शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

खरीपाच्या दुष्काळस्थितीवर मोहोेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:09 IST

अमरावती : सुरुवातीला पावसात खंड व नंतर सरासरी पार झालेल्या पावसाने खरीपाची पिके पूर्ण उद्‌ध्वस्त झाली. त्यामुळे अंतिम पैसेवारी ...

अमरावती : सुरुवातीला पावसात खंड व नंतर सरासरी पार झालेल्या पावसाने खरीपाची पिके पूर्ण उद्‌ध्वस्त झाली. त्यामुळे अंतिम पैसेवारी काय जाहीर होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते, यामध्ये गुरुवारी उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच म्हणजे १,९६० गावांची ४६ पैसेवारी जाहीर केल्याने दुष्काळस्थितीवर शासनाची एकप्रकारे मोहोर लागली आहे.

जिल्ह्यात यंदाच्या खरीपात ६,८७,८९३ हेक्टरवर पेरणी झाली. सुरुवातील पावसात काही खंड राहिल्याने मूग, उडीद आदी ६० दिवसांचे पिके पूर्णत: खराब झाली. तर बियाणे कंपन्यांनी उगवणशक्ती नसलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने ५० हजारावर हेक्टरमधील सोयाबीन उगवलेच नाही. याशिवाय सोयाबीन फुलोरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना ऑगस्ट महिन्यापासून पावसाने जिल्ह्यात रिपरिप लावली ती ऑक्टोबरपर्यत सुरूच होती. यामध्ये सोयाबीन जागेवरच सडले व काही भागात गंज्या सडल्या, सोयाबीनची प्रतवारी खराब झाली. शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादनखर्चही पडला नाही.

सरासरीपेक्षा जास्त पावसाने जमिनीत आर्द्रता व ढगाळ वातावरण यामुळे कपाशीवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. गुलाबी बोंडअळीसोबत यंदा ८० टक्के कपाशीवर यंदा बोंडसडचे संकट उद्भवले त्यामुळे कपाशीच्या सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांनी कमी आलेली आहे. अनेक भागात शेतकऱ्यांनी कपाशी काढून रबीसाठी हरभऱ्याची पेरणी केल्याचे दिसून आले. सततच्या पावसामुळे काही भागात तुरीवर ‘मर’रोगाचा प्रादुर्भाव झाला व आता शीतलहरमध्ये दवाळ गेल्याने तूर जागेवरच सुकत असल्याने नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे, त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत खरीपाची अंतिम पैसेवारी ४६ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला व आठ प्रकारच्या सवलती मिळण्याच मार्ग मोकळा झालेला आहे.

बॉक्स

पैसेवारीची तालुकानिहाय स्थिती

तालुका ५० पैशाच्या आतील गावे पैसेवारी

अमरावती १३९ ४७

भातकुली १३७ ४७

तिवसा ९५ ४७

चांदूर रेल्वे ९० ४६

धामणगाव रेल्वे ११२ ४१

नांदगाव खंडेश्वर १६१ ४७

मोर्शी १५६ ४४

वरुड १४० ४६

अचलपूर १८५ ४७

चांदूरबाजार १६९ ४७

दर्यापूर १५० ४६

अंजनगाव सुर्जी १२७ ४५

धारणी १५२ ४९

चिखलदरा १४७ ४८

एकूण १४७ ४६

बॉक्स

बोंडसडमुळे २.१७ लाख हेक्टरमधील कपाशी बाधित

यंदा पावसामुळे कपाशीवर बोंडसड, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामध्ये २,४४,००२ हेक्टर क्षेत्रापौकी २,१७,००१ हेक्टरमधील कपाशीचे ३३ टक्क्यावर नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १५,९९९ हेक्टर, भातकुली १४,०५०, चांदूर रेल्वे ६,२८०, धामणगाव रेल्वे १६,८१०, नांदगाव खंडेश्वर ६,५००, अचलपूर १४,५००, अंजनगाव सुर्जी १७,५३८, दर्यापूर ३६,६०१, धारणी ९०, चिखलदरा १८५९, मोर्शी २९,८२६, वरुड २९,८९१, तिवसा १०,००० व चांदूरबाजार तालुक्यात १६,९५७ हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे.