शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे

By admin | Updated: March 1, 2016 00:14 IST

मराठी भाषा आणि साहित्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणे आवश्यक आहे.

श्रीपाल सबनीस : विद्यापीठात मराठी राजभाषा दिन उत्साहात अमरावती : मराठी भाषा आणि साहित्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठी लेखकांनी साहित्याची निर्मिती करताना त्याचे भान ठेवावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले. विद्यापीठाच्या मराठी विभागाच्यावतीने कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात 'मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केल. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू विलास सपकाळ, मराठी विभागप्रमुख तथा वाङ्मय विद्याशाखेचे अधिष्ठाता मनोज तायडे, हेमंत खडके उपस्थित होते. मराठी भाषा, साहित्य व संस्कृती समोर नेमके कुठले प्रश्न आहेत, हे लक्षात घेऊन मराठी प्रतिभासंपन्न कशी होईल, यासाठी उद्योन्मुख साहित्यकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. केवळ राजकीय लोकशाही टिकवण्याचा प्रयत्न न होता सामाजिक व आर्थिक लोकशाही टिकवण्याचीसुद्धा गरज आहे. यादृष्टीने मराठी साहित्यकांनी विचार करावा, असे सबनीस यांनी सांगितले. शोधनिबंध व संशोधनाच्या माध्यमातून मराठी भाषा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावी आणि विद्वानांनी नेहमी जागृत राहून कार्य करावे, असे सपकाळ यांनी अधोरेखित केले. यावेळी प्रथम आल्याबद्दल व सुवर्णपदके प्राप्त केल्याबद्दल मराठी विभागाची विद्यार्थिनी शीतल सुरेंद्र तायवाडे हिचा, बार्टीतर्फे मनोज तायडे यांचे पुस्तक पुनर्मुद्रित केल्याबद्दल सत्कार झाला. प्रास्तविक मनोज तायडे यांनी, संचालक हेमंत खडके व आभार प्रणव कोलते यांनी मानले. कार्यक्रमाला सबनीस, सतीश तराळ, सोनपेठकर, बी.जी. खोब्रागडे, कुमार बोबडे, शरद जोध, अण्णा वैद्य, वैशाली गुडधे, जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर आदी उपस्थित होते.