शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

पीकविम्यासाठी मोदींची सरपंचांना साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 00:16 IST

सततचा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती यापासून शेतीपिकांचे नुकसान टाळून त्यांना आर्थिक मदत मिळावी, ...

जनजागृतीसाठी पत्र : आपत्तीत पिकांचे नुकसान टाळाअमरावती : सततचा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती यापासून शेतीपिकांचे नुकसान टाळून त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्राच्या पंतप्रधान पीक विमा योजनेबद्दल जागृती व्हावी, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावगावच्या सरपंचांना पत्र पाठवून पीक विम्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्याला कृषीबिंदू मानून शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठी व त्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत व्हावी, यासाठी केंद्राने नुकतीच पंतप्रधान राष्ट्रीय पीकविमा योजना सुरू केली. यामध्ये पूर्वीच्या विमा योजनेतील अनेक जाचक अटी रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व हंगामांसाठी एकच पीकविमा असल्याने प्रत्येक पिकाला याचा लाभ होणार आहे. त्यामुळे पिकनिहाय विमा काढण्याची आता गरज राहिली नाही. कोणत्याही भागातील शेतकरी खरीप व रबी हंगामासाठी पीक विम्याचा लाभ घेऊ शकतो. या प्रिमीअमपोटी शेतकऱ्यांना २० टक्के रक्कम भरणे अनिवार्य आहे. गारपीट, पूर, अतिवृष्टी, दुष्काळ व पावसाअभावी शेतीपिकांचे नुकसान यासाठी पीकविम्याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे गावपातळीवर या योजनेची जनजागृती व्हावी, यासाठी नरेंद्र मोदी यांनी सरपंचांना साद घातली आहे. नरेंद्र मोदी यांचे थेट पत्र सरपंचांना आल्यामुळे सरपंच भारावले आहेत. गावचे सरपंच हे त्या गावाच्या विकास कामांचे प्रमुख असतात. तसेच गावातील प्रत्येक गोष्टीच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन जाणे त्यांचे कर्तव्य आहे, याची जाणीव करून देणारा मोदी यांचा पत्रव्यवहार महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच गाव प्रमुखाला जर योजनेची माहिती करून दिली तर गावातील शेवटच्या घटकांपर्यंत ती माहिती पोहोचणार आहे. (प्रतिनिधी)पंतप्रधानांच्या पत्रामुळे सरपंच भारावलेपंतप्रधान कार्यालयाच्यावतीने गावोगावच्या सरपंचांशी थेट पत्रव्यवहार करण्यात आला. यामध्ये पंतप्रधान पीकविमा योजनेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन सरपंचांना करण्यात आले आहे. देशाच्या प्रमुखांचे पत्र थेट ग्रामपंचायतींना आल्याने सरपंच भारावले आहेत.