शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:15 IST

अमरावती : गत दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुलांना विविध छंद जडले आहेत. शाळा नाही, अभ्यास नाही. त्यामुळे मुलांचे ...

अमरावती : गत दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुलांना विविध छंद जडले आहेत. शाळा नाही, अभ्यास नाही. त्यामुळे मुलांचे हट्ट पुरविताना पालकांची दमछाक होत आहे. दिवस निघताच मुलांना हाती मोबाईल हवे, अन्यथा घरात चिडचिड आणि रागावतात. त्यामुळे पालकही चिंतातूर झाले आहे. मुलांच्या सवयी बदलल्याने आरोग्यावर जाणवत आहे.

कोरोनामुळे शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहे. मुलांच्या दिनचर्येत बदल झाला आहे. ८० ते ९० टक्के मुलांचे मैदानी खेळ थांबले आहे. लॅपटॉप अथवा टॅबवर ऑनलाईन शिक्षणाच्या नावे कॉर्टून, सिनेमा बघण्यात मुले मग्न असतात. मुलांना याबाबत मज्जाव केल्यास ते रागावत असल्याच्या तक्रारी अनेक पालकांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे नोंदविल्या आहेत. शाळा बंद असल्याने मुले शिक्षणापासून दूर जात आहेत.

---------------------

मुलांच्या समस्या...

- शहरी भागात जवळपास सर्व पालकांनी ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल खरेदी केला आहे, मात्र, मुले ऑनलाईन शिक्षणाऐवजी कॉर्टून फिल्म, गेम खेळतात.

- पुस्तकाऐवजी मुलांच्या हाती मोबाईल आल्याने मुलांच्या सवयीत प्रचंड बदल झाला आहे. मानसिक आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. आवडी-निवडी पूर्ण करताना पालक त्रस्त झाले आहे.

- मैदानी खेळ बंद झाले. त्याऐवजी मोबाईल टिव्हीने जागा घेतली आहे. शाळा बंद असल्याने मित्र, सवंगडी हरविल्याचे चित्र आहे.

---------------------

पालकांच्या समस्या...

- कोरोना काळात शाळा बंद असल्याने मुले बाहेर पडू नये, यासाठी घरातच टिव्हीसमोर बसून राहण्याची सक्ती केली होती.. आता ही सवय मानसिक आरोग्यासाठी घातक ठरत आहे. मुलांना डोळ्याचे आजार, डोके दुखीचे त्रास वाढले आहे.

- मुलांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे. सतत टीव्हीसमोर बसत असल्याने डाेळ्यांचा आजार, मासनिक आरोग्य जडले आहे.

---------------

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

‘‘ ६ ते १६ वयोगटातील मुलांना मानसिक आजाराचे रूग्ण वाढले आहेत. पालक तशा मुलांच्या समस्या घेऊन येत आहेत. हा सर्व प्रकार लहान मुलांच्या सवयी बदलल्याने घडत आहे.

- आशिष साबू, मानसोपचार तज्ज्ञ

---------------

मुलांच्या सवयी आणि चिडचिडपणा वाढल्याच्या तक्रारी घेऊन पालकांची संख्या वाढली आहे. मोबाईल, टिव्हीमुळे मुलांना मानसिक आजार होत असल्याची बाब ही खरी आहे. नियमित सवयी बदलल्याचा हा परिणाम आहे.

- सुजय वानखडे, मानसोपचार तज्ज्ञ