शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:15 IST

अमरावती : गत दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुलांना विविध छंद जडले आहेत. शाळा नाही, अभ्यास नाही. त्यामुळे मुलांचे ...

अमरावती : गत दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुलांना विविध छंद जडले आहेत. शाळा नाही, अभ्यास नाही. त्यामुळे मुलांचे हट्ट पुरविताना पालकांची दमछाक होत आहे. दिवस निघताच मुलांना हाती मोबाईल हवे, अन्यथा घरात चिडचिड आणि रागावतात. त्यामुळे पालकही चिंतातूर झाले आहे. मुलांच्या सवयी बदलल्याने आरोग्यावर जाणवत आहे.

कोरोनामुळे शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहे. मुलांच्या दिनचर्येत बदल झाला आहे. ८० ते ९० टक्के मुलांचे मैदानी खेळ थांबले आहे. लॅपटॉप अथवा टॅबवर ऑनलाईन शिक्षणाच्या नावे कॉर्टून, सिनेमा बघण्यात मुले मग्न असतात. मुलांना याबाबत मज्जाव केल्यास ते रागावत असल्याच्या तक्रारी अनेक पालकांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे नोंदविल्या आहेत. शाळा बंद असल्याने मुले शिक्षणापासून दूर जात आहेत.

---------------------

मुलांच्या समस्या...

- शहरी भागात जवळपास सर्व पालकांनी ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल खरेदी केला आहे, मात्र, मुले ऑनलाईन शिक्षणाऐवजी कॉर्टून फिल्म, गेम खेळतात.

- पुस्तकाऐवजी मुलांच्या हाती मोबाईल आल्याने मुलांच्या सवयीत प्रचंड बदल झाला आहे. मानसिक आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. आवडी-निवडी पूर्ण करताना पालक त्रस्त झाले आहे.

- मैदानी खेळ बंद झाले. त्याऐवजी मोबाईल टिव्हीने जागा घेतली आहे. शाळा बंद असल्याने मित्र, सवंगडी हरविल्याचे चित्र आहे.

---------------------

पालकांच्या समस्या...

- कोरोना काळात शाळा बंद असल्याने मुले बाहेर पडू नये, यासाठी घरातच टिव्हीसमोर बसून राहण्याची सक्ती केली होती.. आता ही सवय मानसिक आरोग्यासाठी घातक ठरत आहे. मुलांना डोळ्याचे आजार, डोके दुखीचे त्रास वाढले आहे.

- मुलांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे. सतत टीव्हीसमोर बसत असल्याने डाेळ्यांचा आजार, मासनिक आरोग्य जडले आहे.

---------------

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

‘‘ ६ ते १६ वयोगटातील मुलांना मानसिक आजाराचे रूग्ण वाढले आहेत. पालक तशा मुलांच्या समस्या घेऊन येत आहेत. हा सर्व प्रकार लहान मुलांच्या सवयी बदलल्याने घडत आहे.

- आशिष साबू, मानसोपचार तज्ज्ञ

---------------

मुलांच्या सवयी आणि चिडचिडपणा वाढल्याच्या तक्रारी घेऊन पालकांची संख्या वाढली आहे. मोबाईल, टिव्हीमुळे मुलांना मानसिक आजार होत असल्याची बाब ही खरी आहे. नियमित सवयी बदलल्याचा हा परिणाम आहे.

- सुजय वानखडे, मानसोपचार तज्ज्ञ