शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पाच वर्षांत मान्सून पहिल्यांदाच उशिरा

By admin | Updated: June 28, 2014 00:19 IST

मागील पाच वर्षांमध्ये २००९ साली पाऊस कमी पडला, परंतु पेरण्या मात्र २२ जूनपूर्वीच आटोपल्या होत्या.

अमरावती : मागील पाच वर्षांमध्ये २००९ साली पाऊस कमी पडला, परंतु पेरण्या मात्र २२ जूनपूर्वीच आटोपल्या होत्या. इतर वर्षी मान्सून विदर्भात वेळेवर येत आहे. २०११ मध्ये तर विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मागील वर्षीच्या पावसाने १०० वर्षांचे रेकॉर्ड मोडले होते. यंदा मात्र जून संपत आला असतानाही पावसाची वक्रदृष्टी कायम असल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.मागील पाच वर्षांत विदर्भातील पेरण्या २२ जूनपूर्वीच झाल्यात. यंदा मात्र २७ जून उजाडला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खते, बी-बियाणे घरीच पडून आहेत. शेती मशागतीची कामे आटोपली आहे. ज्यांच्याजवळ सुविधा आहे त्यांनी पावसाची अधिक वाट न पाहता तुषार व ठिबक सिंचनाद्वारे कपाशीची पेरणी केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून दाखल झाला असला तरी पावसाचे वातावरण नसल्याने पाऊस अद्याप सक्रीय झालेला नाही. २००९ मध्ये पाऊस कमी होता. परंतु पिकाला आवश्यक व पोषक वातावरण मिळाले. त्यामुळे शेतकरी समाधानी होता. मागील वर्षी सरासरीच्या ३२० टक्के अधिक पाऊस पडला. त्यामुळे खरिपासह रबीचीही पिके अती पावसाने खराब झाली. परंतु यंदा पाऊसच नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहता २००९ मध्ये कमी पाऊस, २०१० मध्ये समाधानकारक, २००१ मध्ये सर्वसाधारण पण सरासरी पूर्ण, २०१२ मध्ये कमी पाऊस, २०१३ अती पाऊस, २०१४ मध्ये पावसाची सुरुवातही नाही, असे चित्र आहे. सध्या पेरणीलायक पाऊस नाही. किमान ६५ मि.मी. पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असा कृषी विभागाचा सल्ला आहे. पेरणी लांबत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढत आहे. (प्रतिनिधी)