शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

पशुसंवर्धनाच्या आधुनिक बदलाने अर्थव्यवस्था भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 22:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र शासनाने १ मे १९५० नंतर पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय असे स्वतंत्र खाते सुरू केले. पशुसंवर्धन दिन साजरा करण्याचा हेतू समाजातील अतिशय कष्टाळू, मेहनती व ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या माणसांशी संबंधित आहे, जेणेकरून पशुसंवर्धनात आधुनिक बदल करून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल.विदेशी जातींपासून संकरीकरणाचा अप्रत्यक्ष परिणाम देशीपासून ...

ठळक मुद्देआज पशुसंवर्धन दिन : जातिवंत गोधनाची वंशावळी केली जातेय जतन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र शासनाने १ मे १९५० नंतर पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय असे स्वतंत्र खाते सुरू केले. पशुसंवर्धन दिन साजरा करण्याचा हेतू समाजातील अतिशय कष्टाळू, मेहनती व ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या माणसांशी संबंधित आहे, जेणेकरून पशुसंवर्धनात आधुनिक बदल करून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल.विदेशी जातींपासून संकरीकरणाचा अप्रत्यक्ष परिणाम देशीपासून गावठी/नॉन डिस्क्रिप्ट पशुधन निर्माण झाले. अशा काही वंशावळी निर्माण झाल्या आहेत की, त्यांची वर्गवारी करणे कठीण झाले आहे. जातिवंत पशुधनाची वंशावळी जतन करून कृत्रिम रेतनाद्वारे त्याचा उपयोग करणे फायदेशीर ठरत आहे. अधिक उत्पादनांसोबत वातावरणाशी समरस होणारी आनुवंशिकता शोधून शेतकऱ्यांच्या दारात पोहचविण्याची जबाबदारी पशुचिकित्सकांवर आली आहे. २० ते ३० वयोगटातील पदवीधर व सुशिक्षित युवक या व्यवसायाकडे वळले पाहिजे, या दृष्टीने यंत्रे, पैसा व अनुदान पुरविण्याचे काम शासन करीत आहे. पशुसंवर्धन दिनाच्या निमित्ताने राज्यभरात २० मे रोजी शेतकरी कार्यशाळा, परिसंवाद, पशुरोग व वंध्यत्व निवारण शिबिरे, आवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, जिल्ह्यातसुद्धा अनेक कार्यक्रम आयोजित होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसवंर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे यांनी दिली.देशी जातिवंत गोधन होतेय कमीसंवर्धन म्हणजे जोपासना करणे, जपणे, निगा राखणे, आरोग्य अबाधित ठेवणे, नष्ट होण्यापासून बचाव करणे होय. मात्र, अधिकाधिक दूध उत्पादनाच्या स्पर्धेत संकरीकरणाच्या माध्यमातून विदेशी जातीचा वापर सुरू झाल्याने भारतात जातिवंत पशुधनाच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते. दूध उत्पादनात अव्वल भारतात जातिवंत गोधनाची गुणओळख अस्पष्ट होत आहे.संख्यात्मक प्रगती झाली; गुणात्मक केव्हा?आज मुक्त अर्थव्यवस्थेच्या युगात दुधाच्या प्रत राखण्याकडे गांभीर्याने लक्ष पुरविणे नितांत गरजेचे आहे. दुधाची गुणवत्ता ही फॅट व एस.एन.एफ.वर ठरविली जाते. डब्ल्यू.टी.ओ.च्या अंमलबजावणीनंतर दुधात बिनरोगकारक जंतूंची संख्या मापदंडाप्रमाणे असावी व प्रतिजैविक औषधांचा अंश दुधामध्ये असायला नको. भारतासारख्या विकसनशील देशातील डेअरी उद्योगात संख्यात्मक प्रगती झाली असली तरी गुणात्मक प्रगतीकरिता विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे.महानंदा प्रकल्प ठरतोय संजीवनीअनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी पशुपालक आर्थिक डबघाईस आल्याचे स्पष्ट दिसून येते. कमकुवत आर्थिक बाजू शेतकऱ्यांचे मनोबल खच्ची करण्यास कारणीभूत ठरत आहे. आर्थिक विषमता या गोष्टीत मारक ठरली आहे. अशा परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न पशुसंवर्धन खाते, राष्ट्रीय दुग्धविकास बोर्ड व सदर डेअरीच्या साहाय्याने होत आहेत. या तिन्ही यंत्रणांच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यात ‘महादूध प्रकल्प’ दूध उत्पादकांना अर्थार्जनासाठी फायद्याचा ठरत आहे.