शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

मोदी लाटेत सोडली नाही मेळघाटने आघाडीची साथ

By admin | Updated: May 25, 2014 23:15 IST

२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएसह भाजपच्या नमो फॅक्टरने देशात इतर पक्षांचे पानिपत केले. अमरावती लोकसभा मतदार संघातही ‘अडसूळ मजबुरी है मोदी जरुरी है’ या फॅक्टरचा प्रभाव पडला.

श्यामकांत पाण्डेय - धारणी

२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएसह भाजपच्या नमो फॅक्टरने देशात इतर पक्षांचे पानिपत केले. अमरावती लोकसभा मतदार संघातही ‘अडसूळ मजबुरी है मोदी जरुरी है’ या फॅक्टरचा प्रभाव पडला. नमो लहरचा मेळघाट विधानसभा मतदारसंघात कोणताही प्रभाव जाणवला नाही. याउलट २00९ पेक्षाही जास्त मताधिक्य आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना देऊन आजही मेळघाटात काँग्रेस पक्षालाच पहिली पसंती दिली गेली.

मेळघाट विधानसभा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून सध्या काँग्रेसचे केवलराम काळे आमदार आहेत. माजी आमदार राजकुमार पटेल यांनी भाजपची सोडचिठ्ठी घेत नवनीत राणा यांच्याकरिता खुलेआम प्रचारात सहभाग घेतला. त्यांनी एकीकडे दम मारून राणा यांना मताधिक्य देण्याचा प्रयत्न चालविला असताना काँग्रेसचे काही नेते आतून राणांच्या मतात भर घालण्याऐवजी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात मग्न होते. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात मेळघाटातून मताधिक्य मिळवता आले नाही. तरीही २00९ मध्ये रिपाइंचे गवई यांना अडसुळांपेक्षा ५९३७ मताधिक्य प्राप्त करता आले. त्या मानाने यंदा हे मताधिक्य चार पटीने जास्त म्हणजेच २१,४९६ मते मिळवता आले तेही मोदी लहर असताना.

मेळघाट मतदारसंघ सदैव काँग्रेस पक्षाशी प्रामाणिकपणा बाळगणारा मतदारसंघ आहे. येथे आजही इंदिरा गांधी व सोनिया गांधी यांचा आदर्श जपला जातो. परंतु येथील नेत्यांची आपसातील मतभेद व स्वार्थी राजकारणाने काँग्रेसला वर येऊ दिले नाही. येथील काँग्रेस, राकाँची प्रवृत्ती सामान्य जनतेला घातक ठरत आहे. २0१४ मध्ये संपूर्ण देशात मोदी लाट होती. या लाटेने जिल्ह्यातील मतदारांना आकृष्ट केले व एकदा संधी देऊन पाहू, असा विचार केला. पण मेळघाटने राकाँच्या नवख्या उमेदवारालाही भरभरुन मते दिली. येथील काँग्रेस, राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांनी प्रामाणिकता दाखविली असती तर मेळघाटचे मताधिक्य ५0 हजारांच्यावर राहिले असते, असे आता दबक्या आवाजात बोलले जात आहे. याचा फटका मात्र विधानसभेत बसू नये याची काळजी आमदार केवलराम काळे यांना घेणे आवश्यक झाले आहे.