शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

स्थलांतरित वाघांनी विदर्भाचे क्षेत्र व्यापले, सीमेलगतच्या राज्यातून आवागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST

व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांची सुरक्षितता धोक्यात, वनविभागामार्फत ट्रॅप कॅमेऱ्यांनी मॉनिटरिग अमरावती : व्याघ्र प्रकल्पाबाहेरील राखीव जंगलात स्थलांतरित वाघांनी क्षेत्र व्यापले ...

व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांची सुरक्षितता धोक्यात, वनविभागामार्फत ट्रॅप कॅमेऱ्यांनी मॉनिटरिग

अमरावती : व्याघ्र प्रकल्पाबाहेरील राखीव जंगलात स्थलांतरित वाघांनी क्षेत्र व्यापले आहे. चंद्रपूर येथे वाघांची संख्या ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने ते वाघ आता यवतमाळपर्यंत पोहोचत आहेत. एकूणच विदर्भात वाघांनी स्वत:च कॉरिडॉर तयार केल्याचे चित्र आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्पाबाहेर पडणाऱ्या वाघांची सुरक्षितता धोक्यात आली, हेही तितकेच खरे आहे. जवळपास २४४ वाघ विदर्भात असल्याची नोंद घेण्यात आली आहे.

चंद्रपूर, भंडारा, गाेंदिया, गडचिरोली, ब्रम्हपुरी या पूर्व विदर्भात वाघांची संख्या अधिक झाली आहे. वाघांना आता बफर झोन, कोअर एरिया कमी पडू लागल्याने त्यांनी सावज शाेधण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाबाहेर धाव घेतली आहे. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया भागातील वाघांनी यवतमाळपर्यंत येण्याची मजल गाठली आहे. बुलडाणा येथील ज्ञानगंगा, वाशिम, पांढरकवडा आणि अकोला येथील राखीव जंगलात वाघांचे वास्तव्य आहे. मेळघाटातून वरूड, मोर्शी, सालबर्डीमार्गे मध्य प्रदेशातील जंगलात वाघांचा संचार वाढला आहे. राखीव वनक्षेत्रात वाघ असल्याची नाेंददेखील झाली आहे. बोर अभयारण्यातून गत दोन वर्षांपूर्वी चांदूर रेल्वे, पोहरा-मालखेड जंगलात वाघ आल्याची नाेंद आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, एकट्या विदर्भात ताडोबा-अंधारी, नवेगाव- नागझिरा, मेळघाट, पेंच, बोर अशी पाच अभयारण्ये आहेत. चंद्रपूर येथून यवतमाळ एमआयडीसीपर्यंत वाघांचा संचार वाढला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर,काटोल, रामटेक, वानडोंगरी, कोंढाळी असा कॉरिडॉर तयार झाला आहे. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघ स्थलांतरित होत असून, सीमेलगतच्या मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात मुक्त संचार करीत आहेत.

------------

गडचिरोलीच्या जंगलात मानव-वन्यजीव संघर्ष नाही

गडचिरोलीच्या जंगलातही वाघ आहेत. मात्र, जंगलात नक्षलवाद्यच्कडून टिपले जाऊ, या भीतीने येथे वाघांची शिकार करण्यात कुणी धजावत नाही. गडचिरोलीच्या जंगलात अंदाजे नऊ वाघ आहे. परंतु, येथे मानव-वन्यजीव संघर्ष नाही.

-------------

व्याघ्र प्रकल्पाबाहेरील राखीव वनांच्या परिसराची ‘टायगर बेअरिंग’ अशी नोंद असते. या भागात वाघ आढळल्यास त्याच्यावर ट्रॅप कॅमेरे, वनकर्मचाऱ्यांची पाळत ठेवली जाते. विदर्भात वाघांची संख्या वाढ झाली, हे खरे आहे. मात्र, स्थलांतरही वाढले आहे.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक

------------------

अशी आहे विदर्भात वाघांची संख्या

गोंदिया- १०

भंडारा - ८

वर्धा (बोर) - ८

अमरावती (मेळघाट) - ४४

अकोला (काटेपूर्णा) - ५

बुलडाणा (ज्ञानगंगा) - ७

यवतमाळ, आर्णी - ५

पांढरकवडा - १०

गडचिरोली - ९

वाशिम - २

चंद्रपूर (ताडोबा-अंधारी) - ८५

नागपूर - १२

टिपेश्वर - २५