शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

स्थलांतरित वाघांनी विदर्भाचे क्षेत्र व्यापले, सीमेलगतच्या राज्यातून आवागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST

व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांची सुरक्षितता धोक्यात, वनविभागामार्फत ट्रॅप कॅमेऱ्यांनी मॉनिटरिग अमरावती : व्याघ्र प्रकल्पाबाहेरील राखीव जंगलात स्थलांतरित वाघांनी क्षेत्र व्यापले ...

व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांची सुरक्षितता धोक्यात, वनविभागामार्फत ट्रॅप कॅमेऱ्यांनी मॉनिटरिग

अमरावती : व्याघ्र प्रकल्पाबाहेरील राखीव जंगलात स्थलांतरित वाघांनी क्षेत्र व्यापले आहे. चंद्रपूर येथे वाघांची संख्या ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने ते वाघ आता यवतमाळपर्यंत पोहोचत आहेत. एकूणच विदर्भात वाघांनी स्वत:च कॉरिडॉर तयार केल्याचे चित्र आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्पाबाहेर पडणाऱ्या वाघांची सुरक्षितता धोक्यात आली, हेही तितकेच खरे आहे. जवळपास २४४ वाघ विदर्भात असल्याची नोंद घेण्यात आली आहे.

चंद्रपूर, भंडारा, गाेंदिया, गडचिरोली, ब्रम्हपुरी या पूर्व विदर्भात वाघांची संख्या अधिक झाली आहे. वाघांना आता बफर झोन, कोअर एरिया कमी पडू लागल्याने त्यांनी सावज शाेधण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाबाहेर धाव घेतली आहे. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया भागातील वाघांनी यवतमाळपर्यंत येण्याची मजल गाठली आहे. बुलडाणा येथील ज्ञानगंगा, वाशिम, पांढरकवडा आणि अकोला येथील राखीव जंगलात वाघांचे वास्तव्य आहे. मेळघाटातून वरूड, मोर्शी, सालबर्डीमार्गे मध्य प्रदेशातील जंगलात वाघांचा संचार वाढला आहे. राखीव वनक्षेत्रात वाघ असल्याची नाेंददेखील झाली आहे. बोर अभयारण्यातून गत दोन वर्षांपूर्वी चांदूर रेल्वे, पोहरा-मालखेड जंगलात वाघ आल्याची नाेंद आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, एकट्या विदर्भात ताडोबा-अंधारी, नवेगाव- नागझिरा, मेळघाट, पेंच, बोर अशी पाच अभयारण्ये आहेत. चंद्रपूर येथून यवतमाळ एमआयडीसीपर्यंत वाघांचा संचार वाढला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर,काटोल, रामटेक, वानडोंगरी, कोंढाळी असा कॉरिडॉर तयार झाला आहे. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघ स्थलांतरित होत असून, सीमेलगतच्या मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात मुक्त संचार करीत आहेत.

------------

गडचिरोलीच्या जंगलात मानव-वन्यजीव संघर्ष नाही

गडचिरोलीच्या जंगलातही वाघ आहेत. मात्र, जंगलात नक्षलवाद्यच्कडून टिपले जाऊ, या भीतीने येथे वाघांची शिकार करण्यात कुणी धजावत नाही. गडचिरोलीच्या जंगलात अंदाजे नऊ वाघ आहे. परंतु, येथे मानव-वन्यजीव संघर्ष नाही.

-------------

व्याघ्र प्रकल्पाबाहेरील राखीव वनांच्या परिसराची ‘टायगर बेअरिंग’ अशी नोंद असते. या भागात वाघ आढळल्यास त्याच्यावर ट्रॅप कॅमेरे, वनकर्मचाऱ्यांची पाळत ठेवली जाते. विदर्भात वाघांची संख्या वाढ झाली, हे खरे आहे. मात्र, स्थलांतरही वाढले आहे.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक

------------------

अशी आहे विदर्भात वाघांची संख्या

गोंदिया- १०

भंडारा - ८

वर्धा (बोर) - ८

अमरावती (मेळघाट) - ४४

अकोला (काटेपूर्णा) - ५

बुलडाणा (ज्ञानगंगा) - ७

यवतमाळ, आर्णी - ५

पांढरकवडा - १०

गडचिरोली - ९

वाशिम - २

चंद्रपूर (ताडोबा-अंधारी) - ८५

नागपूर - १२

टिपेश्वर - २५