शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
3
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
4
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
5
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
6
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
7
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
9
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
10
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
11
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
12
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
13
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
14
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
15
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
16
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
17
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
18
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

पाच वर्षांत मान्सून पहिल्यांदाच उशिरा

By admin | Updated: June 28, 2014 00:19 IST

मागील पाच वर्षांमध्ये २००९ साली पाऊस कमी पडला, परंतु पेरण्या मात्र २२ जूनपूर्वीच आटोपल्या होत्या.

अमरावती : मागील पाच वर्षांमध्ये २००९ साली पाऊस कमी पडला, परंतु पेरण्या मात्र २२ जूनपूर्वीच आटोपल्या होत्या. इतर वर्षी मान्सून विदर्भात वेळेवर येत आहे. २०११ मध्ये तर विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मागील वर्षीच्या पावसाने १०० वर्षांचे रेकॉर्ड मोडले होते. यंदा मात्र जून संपत आला असतानाही पावसाची वक्रदृष्टी कायम असल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.मागील पाच वर्षांत विदर्भातील पेरण्या २२ जूनपूर्वीच झाल्यात. यंदा मात्र २७ जून उजाडला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खते, बी-बियाणे घरीच पडून आहेत. शेती मशागतीची कामे आटोपली आहे. ज्यांच्याजवळ सुविधा आहे त्यांनी पावसाची अधिक वाट न पाहता तुषार व ठिबक सिंचनाद्वारे कपाशीची पेरणी केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून दाखल झाला असला तरी पावसाचे वातावरण नसल्याने पाऊस अद्याप सक्रीय झालेला नाही. २००९ मध्ये पाऊस कमी होता. परंतु पिकाला आवश्यक व पोषक वातावरण मिळाले. त्यामुळे शेतकरी समाधानी होता. मागील वर्षी सरासरीच्या ३२० टक्के अधिक पाऊस पडला. त्यामुळे खरिपासह रबीचीही पिके अती पावसाने खराब झाली. परंतु यंदा पाऊसच नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहता २००९ मध्ये कमी पाऊस, २०१० मध्ये समाधानकारक, २००१ मध्ये सर्वसाधारण पण सरासरी पूर्ण, २०१२ मध्ये कमी पाऊस, २०१३ अती पाऊस, २०१४ मध्ये पावसाची सुरुवातही नाही, असे चित्र आहे. सध्या पेरणीलायक पाऊस नाही. किमान ६५ मि.मी. पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असा कृषी विभागाचा सल्ला आहे. पेरणी लांबत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढत आहे. (प्रतिनिधी)