शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

बिच्छन नदीच्या विकासासाठी हालचाली

By admin | Updated: May 3, 2015 00:24 IST

गुजरातमधील साबरमती व मुंबई येथील मिठी नदीच्या विकासाच्या धर्तीवर परतवाड्यातील बिच्छन नदीच्या ....

पर्यावरण संतुलन राखले जाणार : नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिली तत्त्वत: मान्यताअचलपूर : गुजरातमधील साबरमती व मुंबई येथील मिठी नदीच्या विकासाच्या धर्तीवर परतवाड्यातील बिच्छन नदीच्या विकासासाठी शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी बिच्छन नदी प्रकल्प आराखड्याचे जनक राजेश उभाड प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची भेट घेतली. त्यांनीही या प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता दिली आहे. परतवाड्याच्या मध्यातून बिच्छन नदी वाहते तिच्यावर धरण बांधले असल्याने तिचे पात्र सध्या कोरडे आहे. शहरातील सांडपाण्यामुळे ती गटारगंगा झालेली आहे. तिचा विकास केल्यास तिला बारमाही स्वच्छ पाणी राहून पर्यावरणही संतुलित राहू शकते. याकरिता गुजरात राज्यातील साबरमती व मुंबई येथील मिठी नदीप्रमाणे बिच्छन नदीचा विकास करण्यासाठी राजेश उभाड यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे. मागील चार महिन्यांपूर्वी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांचा परतवाडा येथे नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रास्ताविकपर भाषणातून उभाड यांनी हा मुद्दा रेटून धरला होता. तसेच आता या प्रकल्पासाठी नुकतीच रणजित पाटील यांची मुंबई येथे जाऊन भेट घेतली. अंदाजे १८० कोटी रूपये या प्रकल्पाला खर्च येणार असल्याने केंद्र सरकारकडून ७० टक्के व राज्य सरकारकडून ३० टक्के निधी मिळू शकतो. पर्यावरण विभागाचे निदेशक पाटील यांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे. तसेच भाजप सरकार नद्यांच्या विकासाकडे जास्त भर देत आहे. नद्यांच्या विकासाच्या बाबतीत केंद्र सरकारची काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यानुसार हा प्रकल्प प्रस्ताव तयार करून नगरपालिकेच्या ठरावासह मंत्रालयात पाठवावा, असे रणजित पाटील यांनी उभाड यांना सांगितले. केंद्र सरकारच्या नदी विकास धोरणांतर्गत अशा प्रकल्पांना जेथे सौंदर्यीकरण व त्याची उपयोगिता या दोन्ही गोष्टी साकारली जाऊ शकतात, अशांना केंद्र सरकार ७० टक्के व ३० टक्के निधी नगरपालिका किंवा राज्य शासनाकडून प्राप्त होऊ शकतो. (शहर प्रतिनिधी)सौंदर्यीकरणासाठीहोऊ शकते मदतया प्रकल्पामुळे शहर सौंदर्यीकरण, रस्त्यावरील दुकानदारांना हक्काच्या जागा, बेरोजगारांना रोजगाराची संधी, पार्किंगसाठी मोठ्या अवजड वाहनांना जागा, वाहतुकीची सुरक्षितता, अपघाताला आळा, आरोग्य संवर्धन, पर्यावरणाचे संतुलन आदी समस्या मार्गी लागू शकतात. शहर सांैदर्यीकरणासाठीसुध्दा यामुळे मदत होऊ शकेल.हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नगरविकास राज्यमंत्री पाटील स्वत: लक्ष घालीत असून गरज भासल्यास पर्यावरणमंत्री जावडेकर यांची भेट घेण्याची तयारी दाखविली आहे. बिच्छन नदीवरील हा प्रकल्प तडीस नेण्यासाठी सर्व बाबी शुभ संकेत देत आहेत. या प्रकल्पामुळे अनेक समस्या सुटतील यासाठी आता नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांचीही मदत लागणार असून सर्वांनी सकारात्मकता दाखविली आहे. नामदार पाटील यांच्या भेटीच्या वेळी वास्तूशास्त्रज्ञ अमित अग्रवाल हेसुद्धा उपस्थित होते. त्यांनीही अनेक चांगले मुद्दे मांडले. - डॉ. राजेश उभाड, बिच्छन नदी विकास प्रकल्प आराखड्याचे जनक.