊनमुळे अमरावती-मुंबई एक्स्प्रेसची फेरी २७ एप्रिल ते १० मे अशी १४ दिवस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईहून अत्यावश्यक कामासाठी ये-जा करण्यासाठी आता अमरावतीकरांना पर्यायी रेल्वे गाडीने प्रवास करावा लागणार आहे.

मुंबई मार्गे ये-जा करण्यासाठी पश्चिम विदर्भात रेल्वे प्रवाशांच्या पसंतीला खरी उतरलेली आणि एरवी नियमित हाऊसफुल्ल धावणारी अमरावती-मुंबई एक्स्प्रेस कोरोना संसर्गामुळे १५ दिवसांपासून रिकामी धावत आहे. कडक लॉकडाऊनमुळे प्रवाशांनी मुंबईचा प्रवास कमी केला आहे. त्यामुळे या गाडीच्या आरक्षणाची मागणी मंदावली. दररोज निम्मे बर्थ रिकामे घेऊन मुंबई एक्स्प्रेस धावत होती. ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असा मुंबई एक्स्प्रेसचा कारभार सुरू असल्याने मध्य रेल्वे मुंबई विभागाने या रेल्वेला १४ दिवस ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने रेल्वे अधिकाऱ्यांचे पत्र अमरावती रेल्वे स्थानकावर पोहोचले आहे. परिणामी मे महिन्यातील आरक्षणाचे रिफंड मिळणार आहे. सोमवारी मुंबई एक्स्प्रेसमध्ये १३५० पैकी ७४१ आरक्षित तिकिटांवर प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती अमरावती रेल्वे स्थानकाचे प्रबंधक महेंद्र लोहकरे यांनी दिली.