शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

राज्यमंत्र्यांची घर बांधकाम परवानगी घोषणा हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST

करजगाव : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात बोलताना आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करून ग्रामसेवक आणि सरपंचाकडून बांधकाम ...

करजगाव : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात बोलताना आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करून ग्रामसेवक आणि सरपंचाकडून बांधकाम परवाना मिळणार, अशी घोषणा केली असून सध्या ती हवेतच आहे.

तत्कालीन भाजप सरकारने घेतलेला निर्णय आता रद्द करून नवीन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची घोषणा ठाकरे सरकारकडून करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन फडणवीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्दबातल केले आहे. बांधकाम परवाना शासन निर्णय असल्याची घोषणा केलेली आहे. घर बांधकाम परवानगी फडणवीस सरकारने ग्रामपंचायतीकडून काढून घेऊन नगररचना विभागाकडे म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय स्थित नगर रचना विभागाकडे दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना बांधकाम परवानगीसाठी अडचणी येत होत्या. हेलपाटे मारावे लागत होते. नगर रचना विभाग खाबुगिरीमुळे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होती. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीसुद्धा विरोध केला होता याची दखल घेऊन फडणवीस सरकारचा हा निर्णय महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण भागातील बांधकामांना परवानगी देण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना होता. परंतु सरकारने हा अधिकार ग्रामपंचायतीकडून काढून घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात नगर रचना विभाग आणि ग्रामपंचायतीमार्फत ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय बांधकाम परवाना काढावा लागत होता आणि त्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय होत होती. परवानगी मिळवण्यासाठी बांधकाम परवाना आवश्यक असल्याने बांधकाम परवाना मिळवन्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी येत होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे अधिकार दिल्याची घोषणा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. त्यामुळे आता इथून पुढे ग्रामीण भागात घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करून ग्रामसेवक आणि सरपंच बांधकाम परवाना मिळणार, अशी घोषणा केली असून सध्या ती हवेतच आहे. कारण घोषणा करून दोन महिने झाली. अद्याप शासस्तरावरून ग्रामपंचायत व पंचायत समिती यांना शासणादेश प्राप्त न झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय स्थित नगर रचना विभागाकडे चकरा माराव्या लागत आहे.

कोट

ग्रामीण भागातील घर बांधकाम परवानगी देण्याबाबतचा शासानादेश प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अद्याप हा अधिकार नगर रचना विभागाकडे आहे.

- डॉ.प्रफुल्ल भोरखडे.

गटविकास अधिकारी, पंचायत समिती चांदूरबाजार