शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

नांदगाव तालुक्याला सर्वाधिक मदत

By admin | Updated: January 21, 2017 00:11 IST

अत्यल्प पावसामुळे खरीप २०१५ हंगामातील सोयाबीन व कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

खरीप २०१५ मधील कपाशी, सोयाबीनचे नुकसान : सर्व तालुक्यांना निधी वाटपअमरावती : अत्यल्प पावसामुळे खरीप २०१५ हंगामातील सोयाबीन व कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना अर्थसहाय्यासाठी जिल्हा प्रशासनाला १०९ कोटी ३६ लाखांचा निधी गुरुवारी सर्व तालुक्यांना वितरित करण्यात आला. यात सर्वाधिक १७ कोटी ५४ लाखांची मदत नांदगाव खंडेश्वर तालुक्याला देण्यात येणार आहे.खरीप २०१५ मधील पिकांचे अपुऱ्या पावसामुळे नुकसान झाले होते व जिल्ह्याची पैसेवारी ४३ पैसे होती व जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. यासाठी शासनाने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत न करता पीक विमा मंजूर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात मदतीचा निर्णय २ मार्च २०१५ ला घेतला. मात्र २०१७ चा खरीप हंगाम संपूनही मदत मिळाली नाही. आता हा निधी गुरूवारी सर्व तहसीलदारांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित केला आहे. २९ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयाच्या अधीन राहून हा निधी वाटपाची कार्यवाही करण्यात येणार आहे. ही मदत शेतकऱ्यांना रोखीने न देता थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे व ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते नाही त्या शेतकऱ्यांचे जनधन योजनेखाली झीरो बॅलेन्स खाते उघडून त्या खात्यामध्ये ही मदत जमा करण्यात येणार आहे व मदतीमधून कोणतीही शासकीय थकीत वसुली करण्यात येऊ नये, असे शासनाचे निर्देश आहेत. निधी वाटपासाठी शेतकऱ्यांचे वेगवेगळे धनादेश न काढता बँकनिहाय व गावनिहाय शेतकऱ्यांकरिता एकत्रित रकमेचा धनादेश बँकेत जमा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)- तर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईशेतकऱ्यांच्या मदतीचा निधी कोषागारातून आहरीत करून तो बँकेमध्ये पडून राहिल्यास हा तात्पुरता अपहार समजून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. मदत वाटपाचा आढावा घेण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येणार आहे. बीडीओ उपाध्यक्ष व नायब तहसीलदार हे समितीचे सचिव राहणार आहेत.