शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

आईची काळजी वाढली; काळजावर दगड ठेवून मुलांना पाठविले शाळेत !(सुधारित)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:10 IST

शाळा झाल्या सुरू अजूनही बऱ्याच पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण अमरावती : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. कोरोनाची पहिली लाट ओसल्यानंतर ...

शाळा झाल्या सुरू अजूनही बऱ्याच पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

अमरावती : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. कोरोनाची पहिली लाट ओसल्यानंतर लगेच दुसरी लाट आल्याने शिक्षणावर मोठा परिणाम झाला. मात्र, दीड वर्षानंतर जनजीवन पूर्वपदावर आले, तसेच शाळादेखील सुरू झाल्या आहेत. मात्र आभासी पद्धतीने शासनाच्या आदेशानुसार आता सर्व चाचपणी करून आठवीपासून शाळा ग्रामीण भागात सुरू झाल्या आहे.

मुलेही शाळेत जायला लागली. मात्र, कोरेानाची भीती आईला अद्यापही असून, आपल्या मुलाला शाळेत पाठविताना आईची चांगली घालमेल होत आहे. प्रकृती खराब तर होणार नाही ना, ताप तर येणार नाही ना, अशी काळजी आईला लागली आहे. मुलगा, मुलगी शाळेत गेल्यापासून तर घरी येईपर्यंत जिवात जीव राहत नाही. घरी आल्याबरोबर ठीक आहे ना, चांगला आहे ना, वर्गात कोणाला ताप तर नव्हता ना, खोकला तर नव्हता ना, मास्क तर काढला नाही ना, वेळोवेळी हात धुतले ना, अशी आस्थेना विचारपूस सुरू झाली आहे. शाळेतून आला आता कपडे धुवायला टाका, प्रेमाने काळजीपोटी सांगणेही मुलांना सुरू झाली आहे. शाळा जरी सुरू झाल्या तरी पालकांमध्ये पाल्यांच्या आरोग्याबाबत काळजी वाटत आहे.

बॉक्स

शाळेतून घरी येताच कपडे बदला आंघोळ करा!

मुले शाळेत जायला लागले. मुलांत आता उत्साहाचे आनंदाचे वातावरण आहे. अनेक दिवसांनी मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे हसणे, खेळणे, बागडणे, गप्पागोष्टी एकत्र बसणे सुरू झाले आहे. घरी गेल्यावर हात साबणाने धुवा,सॅनिटायझरचा वापर करा, कपडे धुवायला टाकून आंघोळ करा, स्वच्छता ठेवा अशा दररोज शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना सूचना देत आहेत.

अ) मास्क काढू नये

ब )वारंवार हात साबणाने धुवावे किंवा सॅनिटायझर वापरावे.

क) फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे

ड) घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावेत आणि आंघोळ करावी.

बॉक्स

काळजी आहेच पण शिक्षणही महत्त्वाचे

कोट

कोरोनामुळे शाळा बंद होत्या. आता प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरू होते. पण त्यातील अनेक बाबी समजत नव्हत्या. आता प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याने अडचण नाही. पण कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते. मात्र, शिक्षणदेखील महत्त्वाचे असल्याचे लक्षात ठेवून शाळेत पाठविते.

- मंजुषा गावंडे,

कोट

दीड वर्षापासून ऑनलाइन शिक्षण सुरू होते. कोरोनामुळे शाळेत विद्यार्थीच नव्हते शाळा केव्हा सुरू होणार अशी विचारणा दररोज होतीच. आता शाळा सुरू झाली आहे. पण कोराेना प्रादुर्भाव कमी झाला असला तरी भीती आहेच. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे.

- मनीषा घाटे,

कोट

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शिक्षणाचे काही खरे नाही, असे वाटले होते. मात्र, शाळा सुरू झाल्याने मुलांच्या मनावरील दडपण दूर झाले आहे. पण कोराेना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे द्विधामनस्थिती होती. पण शिक्षणही महत्त्वाचे आहे.

- पुष्पा फरदळे,

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण शाळा -७४७

सुरू झालेल्या शाळा -१८२

अद्याप बंद असलेल्या शाळा -५ ६६