शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील रुग्णांना ‘रेफर टू अमरावती’चे ग्रहण संपता संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:10 IST

श्यामकांत पाण्डेय धारणी : मेळघाटातील जनतेला स्वातंत्र्याचा ७४ वर्षांनंतर आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या ६० वर्षांनंतरसुद्धा प्राथमिक सुविधेपासून ...

श्यामकांत पाण्डेय

धारणी : मेळघाटातील जनतेला स्वातंत्र्याचा ७४ वर्षांनंतर आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या ६० वर्षांनंतरसुद्धा प्राथमिक सुविधेपासून वंचित राहावे लागते आहे. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे गोरगरीब आदिवासी जनतेला लहानसहान अपघात, जखमा, आजारावरील उपचारासाठीही १५० किमी अंतरावरील अमरावती मुख्यालयात पाठविले जाते. त्यामुळेच तालुक्यातील जनता शासनाच्या आरोग्य यंत्रणेकडे जाण्याऐवजी आजाराच्या निवारणासाठी परिहारकडे धाव घेत असल्याचे चित्र आजही कायम आहे.

शासकीय रुग्णालयांमध्ये कागदोपत्री सर्व काही आलबेल असल्याचे दाखविले जात असले तरी मोठ्या इमारतीव्यतिरिक्त अंतर्गत व्यवस्था मात्र ईश्वराच्या मर्जीवरच असल्यामुळे लोकांचा आरोग्य विभागावर विश्वास आजही बसलेला नाही. सध्या मेळघाटात धारणीत उपजिल्हा रुग्णालय असून, तेथे ५० खाटांची व्यवस्था आहे. प्रत्येकी १५ किमी अंतरावर एक याप्रमाणे सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, प्रत्येक दहा किमी अंतरावर १२ उपकेंद्रे आहेत.