शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

तुरुंगातही मावेना कार्यकर्ते

By admin | Updated: December 13, 2015 00:14 IST

१९८६ च्या डिसेंबरमधील गोष्ट. ७ ते १२ डिसेंबरपर्यंत शरद जोशींनी आंदोलनाची हाक दिली.

जगदीश नाना बोंडे : आठवणींचे वादळअमरावती : १९८६ च्या डिसेंबरमधील गोष्ट. ७ ते १२ डिसेंबरपर्यंत शरद जोशींनी आंदोलनाची हाक दिली. कापसासाठी लाखो पोशिंदे रस्त्यावर उतरले. राज्याच्या विविध ठिकाणची कारागृहे शेतकरी, शेतमजुरांनी हाऊसफुल्ल झाली. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त. मुंगीलाही पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल, अशी स्थिती. वर्धा जिल्ह्यातील वरूड रेल्वे स्टेशन ‘लामबंद’! सारे काही झुगारून गनिमी काव्याने तब्बल ४० हजार लोक १२ डिसेंबरला येथे पोहोचले. आता पोलीस लाठीमार करणार, अशी स्थिती. अंगावर काटाही उमटला. मात्र साहेबांच्या नेतृत्वापुढे नमते घेऊन सर्वांनाच जेलमध्ये टाकण्यात आले आणि त्या दिवसापासून शरद जोशींशी वैचारीक संबंध जुळलेत ते आजतागायत. शरद जोशींच्या खांद्याला खांदा लावून अमरावती तथा विदर्भाचे नेतृत्व म्हणून पुढे आलेले जगदिश नाना बोंडे सांगत होते. त्यांच्या आठवणींचे वादळच इतके व्यापक की ते शमतच नाही.‘शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळविणे, हा माझा श्रमसिद्ध हक्क आहे’, अशी हृदयभेदी घोषणा शरद जोशी यांनी १९८४ ला अमरावतीमध्ये झालेल्या लाखोंच्या सभेत केली. त्यानंतर शेतीचे अर्थकारण समजायला लागले, अशी आठवणही शेतकरी संघटनेचे विदर्भप्रमुख असलेल्या जगदीश नाना बोंडे यांनी सांगितली. (प्रतिनिधी)