शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

पीकविम्यासाठी मोदींची सरपंचांना साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 00:16 IST

सततचा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती यापासून शेतीपिकांचे नुकसान टाळून त्यांना आर्थिक मदत मिळावी, ...

जनजागृतीसाठी पत्र : आपत्तीत पिकांचे नुकसान टाळाअमरावती : सततचा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती यापासून शेतीपिकांचे नुकसान टाळून त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्राच्या पंतप्रधान पीक विमा योजनेबद्दल जागृती व्हावी, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावगावच्या सरपंचांना पत्र पाठवून पीक विम्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्याला कृषीबिंदू मानून शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठी व त्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत व्हावी, यासाठी केंद्राने नुकतीच पंतप्रधान राष्ट्रीय पीकविमा योजना सुरू केली. यामध्ये पूर्वीच्या विमा योजनेतील अनेक जाचक अटी रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व हंगामांसाठी एकच पीकविमा असल्याने प्रत्येक पिकाला याचा लाभ होणार आहे. त्यामुळे पिकनिहाय विमा काढण्याची आता गरज राहिली नाही. कोणत्याही भागातील शेतकरी खरीप व रबी हंगामासाठी पीक विम्याचा लाभ घेऊ शकतो. या प्रिमीअमपोटी शेतकऱ्यांना २० टक्के रक्कम भरणे अनिवार्य आहे. गारपीट, पूर, अतिवृष्टी, दुष्काळ व पावसाअभावी शेतीपिकांचे नुकसान यासाठी पीकविम्याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे गावपातळीवर या योजनेची जनजागृती व्हावी, यासाठी नरेंद्र मोदी यांनी सरपंचांना साद घातली आहे. नरेंद्र मोदी यांचे थेट पत्र सरपंचांना आल्यामुळे सरपंच भारावले आहेत. गावचे सरपंच हे त्या गावाच्या विकास कामांचे प्रमुख असतात. तसेच गावातील प्रत्येक गोष्टीच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन जाणे त्यांचे कर्तव्य आहे, याची जाणीव करून देणारा मोदी यांचा पत्रव्यवहार महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच गाव प्रमुखाला जर योजनेची माहिती करून दिली तर गावातील शेवटच्या घटकांपर्यंत ती माहिती पोहोचणार आहे. (प्रतिनिधी)पंतप्रधानांच्या पत्रामुळे सरपंच भारावलेपंतप्रधान कार्यालयाच्यावतीने गावोगावच्या सरपंचांशी थेट पत्रव्यवहार करण्यात आला. यामध्ये पंतप्रधान पीकविमा योजनेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन सरपंचांना करण्यात आले आहे. देशाच्या प्रमुखांचे पत्र थेट ग्रामपंचायतींना आल्याने सरपंच भारावले आहेत.