शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

नांदगाव तालुक्याला सर्वाधिक मदत

By admin | Updated: January 21, 2017 00:11 IST

अत्यल्प पावसामुळे खरीप २०१५ हंगामातील सोयाबीन व कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

खरीप २०१५ मधील कपाशी, सोयाबीनचे नुकसान : सर्व तालुक्यांना निधी वाटपअमरावती : अत्यल्प पावसामुळे खरीप २०१५ हंगामातील सोयाबीन व कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना अर्थसहाय्यासाठी जिल्हा प्रशासनाला १०९ कोटी ३६ लाखांचा निधी गुरुवारी सर्व तालुक्यांना वितरित करण्यात आला. यात सर्वाधिक १७ कोटी ५४ लाखांची मदत नांदगाव खंडेश्वर तालुक्याला देण्यात येणार आहे.खरीप २०१५ मधील पिकांचे अपुऱ्या पावसामुळे नुकसान झाले होते व जिल्ह्याची पैसेवारी ४३ पैसे होती व जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. यासाठी शासनाने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत न करता पीक विमा मंजूर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात मदतीचा निर्णय २ मार्च २०१५ ला घेतला. मात्र २०१७ चा खरीप हंगाम संपूनही मदत मिळाली नाही. आता हा निधी गुरूवारी सर्व तहसीलदारांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित केला आहे. २९ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयाच्या अधीन राहून हा निधी वाटपाची कार्यवाही करण्यात येणार आहे. ही मदत शेतकऱ्यांना रोखीने न देता थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे व ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते नाही त्या शेतकऱ्यांचे जनधन योजनेखाली झीरो बॅलेन्स खाते उघडून त्या खात्यामध्ये ही मदत जमा करण्यात येणार आहे व मदतीमधून कोणतीही शासकीय थकीत वसुली करण्यात येऊ नये, असे शासनाचे निर्देश आहेत. निधी वाटपासाठी शेतकऱ्यांचे वेगवेगळे धनादेश न काढता बँकनिहाय व गावनिहाय शेतकऱ्यांकरिता एकत्रित रकमेचा धनादेश बँकेत जमा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)- तर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईशेतकऱ्यांच्या मदतीचा निधी कोषागारातून आहरीत करून तो बँकेमध्ये पडून राहिल्यास हा तात्पुरता अपहार समजून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. मदत वाटपाचा आढावा घेण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येणार आहे. बीडीओ उपाध्यक्ष व नायब तहसीलदार हे समितीचे सचिव राहणार आहेत.